Skip to main content

Posts

Showing posts from September 17, 2015

आले गणराय

विघ्न दूर करण्यासाठी आले गणराय ...  कोकणातला गणेशोत्सव अतिशय उत्साहाचा. गोव्यातही मोठ्याप्रमाणात तो साजरा होतोच.  माटोळीने विशेष आकर्षण त्या गणरायाचं दिसतं. बाप्पा विघ्नहर्त्या, आमचे विघ्न दूर कर, असे म्हणत सर्वच जण महाराष्ट्रासह देश- विदेशातील गणेश भक्त आज गणरायाची स्थापना करतात. विदर्भातही मोठ्या उत्साहात गणरायाच्या आगमनासाठी गणेश मंडळं उत्सूक आहेत. काहीं नी आतापर्यंत गणेशाची स्थापना केलीय, तर आता रात्रीपर्यंत काही जण करतील, एकूणच या उत्सवासाठी सर्वांना शुभेच्छा.   विदर्भातील अष्टविनाायकांपैकी एक असलेल्या केळझरचा वरद विनायक वर्ध्यातीलच, हे विशेष. वर्धा-नागपूर मार्गावर असलेल्या सेलू तालुक्यात टेकडीवर वसिष्ठ ऋषींनी स्थापन केलेली ही वरद विनायकाची मूर्ती आहे. अत्यंत मनमोहक आणि निसर्गरम्य अशा परिसराने मनाला शांती मिळते.  जागृत गणेश म्हणून तो प्रसिद्ध आहे. वरद विनायक, सिद्धीविनायक या नावाने या गणेशाला संबोधले जाते. केळझरला पांडवांनी वास्तव्य केल्याचेही पोथी वाड्मयात सांगितले आहे. भीमाने बकासुरास येथेच ठार केल्याचे बोलले जाते. श्रीरामचंद्राचे गुरू वसिष्ठ ऋषींचे वास्तव्य याठिकाणी

पोळ्याचा सण

स्वार्थासाठी त्यांचा उपयोग करु नका हो ... काल पोळा झाला. काही मित्रांनी सेल्फी,छायाचित्र एफबीवर पोस्ट केले. शेतक-यांचा हा सण सर्वांनीच आनंदाने साजरा केला, खूप चांगले वाटले. परंतु याठिकाणी एक अनुभव आपणा सर्वांशी शेअर करावा वाटतोय. घडले असे, की शेतक-यांची चिंता न करणा-यांना (विश्‍ोषत: पांढरपेशी समाजाला) अचानकच आमच्या सख्याचा (बैलजोडीचा) एवढा कळवळा आलेला पाहून आश्चर्य वाटले. वर्ध्याच्या माझ्या शासकीय निवासस्थानाशेजारी सायंकाळी सहा- सातच्या सुमारास आजूबाजूचे शेजारी बैलांचा शोध घे त होते. कारण बैलाला नैवेद्य दिल्याशिवाय या बैलांना घरी गिळायला मिळणार नव्हते. म्हणून यांचा बैलांचा शोध सुरू झाला. बैलांचा शोध काही लागेना. क्वार्टरमधे राहणारी पुरूष मंडळी बैलाच्या शोधात आजूबाजूला फिरत होती. शासकीय निवासस्थान असल्याकारणाने इथे दूरवर कास्‍तकरांचा/ शेतक-यांचा राहण्याचा संबंध नाही. मग आता बैल शोधण्याची मोठी पंचाइत. इकडे आमच्या माता-भगिनी हातात नैवेद्याचा ताट घेऊन आमच्या बैलराजाची वाट पाहत होत्या. पण आपला घरातील महत्त्वाचा सण सोडून बाहेर (सिव्हिल लाईनला) कोण कशाला शेतकरी जाणार... तरीही एक व्यावसा