Skip to main content

Posts

Showing posts from 2018

वृक्ष लागवडची माहिती तत्काळ उपलब्ध करून द्या - प्रशांत शेळके

औरंगाबाद,   दि.  21  –   राज्यात यंदा वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत 13 कोटी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व विभागांना उद्दीष्ट ठरवून देण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक असलेले प्रपत्रदेखील विभागांना पाठविण्यात आले आहे. त्या प्रपत्रातील आवश्यक माहिती तत्काळ भरून उपवनसंरक्षक कार्यालयाला दिनांक 23 मार्च 2018 रोजी कार्यालयीन वेळेपर्यंत उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणेला आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात 13 कोटी वृक्षलागवड कार्यक्रमाच्या पूर्वतयारी आणि उपाययोजनांबाबत आयोजित बैठकीत श्री. शेळके बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक एस. पी. वडस्कर, सामाजिक वनीकरण विभागाचे वाय. एल. केसकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी सुनंदा माडजे पाटील, मनपाचे विजय पाटील, श्रीमती जे. व्ही. चौरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे अनुरेखक आर.एस. निकाळजे, एस. पी थोरात, श्रीकृष्ण नकाते, डॉ. जी.आर. संगवई आदींची उपस्थिती होती. सन 2018 मधील 13 कोटी वृक्ष लागवडी संदर्भात  औरंगाबाद जिल्ह्याने करावयाच्या कार्यवाहीबाबत सर्व वि

करमाड अपघातातील जखमींची विधानसभा अध्यक्षांनी घेतली भेट

औरंगाबाद दि.20 - करमाड येथे कंटनेरमुळे झालेल्या वाहनांच्या अपघातातील सर्व जखमींची रुग्णालयात जाऊन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दि.19 रोजी  भेट घेतली. तसेच जखमींच्या नातेवाईकांना धीर दिला. डॉक्टरांनी रुग्णांवर करत असलेल्या उपचारांची विचारपूस केली.           करमाड येथे  दि.19 रोजी  आठवडी बाजार होता. औरंगाबादहून जालन्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्याने ट्रॅक्टर, पीकअपसह दुचाकीस्वारांना उडवले. या अपघातात एकूण 16 जण जखमी झाले. जखमींना तत्काळ औरंगाबाद शहरातील धूत, एमआयटी, घाटी, श्रध्दा इस्पितळात हलविण्यात आले. या रुग्णालयात रुग्णांवर योग्य उपचार सुरू आहेत असे करमाड पोलिस स्थानकाचे निरीक्षक श्री. कोळी यांनी सांगितले.           घाटी रुग्णालयात सचिन खरात (वय 35), काकासाहेब जाधव, नामदेव रंगभरे यांच्यावर उपचार सुरू आहेत असे घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ कानन येळीकर, डॉ. बी.आर. सोनवणे यांनी विधासनभा अध्यक्ष श्री. बागडे यांना सांगितले. तसेच रुग्णांच्या प्रकृतीबाबतही माहिती दिली.

मेकोरॉटला पाण्याशी संबंधित माहिती उपलब्ध करून देणार - डॉ. पुरूषोत्तम भापकर

औरंगाबाद, दि. 20 –मेकोरॉट या इस्राईलच्या शासकीय कंपनीला आवश्यक असणारी पाण्याशी संबंधित सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर यांनी आज इस्राईलच्या सदस्यांना दिली. विभागीय आयुक्त यांच्या दालनात आयोजित मराठवाड्याच्या पाणीपुरवठा कृती आराखड्याबाबत इस्राईलच्या डिएगो बर्गर, इयरोन गेलर यांच्याशी डॉ. भापकर यांनी संवाद साधला. यावेळी वाल्मीचे महासंचालक दीपक सिंगला, इस्राईलच्या मेकोरॉट कंपनीचे भारतातील प्रमुख रोमील सॅम्युअल, अप्पर विभागीय आयुक्त शिवानंद टाकसाळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता आर. एस. लोलापोड, अधीक्षक अभियंता अजय सिंग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता सुभाष तुपे, लातूरचे विभागीय कृषी सहसंचालक रमेश भताने, साहेबराव दिवेकर, स्वप्नील सरदार, आदींची उपस्थिती होती. बैठकीत डिएगो बर्गर, इयरोन गेलर यांनी इस्राईल मधील पाण्याच्या मुल्यमापनाबाबत सविस्तररित्या सादरीकरण केले. पाण्याची साधने, क्षेत्र निवड, लघु, मध्यम आणि दीर्घ नियोजन, प्रशिक्षण, शिक्षण, अंमलबजावणी याबाबतचा सादरीकरणात समावेश होता. परिस्थिती बदल

कचऱ्याचे संकट मोठे, मात्र उपाय शक्य ! - नवल किशोर राम

औरंगाबाद,   दि.  13  –   औरंगाबाद शहरातील कचरा समस्येमुळे शहरवासीय  हैराण झाले आहेत. परंतु नागरिकांच्या सहकार्यातून या समस्येवर सहजपणे तोडगा निघू शकतो. त्यासाठी शहरातील नागरिकांनी देखील महापालिकेला सहकार्य करावे. कचऱ्याचे संकट मोठे असले तरी त्यावर प्रक्रिया करुन ते दूर करणे शक्य असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज सांगितले.  शहरातील झोन क्र. 3 व 4  मधील कचरा विलगीकरण, प्रक्रिया याबाबतची प्रत्यक्ष पाहणी श्री. राम यांनी केली. प्रभाग क्र.4 मधील एन -12 याठिकाणी मनपाच्या जागेवरच कचऱ्याचे योग्यप्रकारे विलगीकरण , कंपोस्ट खत निर्मितीसाठी खड्डयांचा सुयोग्य पद्धतीने व नियोजनपूर्वक वापर करण्यात आला आहे. त्याचप्रकारे शहरातील इतर वॉर्डमध्ये अशाचप्रकारे कचरा विलगीकरण, खड्डयांच्या माध्यमातून कंपोस्ट खत निर्मिती करण्यासाठी नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे. वॉर्डातील कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने व्हावी, यासाठी ओला व सुका कचरा वर्गीकृतपणे मनपा कर्मचारी, स्वच्छक यांच्याकडे सुपूर्द करावा. त्याचबरेाबर जागा उपलब्ध असल्यास त्याबाबतही सूचवावे. झोन क्र.

उर्दू भाषेच्या संवर्धनासाठी सर्वोतोपरी प्रयत्न - विनोद तावडे

➢ राज्यस्तरीय उर्दू शिक्षणाच्या तीन दिवसीय वारीला औरंगाबादेत सुरुवात ➢ उर्दू इ साहित्य ॲपचे विमोचन, 50 स्टॉल्समध्ये नवोपक्रम औरंगाबाद दि.10  - प्राचीन काळापासून उर्दू भाषेला अनन्य साधारण महत्त्व आहे. आपल्या देशालास्वातंत्र्य देताना स्वातंत्र्यसैनिकांनी इनक्लाब जिंदाबादचा नारा दिला. हा नारा देखील उर्दूत होता. आपल्या देशाची प्राचीनकाळापासून उर्दू भाषा आहे. या प्रेमळ व आदरयुक्त असलेल्या उर्दू भाषेच्या संवर्धनासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करतअसल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यावेळी स्कायपद्वारे संवाद साधताना शिक्षकांना सांगितले. विभागीय क्रीडा संकुल औरंगाबाद येथे शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे १० ते १२ मार्च या कालावधीत“राज्यस्तरीय उर्दू शिक्षणाच्या वारीचे" आयोजन केले आहे. या वारीच्या उद्घाटनानंतर श्री. तावडे बोलत होते. या वारीचेउद्घाटन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याहस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोनगावकर, राज्य समन्वयक पिराजी पाटील, शिक्षण विभागाच्या विशेष कार्य अधिकारी प्राची साठे, शिक्षण उपसंचालक वैजनाथखांडके, सहाय्यक शिक्षण उपसं

नाथषष्ठी यात्रा उत्सवाची कालाहंडी फोडून सांगता

संत एकनाथ, भानुदासाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला औरंगाबाद, दि.09  :  पैठण येथे सुरु झालेल्या संत एकनाथ षष्ठी सोहळ्याची आज सूर्यास्ताच्या समयी नाथसमाधी मंदिराच्या गाभाऱ्यात कालाष्टमीची दहीहंडी फोडून सांगता झाली.संत एकनाथ, संत भानुदास यांच्या वैष्णवांनी केलेल्या जयघोषात आज शुक्रवार दि.09 मार्च रोजी सायंकाळी मंदिर परिसर दुमदुमून गेला. नाथवंशज रावसाहेब महाराज यांच्याहस्ते नाथमंदिराच्या प्रांगणात कालाहंडी फोडण्यात आली. तत्पूर्वी रघुनाथबुवा महाराज गोसावी, तळेगावकर, पैठणकर, योगीराज महाराज गोसावी, रावसाहेब गोसावी  यांच्या पालखींचे आगमन झाले. पालखीच्या आगमनानंतर दहीहंडी फोडण्यात आली. भाविकांनी पावली खेळून आनंद व्यक्त करत भानुदास, एकनाथ महाराजांचा जयजयकार केला. मंदिर परिसरात काला उत्सवात सहभागी होण्यासाठी आबाल वृद्धांसह, महिला भाविकांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती. विविध भागातून आलेल्या भाविकांसह यावेळी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा आमदार संदीपान भुमरे, जिल्हा परिषद सभापती विलास भुमरे,  नगराध्यक्ष सुरज लोळगे, रघुनाथ महाराज, योगीराज महाराज, सरदार महाराज गोसावी, हरिपंडित महाराज

अस्मिता सॅनिटरी नॅपकिन योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ

  दिनां क : 8 . 3 .201 8 औरंगाबाद, दि. 8 – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन शासनाने मुली व महिलांसाठी माफक दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्यासाठी अस्मिता सॅनिटरी नॅपकिन योजना अंमलात आणली आहे. या  योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ होत असून या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील महिला, 11 ते 19 वयोगटातील शाळकरी मुलींनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी केले. उस्मानपुरा येथील भानुदास चव्हाण सभागृहात अस्मिता सॅनिटरी नॅपकीन योजनेच्या जिल्हास्तरीय शुभारंभाप्रसंगी श्री. भापकर बोलत होते. ही योजना अत्यंत महत्तवाची आहे. बचत गटाच्या माध्यमातून अस्मिता ॲपव्दारे सॅनिटरी नॅपकीनचा पुरवठा तालुकास्तरावर करण्यात येऊन मागणीप्रमाणे सॅनिटरी नॅपकीन माफक दरात महिला बचत गट व्दारपोच करणार आहेत. महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. या नाविन्यपूर्ण योजनेबद्दल शासनाचे अभिनंदन करायलाच हवे. महिला सक्षमीकरणासाठी मराठवाडा विभाग सदैव अग्रेसर आहे. 5 लाख युवक युवतींना पुढील काही दिवसात स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी, शेतकरी, बचत गट चळवळीला बळकटी आणण्यासाठी, उत्तम शिक्षण, र

शाश्वत सिंचन, वीज आणि बाजारपेठेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनवणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बजाज पाणी संवर्धन प्रकल्प टप्पा 2 चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन औरंगाबाद,दि.04 - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. औरंगाबाद जिल्ह्यातील दोन लाख शेतक-यांना या योजनेचा लाभ झाला असून कर्ज योजनेची प्रक्रिया सुरू आहे. परंतु कर्जमाफी हा अंतिम उपाय नाही. जलसंधारणाच्या माध्यमातून शाश्वत सिंचन, वीज आणि बाजारपेठेची उपलब्धता यातून शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनविणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लासूर येथे केले. लासूर येथे बजाज पाणी संवर्धन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्यातील 262 कोटी रुपयांतून 1 लाख 50 हजार एकर क्षेत्रावर जलसंधारणाच्या कामांच्या उद्घाटन प्रसंगी श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, बजाज उद्योग समूहाचे उपाध्यक्ष मधुर बजाज, जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष चंद्रप्रकाश त्रिपाठी, जिल्हा परिषद अध्यक्षा ॲङ देवयानी डोणगावकर, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार सर्वश्री अतुल सावे, प्रशांत बंब, विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा पर

Inspirational Tradition

Banjara community is popular for their traditional folk culture. They celebrate festival of colors very actively and lively. Their mother tongue is Gorboli or Gormati. They started to celebrate holi many years ago with lot of enthusiasm. On this occasion they come together and celebrate holi in differently but follows their tradition.When they come   together and they play songs. Pic Credit -https://goo.gl/HSajJG             They play folk dance which very different , everlasting experience for anyone who is celebrating holi and its motivate to other people to celebrate festival of colors. They sing lengi song and play dance around holi. This tradition/culture of banjara community has different place in indain culture.   After lengi song and dance all people goes to their leaders home and till late Night they play their games differently. The Lengi dancer is known as Gerihya.                 The uniqueness of this celebrations is that all people come together without any so

नाथषष्ठी सोहळ्यातील भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्या - अप्पर जिल्हाधिकारी सोरमारे

स्वयंसेवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन       औरंगाबाद,दि.27—राज्यातील महत्त्वाच्या सोहळ्यांपैकी पैठणचा नाथषष्ठी सोहळा आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून भाविक येतात. सर्व भाविकांना योग्य, आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. हा भक्तीमय सोहळा आनंददायी होण्यासाठी सर्व यंत्रणांनी निश्चित केलेली जबाबदारी पार पाडावी, अशा सूचना श्री एकनाथ महाराज विश्वस्त संस्थानचे कार्यकारी विश्वस्त तथा अप्पर जिल्हाधिकारी पी.एल.सोरमारे यांनी आज पैठण येथे अधिकाऱ्यांना केल्या. त्याचबरोबर स्वयंसेवकांनी यात्रा उत्सव व्यवस्थित पार पाडण्यासाठी पैठण नगर परिषदेत नाव नोंदणी करुन पुढाकार घ्यावा,असे आवाहनही श्री. सोरमारे यांनी केले.              पैठण येथील कीर्तन सभागृहात नाथषष्ठी सोहळ्याच्या आयोजनाबाबत पूर्वतयारी आढावा बैठक पार पडली. यावेळी श्री. सोरमारे बोलत होते. बैठकीस पैठणचे नगराध्यक्ष सूरज लोळगे, जिल्हा परिषदेचे सभापती विलास भुमरे उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, पैठण नगर परिषद मुख्य अधिकारी सो मनाथ जाधव, तहसीलदार महेश सावंत,पोलिस निरीक्षक चंदन ईमले, श्री. संत एकनाथ महाराज विश्वस्त मं

इज्तेमातील तैनात अधिकारी–कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी यांच्याकडून कौतूक

औरंगाबाद,दि. 26 - लिंबेजळगाव येथे तीन दिवसीय राज्यस्तरीय इज्तेमा सोहळ्यास मोठ्याप्रमाणावर भाविकांची उपस्थिती होती. सोहळ्यासाठी संयोजकांमार्फत चोख व्यवस्था करण्यात आली होती. संयोजकांकडून उपलब्ध सोयी-सुविधांवर सनियंत्रण, प्रसंगी शासकीय विभागामार्फत सुविधांची उपलब्धता करून देण्यासाठी एकूण 250 अधिकारी- कर्मचारी यांची नियुक्ती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली होती. सोहळ्यात चोख व व्यवस्थितपणे कामगिरी पार पाडल्याबद्दल या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतूक करत जिल्हाधिकारी श्री. राम यांनी त्यांचे अभिनंदन केले असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी सांगितले. लिंबेजळगाव येथील इज्तेमा सोहळा व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी, कायदा   व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 13 नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती व त्यांच्या अधिनस्थ 235 कर्मचाऱ्यांच्या पथकांची स्थापना जिल्हाधिकारी श्री. राम यांनी केली होती.   वैजापूरचे उपविभागीय अधिकारी यांनी   मुख्य संनियंत्रण अधिकारी आणि गंगापूर तहसीलदार यांनी सहाय्यक मुख्य संनियंत्रण अधिकारी म्हणून कामगिरी बजावली. इज्तेमा सोहळा व्यवस्थित पार पाडण्यात यावा या

एड्स नियंत्रण कार्यक्रमासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देणार - जिल्हाधिकारी

                औरंगाबाद,दि.23  –एड्समुक्त जिल्हा करण्यासाठी जनजागृतीवर अधिक भर द्यावा. लोकांमध्ये जागृती निर्माण करावी. रुग्णालयातील एड्स तपासणी कीटसाठी आवश्यक उपकरणाकरीता,माहिती, शिक्षण आणि संवादाकरीता आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज दिली.              जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या त्रैमासिक बैठकीत श्री. राम बोलत होते. जिल्ह्यातील आयसीटीसी, डापकु व प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर एड्स तपासणी कीट ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या उपकरणासाठी नव्याने प्रस्ताव सादर करण्यात यावा. माहिती, शिक्षण आणि संवादावरही भर देऊन मोठ्याप्रमाणात जिल्ह्यात एड्सबाबत जनजागृती व्हावी, यासाठी देखील प्रस्ताव द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. राम   यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या.             सुरुवातीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गोवर्धन गायकवाड यांनी समितीच्यावतीने जिल्हाधिकारी   श्री. राम यांचे स्वागत केले. जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांबाबत जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण पथक

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री लोणीकर यांनी इज्तेमा सोहळ्याची केली पाहणी

औरंगाबाद,दि. 23 –लिंबे जळगाव येथे दि. 24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या इज्तेमा सोहळ्याच्या ठिकाणाची पाहणी करुन येथील भाविकांशी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दि. 22 रोजी संवाद साधला.   यावेळी इज्तेमा आयोजन समितीच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमास आमदार अतुल सावे, एकनाथ जाधव, राजू बागडे, हाजी मोहम्मद, एजाज देशमुख, आयोजन समितीचे डॉ. रियाज शेख, आयेशा खान, अतिक खान यांची उपस्थिती होती. कारी शकील, आमीर साहब, जुबेर मोतीवाला, लिंबेगावचे सरपंच अनिक अमिर पटेल आदींसह बाहेरुन आलेल्या धर्मगुरु, भाविकांशी श्री. लोणीकर यांनी संवाद साधला. तसेच सोहळ्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सोयीसुविधांची देखील श्री. लोणीकर यांनी यावेळी पाहणी केली. ******

मुदत द्या, नक्कीच कायमस्वरूपी प्रश्न सोडवू -डॉ. दीपक सावंत

नारेगाव येथील कचरा डेपोची पालकमंत्र्यांकडून पाहणी औरंगाबाद, दिनांक 23- नारेगाव कचरामुक्त व्हावे, यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे. प्रश्न चर्चेने सुटतात, त्याकरिता आपण सकारात्मक पद्धतीने नारेगावचा कचरा प्रश्न कायमस्वरूपी सोडवू. मात्र, त्यासाठी नारेगाववासीयांनी काही महिन्यांची मुदत प्रशासनाला द्यावी, असे आवाहन पालकमंत्री तथा आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज केले. नारेगाव येथे सुरू असलेल्या ग्रामस्थांच्या आंदोलनाला भेट देऊन श्री. पालकमंत्री सावंत यांनी गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मुंबई, पुण्याचा कचरा प्रश्न मार्गी लावला. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनीदेखील नारेगावच्या कचरा समस्येत लक्ष घातले असून ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी ग्रामस्थांनीदेखील शासनाला सहकार्याच्या भूमिकेतून मुदत द्यावी, असे आवाहन श्री.सावंत यांनी यावेळी गावकऱ्यांना केले. पर्यायी जागा उपलब्धतेसाठी जिल्हाधिकारी जागा शोधतील, परंतु त्याला गावकऱ्यांनीदेखील सकारात्मक तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही श्री. सावंत यांनी ग्रामस्थांना आवाहन केले. यावेळी खासदार चंद्रकांत खै

समाजाचा सर्वांगीण विकास साधा - महादेव जानकर

Ø राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचा औरंगाबादेत   शुभारंभ Ø देशातील पहिली योजना, भविष्यात 1 लाख लाभार्थ्यांना होणार लाभ औरंगाबाद,दि. 17   – राजे यशवंतराव होळकर महामेष योजना सहा मुख्य घटकांसह सन 2017-18 या आर्थिक वर्षापासून भटक्या जमातीतील लाभार्थ्यांसाठी राज्यात 34 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेचा शुभारंभ आज औरंगाबादेतून होत असल्याने आनंद वाटतो, असे मत पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केले. शेतकरी, मेंढपाळ, मजुर आदींच्या पाल्यांनी नियमित अभ्यास करावा. कष्टाने महत्त्वाच्या सर्वोच्च पदांवर पोहचवून समाजाचा सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन श्री. जानकर यांनी केले.    पडेगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळामार्फत आयोजित राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचा शुभारंभ व शेळ्या-मेंढ्यांचे खाद्य बनविणाऱ्या फिड मिलच्या उद्घाटनप्रसंगी श्री जानकर बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आयुक्त कांतीलाल उमाप, अतिरिक्त आयुक

उद्योगक्षेत्रात सातत्याने संशोधनाची आवश्यकता - उद्योगमंत्री देसाई

औरंगाबाद,दि. 16 – उद्योगक्षेत्राला शिक्षणक्षेत्राची जोड महत्त्वाची आहे. या शिक्षण क्षेत्राच्या सहकार्याने उद्योगक्षेत्रात सातत्याने संशोधनाची आवश्यकता निर्माण झाल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज केले. तरुणांनी उद्योजक होण्यासाठी संशोधनावर भर देऊन उद्योजक होण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले.   पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या (पीइएस) अभियांत्रिकी महाविद्यालयात चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज आणि ॲग्रीकल्चर (सीएमआयए) च्यावतीने आयोजित चौथ्या ‘एनर्जी    कॉन्क्लेव्ह 2018 ’ मध्ये   श्री. देसाई बोलत होते. यावेळी पीइएसचे   प्राचार्य डॉ. अभिजित वाडेकर, सीएमआयएचे अध्यक्ष प्रकाश कोकील, डॉ. बी.एन. चौधरी, राहुल देशपांडे यांची उपस्थिती होती. श्री. देसाई म्हणाले, राज्य शासनाने नुकतेच महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेईकल धोरण जाहीर केले आहे. या धोरणाच्या माध्यमातून राज्यात 25 हजारकोटींच्या गुंतवणुकीसह एक लाख रोजगार निर्मितीचे लक्ष गाठण्यात येणार असल्याचेही श्री. देसाई म्हणाले. सध्या राज्यात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. त्यातून  

लघु उद्योजकांनी उद्योगक्षेत्रात भरारी घ्यावी - सुभाष देसाई

औरंगाबाद,दि. 16 – दुर्दम्य इच्छाशक्ती आणि स्वत: वर विश्वास ठेवून उद्योग उभारणीसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेत लघु उद्योजकांनी उद्योगक्षेत्रात भरारी घ्यावी, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज केले. हॉटेल विंडसर कॅसल येथे राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती   हबच्या 19 व्या राज्यस्तरीय बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी श्री. देसाई बोलत होत. यावेळी सुक्ष्म व लघु मंत्रालयाचे संचालक पीजीएस राव, पी. उदयकुमार, आर. बी. गुप्ते, उद्योग संचालनालयाचे सहसंचालक दिलीप गुरूलवार, राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळाचे क्षेत्रीय प्रमुख पी. कृष्ण मोहन, बुद्धीष्ट इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग ॲन्ड ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष नंदकिशोर रत्नपारखे, उच्च अधिकार नियंत्रण समितीचे सदस्य सुनील झो डे, मसिआचे अध्यक्ष सुनील किर्दक   उपस्थित होते. श्री. देसाई म्हणाले, जमशेदजी टाटा, धीरूभाई अंबानी, लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी अगदी छोट्या व्यवसायापासून सुरूवात केली. परंतु सातत्य आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी   नावलौकिक प्राप्त केला. लघु उद्योजकांनी त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन र

पालकमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून पिकांची पाहणी

औरंगाबाद,दि. 15 - बोंडअळी, गारपिटीने झालेल्या पिकांच्या नुकसानीची आज पालकमंत्री तथा आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी पाहणी करुन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. त्याचबरोबर होणाऱ्या नुकसानीबाबत हानी टाळण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करा, असे निर्देश कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.   सिल्लोड तालुक्यातील वरखेडी, बनकिन्होळा आणि फुलंब्री तालुक्यातील नायगव्हाण, महालकिन्होळा याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी डॉ. सावंत यांनी केली, शेतकऱ्यांशी संवादही साधला. वरखेडी येथे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याहस्ते पालकमंत्री डॉ. सावंत यांचे प्रशासनाच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर , अप्पर जिल्हाधिकारी पी.एल.सोरमारे, प्रशिक्षणार्थी तहसीलदार सौरभ कटियार, उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, तालुका कृषी अधिकारी श्री. आघाव आदींची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी येथील संतोष फलके यांच्याशेतात तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील कापूस उत्पादन पिकांब

जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे कामांचे जिओ टॅगिंग करा - नवल किशोर राम

औरंगाबाद, दि.14 -   शासनाच्या महत्त्वाकांक्षी अशा जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे योजनेच्या झालेल्या कामांचे जिओ टॅगिंग करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्यात.           जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनांचा आढावा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना योजना वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही दिले. अनुलोम संस्थेच्या सहकार्याने ग्रामपंचायतींच्या माध्यमातून जिल्ह्यातील तलावांचे कामे करण्यात यावीत. सन 2016-17 मध्ये जिल्ह्यात 201 गावांमध्ये जलयुक्त शिवाराची कामे पूर्ण झालीत. तरी देखील संपूर्णत: जिओ टॅगिंग झालेले नाही. तरी जलसंधारण, कृषी, वन, जिल्हा परिषद व इतर कार्यालयाकडून झालेल्या विहिर पुनर्भरण, लोकसहभागातील कामाचे जिओ टॅगिंग करावे. त्याचबरोबर सर्व कामांमध्ये पारदर्शकता ठेवून इ-टेंडरिंगव्दारे कामे पार पाडावीत. झालेल्या कामाचा परिपूर्ती अहवाल तत्काळ कृषी कार्यालयाला कळवावा, असेही श्री. राम यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले.