Skip to main content

विशेष



                            कोरोना काळातील आव्हानात्मक दंतोपचार!

Dr.Shirish Khedgikar
      कोरोना काळात जंतूसंसर्गबाधित रूग्णांवरील उपचारांप्रमाणेच, बाधित नसलेल्या किंवा बाधित झाल्याची लक्षणे दिसत नसलेल्या ‘कॅरियर’ रूग्णांवरील दंतोपचार मोठे आव्हानात्मक (चॅलेंजिंग) झाले आहे. दंतोपचारामदम्यान निर्माण होणारे ‘एअरोसोल्स’ आणि ‘स्प्लॅटर’ यामध्ये लाळेचे प्रमाण जास्त असते. दंतवैद्याकडून वापरल्या जाणाऱ्या उपकरणांमुळे लाळेच्या बारिक थेंबापासून अगदी मध्यम आकाराचे तुषार किंवा क्वचिततप्रसंगी थुंकीयुक्त आणि लाळयुक्त फवारे हवेमध्ये उडतात. बाह्य लक्षणे न दिसणाऱ्या परंतु कोविड-19 विषाणूव्दारे बाधित झालेल्या रू
ग्णावर उपचार करताना अशा फवाऱ्यांमधून विषाणू सर्वदूर पसरण्याचा आणि परिसरातील अन्य निरोगी व्यक्तिंना बाधित करण्याचा धोका असतो. इतकेच नव्हे तर, दंतोपचार करताना दंतवैद्यास रूग्णाच्या अगदी तोंडाजवळ जाऊन उपचार करणे आवश्यक असल्यामुळे लाळेच्या संपर्कामुळे आणि बाधित रूग्णाच्या श्वासोच्छवासाव्दारे किंवा शिंकेव्दारे उपचार करणाऱ्या दंतवैद्यास विषाणू प्रादुर्भाव होण्याचा अधिक धोका असतो. वाहक (कॅरियर) रूग्णांमध्ये कोणतीही बाह्य लक्षणे दिसत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक रूग्ण हा ‘कॅरियर’च आहे, असे समजून पुरेशी सावधगिरी बाळगून आणि खबरदारी घेऊनच दंतोपचार करणे हितावह ठरते.

          19 मे 2020 रोजी केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने दंतवैद्यांसाठी मार्गदर्शक नियमावलीच जाहीर केली. त्या नियमावलीचा गोषवारा दंतरूग्णानीही जरूर नजरेखालून घालावा. त्यासाठी mohfw.gov.in/pdf/Dental Advisory या संकेतस्थळावरील माहिती वाचावी. त्यामध्ये या विषाणू संसर्ग काळात फक्त आकस्मिक आणि अत्यावश्यक तसेच अत्यंत तातडीचे ‘इमर्जन्सी’ उपचार करण्याचा सल्ला दंतवैद्यांना देण्यात आला आहे.

          दातांच्या किडीमुळे किंवा दाताला झालेल्या दुखापतीमुळे जंतूप्रादुर्भाव होऊन सूज आलेली असताना वेळीच उपचार झाले नाहीत तर श्वासनलिकेवर दाब पडून श्वसन मार्गात अडथळा निर्माण होतो. ते प्राणघातक ठरू शकते. अपघातामुळे किंवा मारहाणीमुळे जबड्यांची हाडे किंवा दात तुटतात. रक्तस्त्राव थांबवणे यावेळी जरूरीचे असते. तसेच किडलेल्या दातांच्या असह्य वेदना अनेकदा रूग्णाला (आणि त्याच्या कुटुंबियांनाही) त्रस्त करतात. या सर्व केसेसमध्ये स्वत:च्या आणि रूग्णाच्या संरक्षणाची सर्व साधने योग्य प्रकारे वापरून दंतोपचार करणे आवश्यक असते. हृदयश्वसनक्रिया झालेल्या, मधुमेह असलेल्या, अवयव प्रत्यारोपण झालेल्या, कर्करोगासाठी किरणोपचार घेत असलेल्या रूग्णांवरील उपचारादरम्यान तसेच गरोदर महिला, लहान बालके आणि कमी प्रतिकारशक्ती असलेल्या रूग्णांसंदर्भात उपचारादरम्यान विशेष खबरदारी घ्यावी, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे निर्देश आहेत.

          दंत चिकित्सालयात पुरेशी हवा असावी, ती खेळती असावी, वातानूकुलन यंत्रणा शक्यतो बंद असावी व उपचाराच्या वेळी सिलींग फॅनसुद्धा बंद असावा. प्रतीक्षागृहात रूग्णांची गर्दी वाढू नये यासाठी पूर्वसूचना देऊन, अपॉइंटमेंट घेऊन ठराविक वेळी आलेल्या रूगणांवरच शक्यतो उपचार करावेत. तेथील रूग्णांनी पुरेसे अंतर ठेवून बसणे, खोकला किंवा शिंक आल्यानंतर काळजी घेणे. हातांची स्वच्छता ठेवणे, मास्कचा वापर करणे इत्यादी बाबींचे पालन करणे इष्ट. तसेच उपचाराची फी शक्तो ‘कॅशलेस’ पद्धतीनेच देण्यात यावी.

          दंतवैद्यांनी पी.पी.इ. किट घालून उपचार करताना सदर किटस्‍ घालण्याची व काढण्याची सुयोग्य पद्धत (डोनिंग आणि डॉफिंग) अवलंबणे श्रेयस्कर. रूग्णांच्या तोंडामध्ये वापरली जाणारी उपकरणे व डेंटल चेअर युनिटस्‍च्या निर्जंतुकीकरणाप्रमाणेच ‘फ्युमिगेशन’ व्दारे संपूर्ण ऑपरेटरीचे निर्जंतुकीकरण विविध विषाणूनाशक आणि विषाणूरोधक रसायनांचा वापर करून केले पाहिजे. उपचारानंतर निर्माण होणाऱ्या जैविक कचऱ्याची (बायोमेडिकल वेस्ट) विल्हेवाट सुयोग्य प्रकारे लावली पाहिजे. दंतवैद्यांप्रमाणेच त्याला सहाय्य करणाऱ्या परिचारिका किंवा तत्सम कर्मचारी यांनीसुद्धा कोविड-19 विषाणू प्रसार प्रतिबंधक उपायांची माहिती घेऊन पुरेशी खबरदारी घेणे जरूरीचे आहे.

-            डॉ. शिरीष खेडगीकर, सहयोगी प्राध्यापक, शासकीय दंत महाविद्यालय व रूग्णालय, घाटी, औरंगाबाद. संपर्क क्र. 9850055445

***





         

Comments

Popular posts from this blog

मनीषा दांडगेचा ‘खडतर प्रवास, जिद्द आणि यश’

दिनांक:- 16-05-2017 लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी पदाची निवड 2013 मध्ये झाली. 2014 मध्ये पोस्टींग मिळाली. परंतु ‘ झोपडपट्टीतील तरूणी झाली उपजिल्हाधिकारी’   अशा आशयाचा मजकूर तरूणांना अजूनही फेसबुक, न्यूज वेब पोर्टल अन् व्हाटसअ्पव्दारे प्रेरित करत आहे. स्पर्धा परीक्षकांसाठी प्रेरणादायी अशीच चंद्रपूर जिल्ह्यातील मूलच्या उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे यांची यशकथा. व्हाटस्अप  आणि आई             व्हाटसअपवरील संदेश उपजिल्हाधिकारी झालेल्या मनीषा दांडगे यांच्या आईला आजही त्यांच्या राहत्या घराच्या परिसरातील तरूण वर्ग वाचून दाखवतात. तेव्हा आईला लेकीचा अभिमान अन् मिळविलेल्या पदाचा झालेला आनंद हा गगनात मावेनासा होतो. परिसरातील तरूण वर्गही झपाट्याने अभ्यास करून डोळ्यासमोर मनीषा दांडगे यांचा आदर्श ठेवून स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षणाचा ध्यास घेत आहे,  शिकत आहे, असे आई असलेल्या लक्ष्मी दांडगे अभिमानाने सांगतात. बुध्दिमत्तेची चुणूक             तसा हा परिसर म्हणजे झोपडपट्टी. औरंगाबादेतील जाधववाडी जवळील आंबेडकर नगर. मनीषा यांचे वडील मातीकाम करणारे (मिस्त्री). 34 वर्षापूर्वी ते जालना

भूसंपादन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा उपयुक्त -नवल किशोर राम

दिनांक 31 जानेवारी 2018 औरंगाबाद,दि. 31   - भूसंपादन कायद्याबाबत सखोल माहिती होऊन योग्य आणि प्रभावीपणे कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी भूसंपादन प्रशिक्षण कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण, उपयुक्त असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा, पारदर्शकतेचा हक्क अधिनियमावर आधारीत जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम बोलत होते. यावेळी उपायुक्त महेंद्र हरपाळकर, अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन समन्वय) मंजुषा मुथा आदींसह सर्व उपविभागीय अधिकारी नायब तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ आदी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेला सुरुवात झाली. कार्यशाळेत नवीन भूसंपादन अधिनियम 2013 कायद्यातील महत्त्वाच्या बाबी, भूसंपादन प्रस्ताव सादर करणे, सामाजिक परिणाम निर्धारण

नयनरम्‍य खिंडसी...

राष्‍ट्रीय कृषी प्रदर्शन नागपुरात पार पडलं. पाच दिवसाच्‍या या प्रदर्शनानंतर पर्यटनाची मजा लुटण्‍यासाठी आम्‍ही खिंडसीला गेलो. नागपूरपासून जवळच असलेलं हे खिंडसी. रामटेकच्‍या राम मंदिरानंतर पाहायला मिळतं. निसर्गरम्‍य अशा ठिकाणी सर्वच जण इथं येतात. अगदी चिमुकल्‍यांपासून ते वृद्धांपर्यंत. तरुणाईसाठी तर सांगायचं कामच नाही. मनाला भावणारं असं हे खिंडसी पर्यटन. या पर्यटनाची मजा लुटली ती आम्‍ही.... म्‍हणजे माझे मित्र चंद्रकांत पाटील , संग्राम इंगळे आणि निलेशने. खूपच सुखावणारा अनुभव होता तो. तरुणाई , शाळकरी मुलं-मुली , शिक्षक , नवदांपत्‍य आणि भरभरून असलेला निसर्ग... डोळे कसे तृप्‍त करून जातो , ही इथं आल्‍यावरच कळतं. जलसफर गोवा आणि मुंबईत केली परंतु इथली जलसफरही तितक्‍याच तोडीची आहे. याठिकाणी येणा-या पर्यटकांची राहण्‍याची सोयही उत्‍तम आहे. जेवणाचीही व्‍यवस्‍था आहे , अगदी मांसाहारापासून शाकाहारापर्यंत , तेही चविष्‍ट. उन्‍हाळयात तर याठिकाणी प्रत्‍येकाने भेट द्यायलाच हवी , असं हे नयनरम्‍य असं ठिकाण आहे.  (व्‍हीडिओ सौजन्‍यः चंद्रकांत पाटील)