Skip to main content

Posts

Showing posts with the label Toorism

स्वच्छता हीच राष्ट्रभक्ती

स्वच्छता समृध्दीसाठी महत्त्वाची. तशीच आरोग्यदायी जीवनासाठीही. त्यातूनच विकास साधला जातो. मग तो परिसराचा असो वा राज्य, देशाचा. औरंगाबाद शहरात 42 महत्त्वाचे पर्यटनस्थळे, ऐतिहासिक स्थळांची शुक्रवार, दि. 6 रोजी सकाळी   6 ते 9 या वेळेत एकाच दिवशी सर्व शासकीय कार्यालये, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी यांच्यामार्फत स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यानिमित्त स्वच्छतेची महती सांगणारा हा विशेष लेख.              अनादि कालापासून स्वच्छतेला अनन्य साधारण महत्त्व आहे. ऋषी-मुनीही स्वच्छतेला अग्रक्रम   देत असत. स्वच्छता आरोग्यदायी जीवनाची गुरूकिल्लीच आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींनीही स्वच्छतेचा संदेश जनतेला दिला. महात्मा गांधी स्वत: स्वच्छतेला प्राधान्य देऊन नित्यनेमाने साफसफाई करत. त्यांच्या प्रेरणेतून इतरही गांधीजींचे अनुकरण करत. स्वच्छतेला प्राधान्य देऊन आपला परिसर, ग्राम स्वत: स्वच्छ करत. संत गाडगेबाबाही स्वत: झाडू घेऊन आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता करत. स्वच्छतेबाबत जनजागृती   घडवत.             तीन वर्षापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात