Skip to main content

नाथषष्ठी सोहळ्यातील भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्या - अप्पर जिल्हाधिकारी सोरमारे


स्वयंसेवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन
     औरंगाबाद,दि.27—राज्यातील महत्त्वाच्या सोहळ्यांपैकी पैठणचा नाथषष्ठी सोहळा आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून भाविक येतात. सर्व भाविकांना योग्य, आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. हा भक्तीमय सोहळा आनंददायी होण्यासाठी सर्व यंत्रणांनी निश्चित केलेली जबाबदारी पार पाडावी, अशा सूचना श्री एकनाथ महाराज विश्वस्त संस्थानचे कार्यकारी विश्वस्त तथा अप्पर जिल्हाधिकारी पी.एल.सोरमारे यांनी आज पैठण येथे अधिकाऱ्यांना केल्या. त्याचबरोबर स्वयंसेवकांनी यात्रा उत्सव व्यवस्थित पार पाडण्यासाठी पैठण नगर परिषदेत नाव नोंदणी करुन पुढाकार घ्यावा,असे आवाहनही श्री. सोरमारे यांनी केले.

            पैठण येथील कीर्तन सभागृहात नाथषष्ठी सोहळ्याच्या आयोजनाबाबत पूर्वतयारी आढावा बैठक पार पडली. यावेळी श्री. सोरमारे बोलत होते. बैठकीस पैठणचे नगराध्यक्ष सूरज लोळगे, जिल्हा परिषदेचे सभापती विलास भुमरे उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, पैठण नगर परिषद मुख्य अधिकारी सोमनाथ जाधव, तहसीलदार महेश सावंत,पोलिस निरीक्षक चंदन ईमले, श्री. संत एकनाथ महाराज विश्वस्त मंडळाचे रावसाहेब महाराज गोसावी, रघुनाथ महाराज गोसावी आदींसह सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
      श्री. सोरमारे यांनी विभागनिहाय नाथषष्ठी सोहळ्याच्या नियोजनाचा आढावा घेतला. नागरिक आणि प्रशासनाच्या सहभागातूनच हा आनंददायी सोहळा पार पडणार आहे. प्रत्येक यंत्रणांनी परस्परांशी समन्वय ठेवून कार्य करावे. यात्रेच्या नियोजनात पैठण नगर परिषदेची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. नगरपालिकेने चोख व सुकर व्यवस्था करावी. यात्रा शिबिरात पत्रकारांसाठी कक्ष स्थापन करावा. उपविभागीय अधिका-यांनीदेखील समन्वय ठेवून यात्रा उत्सव आनंददायी वातावरणात पार पडेल, याची दक्षता घेऊन कार्यवाही पार पाडावी, असे आवाहन श्री. सोरमारे यांनी केले.
          नाथषष्ठी यात्रेवेळी भाविकांना आवश्यक त्या सुविधा देण्यात याव्यात. यात्रा सुकर व्हावी यादृष्टीने रस्ते, स्वच्छ पाणी, मुबलक प्रमाणात वीज, मुक्काम स्थळे, एसटी सेवा, शौचालये आदी सुविधा भाविकांना उपलब्ध होतील यासाठी सर्व यंत्रणांनी पुढाकार घ्यावा. भाविकांना माहिती होण्याच्या दृष्टीने जागोजागी स्वच्छतेच्या संदेशासह माहिती फलके लावावीत. दारुबंदी, अन्न भेसळ, गोदावरी वाळवंट साफसफाई, कायदा सुव्यवस्था, सीसीटीव्ही व्यवस्था, औषधींचा मुबलक पुरवठा, वाहतूक सेवा, धरण परिसरातील कार्यवाही, अग्निशमन सेवा आदींबाबतही श्री. सोरमारे यांनी योग्य त्या सूचना अधिका-यांना केल्या. उत्सव यात्रेच्या संबंधाने खातेनिहाय जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारीदेखील निश्चित करण्यात आली आहे. त्यादृष्टीने तत्काळ कार्यवाही पार पाडावी. दिनांक 3 मार्च रोजी पुन्हा कार्यवाहीबाबत प्रत्यक्ष पाहणी करण्यात येऊन आढावा घेण्यात येईल, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
        उत्सव काळात वीज बंद राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी. आपत्ती व्यवस्थापन, नियंत्रणासंबंधी कक्ष स्थापन करण्यात यावा. पोलीस, तहसील, आरोग्य, पाटबंधारे, दूरसंचार, मंदिर विश्वस्त मंडळ, राज्य उत्पादन शुल्क, जिल्हा परिषद, मनपा, पशुवैद्यकीय, धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वजन व मापे, पाणी तपासणी आदी विभागांसह सर्व विभागांनी कार्यवाही पार पाडावी.
       यावेळी विश्वस्त मंडळाचे श्री. रावसाहेब महाराज गोसावी, रघुनाथ महाराज गोसावी, श्री. लोळगे, श्री. भुमरे व पत्रकार, स्थानिकांनी सूचना केल्या. त्यांच्या सूचनांची दखल घेऊन संबंधितांना तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश श्री. सोरमारे यांनी दिले. प्रारंभी श्री.सावंत यांनी सोहळ्याच्या नियोजनाबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना माहिती दिली.

Comments

Popular posts from this blog

मनीषा दांडगेचा ‘खडतर प्रवास, जिद्द आणि यश’

दिनांक:- 16-05-2017 लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी पदाची निवड 2013 मध्ये झाली. 2014 मध्ये पोस्टींग मिळाली. परंतु ‘ झोपडपट्टीतील तरूणी झाली उपजिल्हाधिकारी’   अशा आशयाचा मजकूर तरूणांना अजूनही फेसबुक, न्यूज वेब पोर्टल अन् व्हाटसअ्पव्दारे प्रेरित करत आहे. स्पर्धा परीक्षकांसाठी प्रेरणादायी अशीच चंद्रपूर जिल्ह्यातील मूलच्या उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे यांची यशकथा. व्हाटस्अप  आणि आई             व्हाटसअपवरील संदेश उपजिल्हाधिकारी झालेल्या मनीषा दांडगे यांच्या आईला आजही त्यांच्या राहत्या घराच्या परिसरातील तरूण वर्ग वाचून दाखवतात. तेव्हा आईला लेकीचा अभिमान अन् मिळविलेल्या पदाचा झालेला आनंद हा गगनात मावेनासा होतो. परिसरातील तरूण वर्गही झपाट्याने अभ्यास करून डोळ्यासमोर मनीषा दांडगे यांचा आदर्श ठेवून स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षणाचा ध्यास घेत आहे,  शिकत आहे, असे आई असलेल्या लक्ष्मी दांडगे अभिमानाने सांगतात. बुध्दिमत्तेची चुणूक             तसा हा परिसर म्हणजे झोपडपट्टी. औरंगाबादेतील जाधववाडी जवळील आंबेडकर नगर. मनीषा यांचे वडील मातीकाम करणारे (मिस्त्री). 34 वर्षापूर्वी ते जालना

भूसंपादन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा उपयुक्त -नवल किशोर राम

दिनांक 31 जानेवारी 2018 औरंगाबाद,दि. 31   - भूसंपादन कायद्याबाबत सखोल माहिती होऊन योग्य आणि प्रभावीपणे कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी भूसंपादन प्रशिक्षण कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण, उपयुक्त असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा, पारदर्शकतेचा हक्क अधिनियमावर आधारीत जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम बोलत होते. यावेळी उपायुक्त महेंद्र हरपाळकर, अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन समन्वय) मंजुषा मुथा आदींसह सर्व उपविभागीय अधिकारी नायब तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ आदी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेला सुरुवात झाली. कार्यशाळेत नवीन भूसंपादन अधिनियम 2013 कायद्यातील महत्त्वाच्या बाबी, भूसंपादन प्रस्ताव सादर करणे, सामाजिक परिणाम निर्धारण

नयनरम्‍य खिंडसी...

राष्‍ट्रीय कृषी प्रदर्शन नागपुरात पार पडलं. पाच दिवसाच्‍या या प्रदर्शनानंतर पर्यटनाची मजा लुटण्‍यासाठी आम्‍ही खिंडसीला गेलो. नागपूरपासून जवळच असलेलं हे खिंडसी. रामटेकच्‍या राम मंदिरानंतर पाहायला मिळतं. निसर्गरम्‍य अशा ठिकाणी सर्वच जण इथं येतात. अगदी चिमुकल्‍यांपासून ते वृद्धांपर्यंत. तरुणाईसाठी तर सांगायचं कामच नाही. मनाला भावणारं असं हे खिंडसी पर्यटन. या पर्यटनाची मजा लुटली ती आम्‍ही.... म्‍हणजे माझे मित्र चंद्रकांत पाटील , संग्राम इंगळे आणि निलेशने. खूपच सुखावणारा अनुभव होता तो. तरुणाई , शाळकरी मुलं-मुली , शिक्षक , नवदांपत्‍य आणि भरभरून असलेला निसर्ग... डोळे कसे तृप्‍त करून जातो , ही इथं आल्‍यावरच कळतं. जलसफर गोवा आणि मुंबईत केली परंतु इथली जलसफरही तितक्‍याच तोडीची आहे. याठिकाणी येणा-या पर्यटकांची राहण्‍याची सोयही उत्‍तम आहे. जेवणाचीही व्‍यवस्‍था आहे , अगदी मांसाहारापासून शाकाहारापर्यंत , तेही चविष्‍ट. उन्‍हाळयात तर याठिकाणी प्रत्‍येकाने भेट द्यायलाच हवी , असं हे नयनरम्‍य असं ठिकाण आहे.  (व्‍हीडिओ सौजन्‍यः चंद्रकांत पाटील)