Skip to main content

कचऱ्याचे संकट मोठे, मात्र उपाय शक्य ! - नवल किशोर राम



औरंगाबाद, दि. 13  औरंगाबाद शहरातील कचरा समस्येमुळे शहरवासीय  हैराण झाले आहेत. परंतु नागरिकांच्या सहकार्यातून या समस्येवर सहजपणे तोडगा निघू शकतो. त्यासाठी शहरातील नागरिकांनी देखील महापालिकेला सहकार्य करावे. कचऱ्याचे संकट मोठे असले तरी त्यावर प्रक्रिया करुन ते दूर करणे शक्य असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज सांगितले.

 शहरातील झोन क्र. 3 व 4  मधील कचरा विलगीकरण, प्रक्रिया याबाबतची प्रत्यक्ष पाहणी श्री. राम यांनी केली. प्रभाग क्र.4 मधील एन -12 याठिकाणी मनपाच्या जागेवरच कचऱ्याचे योग्यप्रकारे विलगीकरण , कंपोस्ट खत निर्मितीसाठी खड्डयांचा सुयोग्य पद्धतीने व नियोजनपूर्वक वापर करण्यात आला आहे. त्याचप्रकारे शहरातील इतर वॉर्डमध्ये अशाचप्रकारे कचरा विलगीकरण, खड्डयांच्या माध्यमातून कंपोस्ट खत निर्मिती करण्यासाठी नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे. वॉर्डातील कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने व्हावी, यासाठी ओला व सुका कचरा वर्गीकृतपणे मनपा कर्मचारी, स्वच्छक यांच्याकडे सुपूर्द करावा. त्याचबरेाबर जागा उपलब्ध असल्यास त्याबाबतही सूचवावे. झोन क्र. 4 मधील कचरा विल्हेवाट प्रक्रिया उत्तमप्रकाराची आहे त्याचपद्धतीने इतर वॉर्डमध्ये देखील अशा प्रकारे कचरा विलगीकरण व प्रक्रिया राबवावी, असे आवाहन श्री. राम यांनी केले. कंपोस्टींग खत निर्मिती देखील कचऱ्यापासून होत होत आहे.कंपोस्ट खत निर्मितीसाठी ओला कचरा खड्डयामध्ये टाकून खत तयार करण्यात येतो. यापासून कोणतेही प्रदूषण होत नाही.  नागरिकांनी या प्रक्रियेसाठी मनपा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही श्री राम यांनी केले.
झोन क्र. 4 मध्ये प्रभाग 10  आणि 28 मध्ये 10 टन कचरा दररोज जमा होतो. त्यापैकी 5 टन कचऱ्याचे कंपोस्टिंग होते. सुका कचरा 2 टन जमा होतो. शिळ्या भाकरीचे 500 ते 600 किलो व 250  ते 300 किलो भंगाराचे वर्गीकरण दररोज केल्या जाते. दोन वर्षांपासून अशा प्रकारची कचऱ्यावर प्रक्रिया दररोज सातत्याने राबविल्या जाते. अशा प्रकारची कचऱ्यापासून शहरात प्रक्रिया राबविली जाते. 190 टन कंपोस्ट खत शेतकऱ्यांना मोफत स्वरुपात देण्यात आले आहे. आजही 250 टन कंपोस्ट खत निर्मिती होत असल्याचे यावेळी महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक बी.जे. पाटील, वॉर्ड अधिकारी अजमद खान यांनी सांगितले. यावेळी कडुबा वाघमारे, मधुकर मस्के यांचीही उपस्थिती होती.
झोन क्र. 3 मधील सेंट्रल नाका येथे जिल्हाधिकारी एन.के.राम यांनी केलेल्या पाहणी दरम्यान मनपा बांधकाम अभियंता मोईन शेख यांना याठिकाणी तत्काळ  खड्डे खोदून कचऱ्याची कंपोस्ट खत निर्मिती प्रक्रिया राबवावी, असे आदेश श्री. राम यांनी दिले. यावेळी नगर विकास  शाखेचे उदय टेकाळे, मनपा सहायक आयुक्त विक्रम मांडुरके, वॉर्ड अधिकारी दीपक जोशी, कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे, स्वच्छता निरीक्षक लियाकत अली, मुकुंद कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

मनीषा दांडगेचा ‘खडतर प्रवास, जिद्द आणि यश’

दिनांक:- 16-05-2017 लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी पदाची निवड 2013 मध्ये झाली. 2014 मध्ये पोस्टींग मिळाली. परंतु ‘ झोपडपट्टीतील तरूणी झाली उपजिल्हाधिकारी’   अशा आशयाचा मजकूर तरूणांना अजूनही फेसबुक, न्यूज वेब पोर्टल अन् व्हाटसअ्पव्दारे प्रेरित करत आहे. स्पर्धा परीक्षकांसाठी प्रेरणादायी अशीच चंद्रपूर जिल्ह्यातील मूलच्या उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे यांची यशकथा. व्हाटस्अप  आणि आई             व्हाटसअपवरील संदेश उपजिल्हाधिकारी झालेल्या मनीषा दांडगे यांच्या आईला आजही त्यांच्या राहत्या घराच्या परिसरातील तरूण वर्ग वाचून दाखवतात. तेव्हा आईला लेकीचा अभिमान अन् मिळविलेल्या पदाचा झालेला आनंद हा गगनात मावेनासा होतो. परिसरातील तरूण वर्गही झपाट्याने अभ्यास करून डोळ्यासमोर मनीषा दांडगे यांचा आदर्श ठेवून स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षणाचा ध्यास घेत आहे,  शिकत आहे, असे आई असलेल्या लक्ष्मी दांडगे अभिमानाने सांगतात. बुध्दिमत्तेची चुणूक             तसा हा परिसर म्हणजे झोपडपट्टी. औरंगाबादेतील जाधववाडी जवळील आंबेडकर नगर. मनीषा यांचे वडील मातीकाम करणारे (मिस्त्री). 34 वर्षापूर्वी ते जालना

भूसंपादन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा उपयुक्त -नवल किशोर राम

दिनांक 31 जानेवारी 2018 औरंगाबाद,दि. 31   - भूसंपादन कायद्याबाबत सखोल माहिती होऊन योग्य आणि प्रभावीपणे कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी भूसंपादन प्रशिक्षण कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण, उपयुक्त असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा, पारदर्शकतेचा हक्क अधिनियमावर आधारीत जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम बोलत होते. यावेळी उपायुक्त महेंद्र हरपाळकर, अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन समन्वय) मंजुषा मुथा आदींसह सर्व उपविभागीय अधिकारी नायब तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ आदी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेला सुरुवात झाली. कार्यशाळेत नवीन भूसंपादन अधिनियम 2013 कायद्यातील महत्त्वाच्या बाबी, भूसंपादन प्रस्ताव सादर करणे, सामाजिक परिणाम निर्धारण

नयनरम्‍य खिंडसी...

राष्‍ट्रीय कृषी प्रदर्शन नागपुरात पार पडलं. पाच दिवसाच्‍या या प्रदर्शनानंतर पर्यटनाची मजा लुटण्‍यासाठी आम्‍ही खिंडसीला गेलो. नागपूरपासून जवळच असलेलं हे खिंडसी. रामटेकच्‍या राम मंदिरानंतर पाहायला मिळतं. निसर्गरम्‍य अशा ठिकाणी सर्वच जण इथं येतात. अगदी चिमुकल्‍यांपासून ते वृद्धांपर्यंत. तरुणाईसाठी तर सांगायचं कामच नाही. मनाला भावणारं असं हे खिंडसी पर्यटन. या पर्यटनाची मजा लुटली ती आम्‍ही.... म्‍हणजे माझे मित्र चंद्रकांत पाटील , संग्राम इंगळे आणि निलेशने. खूपच सुखावणारा अनुभव होता तो. तरुणाई , शाळकरी मुलं-मुली , शिक्षक , नवदांपत्‍य आणि भरभरून असलेला निसर्ग... डोळे कसे तृप्‍त करून जातो , ही इथं आल्‍यावरच कळतं. जलसफर गोवा आणि मुंबईत केली परंतु इथली जलसफरही तितक्‍याच तोडीची आहे. याठिकाणी येणा-या पर्यटकांची राहण्‍याची सोयही उत्‍तम आहे. जेवणाचीही व्‍यवस्‍था आहे , अगदी मांसाहारापासून शाकाहारापर्यंत , तेही चविष्‍ट. उन्‍हाळयात तर याठिकाणी प्रत्‍येकाने भेट द्यायलाच हवी , असं हे नयनरम्‍य असं ठिकाण आहे.  (व्‍हीडिओ सौजन्‍यः चंद्रकांत पाटील)