Skip to main content

Posts

Showing posts from March 21, 2018

वृक्ष लागवडची माहिती तत्काळ उपलब्ध करून द्या - प्रशांत शेळके

औरंगाबाद,   दि.  21  –   राज्यात यंदा वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत 13 कोटी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व विभागांना उद्दीष्ट ठरवून देण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक असलेले प्रपत्रदेखील विभागांना पाठविण्यात आले आहे. त्या प्रपत्रातील आवश्यक माहिती तत्काळ भरून उपवनसंरक्षक कार्यालयाला दिनांक 23 मार्च 2018 रोजी कार्यालयीन वेळेपर्यंत उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणेला आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात 13 कोटी वृक्षलागवड कार्यक्रमाच्या पूर्वतयारी आणि उपाययोजनांबाबत आयोजित बैठकीत श्री. शेळके बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक एस. पी. वडस्कर, सामाजिक वनीकरण विभागाचे वाय. एल. केसकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी सुनंदा माडजे पाटील, मनपाचे विजय पाटील, श्रीमती जे. व्ही. चौरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे अनुरेखक आर.एस. निकाळजे, एस. पी थोरात, श्रीकृष्ण नकाते, डॉ. जी.आर. संगवई आदींची उपस्थिती होती. सन 2018 मधील 13 कोटी वृक्ष लागवडी संदर्भात  औरंगाबाद जिल्ह्याने करावयाच्या कार्यवाहीबाबत सर्व वि