Skip to main content

इज्तेमातील तैनात अधिकारी–कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी यांच्याकडून कौतूक


औरंगाबाद,दि.26- लिंबेजळगाव येथे तीन दिवसीय राज्यस्तरीय इज्तेमा सोहळ्यास मोठ्याप्रमाणावर भाविकांची उपस्थिती होती. सोहळ्यासाठी संयोजकांमार्फत चोख व्यवस्था करण्यात आली होती. संयोजकांकडून उपलब्ध सोयी-सुविधांवर सनियंत्रण, प्रसंगी शासकीय विभागामार्फत सुविधांची उपलब्धता करून देण्यासाठी एकूण 250 अधिकारी- कर्मचारी यांची नियुक्ती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली होती. सोहळ्यात चोख व व्यवस्थितपणे कामगिरी पार पाडल्याबद्दल या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतूक करत जिल्हाधिकारी श्री. राम यांनी त्यांचे अभिनंदन केले असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी सांगितले.
लिंबेजळगाव येथील इज्तेमा सोहळा व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी, कायदा  व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 13 नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती व त्यांच्या अधिनस्थ 235 कर्मचाऱ्यांच्या पथकांची स्थापना जिल्हाधिकारी श्री. राम यांनी केली होती.  वैजापूरचे उपविभागीय अधिकारी यांनी  मुख्य संनियंत्रण अधिकारी आणि गंगापूर तहसीलदार यांनी सहाय्यक मुख्य संनियंत्रण अधिकारी म्हणून कामगिरी बजावली. इज्तेमा सोहळा व्यवस्थित पार पाडण्यात यावा याकरिता सोहळ्याच्या संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांसह विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी पूर्वतयारी आढावा बैठका घेतल्या.
जिल्हा प्रशासनातर्फे सोहळ्याच्या पूर्वतयारीवेळी कार्यशाळादेखील घेण्यात आली. त्यामुळे सोहळ्याठिकाणी आवश्यक असणाऱ्या सोईसुविधा अधिकारी, कर्मचारी आणि पोलिस प्रशासनाच्यावतीने पुरविण्यात आल्या. यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ,पाणीपुरवठा विभागाच्यावतीने सुरळीत पाणीपुरवठा करण्यात आला. पाण्याची कमतरता सोहळ्याठिकाणी भासू नये, यासाठी वाळूज एमआयडीसीतून पाणी उपलब्ध करून देण्यात आले. कार्यक्रमस्थळी 24 तास वीज पुरवठा करण्यात आला. कार्यक्रठिकाणी संयोजकांमार्फत अन्नपुरवठा करून जेवण तयार करण्यात येत होते. त्याठिकाणच्या अन्नाची गुणवत्ता तपासण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने 10 निरीक्षकांव्दारे तपासणी करण्यात येत होती. अद्यावत औषध पुरवठा, वैद्यकीय पथके, 12 रूग्णवाहिका कार्यान्वयीत करून आरोग्य यंत्रणेमार्फत कार्यवाही पार पाडण्यात आली. जिल्ह्यातील नगरपालिका व महानगरपालिकांची 12 अग्निशमन वाहने उपलब्ध करून देण्यात आली होती. कार्यक्रमस्थळी स्वच्छता व आरोग्य अबाधित राखण्यासाठी नगरपालिका, महापालिकेतर्फे स्वच्छतागृहे, स्नानगृहांची व्यवस्था करण्यात आली होती.  कचरा व तत्सम प्रकारात शोषखड्डे यामधून पाण्याचा निचरा व्यवस्थितपणे होईल यासाठी 24 तास पथके तैनात करण्यात आली होती. साठवलेल्या पाण्यात योग्य प्रमाणात क्लोरिनचा वापरदेखील प्रशासनामार्फत याठिकाणी करण्यात आला. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिस यंत्रणेशी समन्वय साधून प्रादेशिक परिवहन विभागाने कामगिरी पार पाडली. भाविकांना ने-आन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची व्यवस्थादेखील योग्य प्रकारे करण्यात आली.
नोडल अधिकारी म्हणून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता श्री. सोनुले, जिल्हा परिषदेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घुगे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पी.डी. भामरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री. भगत, अन्न व औषध प्रशासनचे सी.बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गोवर्धन गायकवाड, महापालिकेचे अग्निशामक विभागप्रमुख आर.के. सुरे, स्वच्छता विभागाचे विजय पाटील, एस.टी. महामंडळाचे विभागनियंत्रक रा.ना. पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी रमेशचंद्र खराडे, भूजल सर्वेक्षणचे जी. डी. महाजन यांनी चोख व व्यवस्थितपणे इज्तेमा सोहळ्यात कामगिरी बजावली. त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या पथकातील सर्व  कर्मचाऱ्यांचे विशेष कौतूक, अभिनंदन श्री. राम यांनी केले.
*****

Comments

Popular posts from this blog

मनीषा दांडगेचा ‘खडतर प्रवास, जिद्द आणि यश’

दिनांक:- 16-05-2017 लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी पदाची निवड 2013 मध्ये झाली. 2014 मध्ये पोस्टींग मिळाली. परंतु ‘ झोपडपट्टीतील तरूणी झाली उपजिल्हाधिकारी’   अशा आशयाचा मजकूर तरूणांना अजूनही फेसबुक, न्यूज वेब पोर्टल अन् व्हाटसअ्पव्दारे प्रेरित करत आहे. स्पर्धा परीक्षकांसाठी प्रेरणादायी अशीच चंद्रपूर जिल्ह्यातील मूलच्या उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे यांची यशकथा. व्हाटस्अप  आणि आई             व्हाटसअपवरील संदेश उपजिल्हाधिकारी झालेल्या मनीषा दांडगे यांच्या आईला आजही त्यांच्या राहत्या घराच्या परिसरातील तरूण वर्ग वाचून दाखवतात. तेव्हा आईला लेकीचा अभिमान अन् मिळविलेल्या पदाचा झालेला आनंद हा गगनात मावेनासा होतो. परिसरातील तरूण वर्गही झपाट्याने अभ्यास करून डोळ्यासमोर मनीषा दांडगे यांचा आदर्श ठेवून स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षणाचा ध्यास घेत आहे,  शिकत आहे, असे आई असलेल्या लक्ष्मी दांडगे अभिमानाने सांगतात. बुध्दिमत्तेची चुणूक             तसा हा परिसर म्हणजे झोपडपट्टी. औरंगाबादेतील जाधववाडी जवळील आंबेडकर नगर. मनीषा यांचे वडील मातीकाम करणारे (मिस्त्री). 34 वर्षापूर्वी ते जालना

भूसंपादन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा उपयुक्त -नवल किशोर राम

दिनांक 31 जानेवारी 2018 औरंगाबाद,दि. 31   - भूसंपादन कायद्याबाबत सखोल माहिती होऊन योग्य आणि प्रभावीपणे कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी भूसंपादन प्रशिक्षण कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण, उपयुक्त असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा, पारदर्शकतेचा हक्क अधिनियमावर आधारीत जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम बोलत होते. यावेळी उपायुक्त महेंद्र हरपाळकर, अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन समन्वय) मंजुषा मुथा आदींसह सर्व उपविभागीय अधिकारी नायब तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ आदी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेला सुरुवात झाली. कार्यशाळेत नवीन भूसंपादन अधिनियम 2013 कायद्यातील महत्त्वाच्या बाबी, भूसंपादन प्रस्ताव सादर करणे, सामाजिक परिणाम निर्धारण

नयनरम्‍य खिंडसी...

राष्‍ट्रीय कृषी प्रदर्शन नागपुरात पार पडलं. पाच दिवसाच्‍या या प्रदर्शनानंतर पर्यटनाची मजा लुटण्‍यासाठी आम्‍ही खिंडसीला गेलो. नागपूरपासून जवळच असलेलं हे खिंडसी. रामटेकच्‍या राम मंदिरानंतर पाहायला मिळतं. निसर्गरम्‍य अशा ठिकाणी सर्वच जण इथं येतात. अगदी चिमुकल्‍यांपासून ते वृद्धांपर्यंत. तरुणाईसाठी तर सांगायचं कामच नाही. मनाला भावणारं असं हे खिंडसी पर्यटन. या पर्यटनाची मजा लुटली ती आम्‍ही.... म्‍हणजे माझे मित्र चंद्रकांत पाटील , संग्राम इंगळे आणि निलेशने. खूपच सुखावणारा अनुभव होता तो. तरुणाई , शाळकरी मुलं-मुली , शिक्षक , नवदांपत्‍य आणि भरभरून असलेला निसर्ग... डोळे कसे तृप्‍त करून जातो , ही इथं आल्‍यावरच कळतं. जलसफर गोवा आणि मुंबईत केली परंतु इथली जलसफरही तितक्‍याच तोडीची आहे. याठिकाणी येणा-या पर्यटकांची राहण्‍याची सोयही उत्‍तम आहे. जेवणाचीही व्‍यवस्‍था आहे , अगदी मांसाहारापासून शाकाहारापर्यंत , तेही चविष्‍ट. उन्‍हाळयात तर याठिकाणी प्रत्‍येकाने भेट द्यायलाच हवी , असं हे नयनरम्‍य असं ठिकाण आहे.  (व्‍हीडिओ सौजन्‍यः चंद्रकांत पाटील)