Skip to main content

Posts

Showing posts from February 7, 2018

हिंदी प्रचार सभेच्या प्रधानमंत्रीपदी प्रा.सुरेश पुरींची निवड

                    औरंगाबाद, दिनांक 7- हिंदी प्रचार आणि प्रसारासाठी नावलौकिक प्राप्त, स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्य करणाऱ्या हैद्राबाद येथील हिंदी प्रचार सभेच्या प्रधानमंत्री या सर्वोच्च पदावर पहिल्यांदाच महाराष्ट्रातील व्यक्तीची एकमताने निवड करण्यात आली आहे. संस्थेने हा मान प्रा.सुरेश पुरी यांना देऊन त्यांच्या कार्याची खऱ्या अर्थाने दखल घेतली आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा असा तुरा खोवला गेला.       आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यात हिंदी प्रचार आणि प्रसाराचे कार्य हिंदी प्रचार सभा, हैद्राबाद करते. १९३५  साली स्थापन झालेल्या या संस्थेमार्फत दक्षिण भारतात हिंदी प्रचार आणि प्रसाराचे कार्य होते. त्यात प्रा.पुरी यांचाही मोलाचा वाटा आहे. यापूर्वी प्रधानमंत्री पदाचा मान हैद्राबाद राज्याशिवाय इतर राज्याला मिळालेला नाही. परंतु प्रा.पुरी यांना हा मान मिळाल्याने त्यांच्या कार्यासह महाराष्ट्र राज्यासाठी देखील त्यांची निवड कौतुक,अभिमानास्पद अशीच आहे.       डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुमारे 30 वर्ष प्रा.पुरी यांनी वृत्तपत्रविद्या आणि ज

जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्याहस्ते फेब्रुवारीच्या लोकराज्य अंकाचे प्रकाशन

      औरंगाबाद,दि. 7 -जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री  प्रा.राम शिंदे आणि राष्ट्रीय जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या फेब्रुवारी महिन्याच्या लोकराज्य विशेषांकाचे प्रकाशन आज करण्यात आले. वाल्मी येथील जलनायक, जलयोद्धा उजळणी  प्रशिक्षण आणि चिंतनशिबिरात श्री. शिंदे यांनी लोकराज्य विशेषांकाचे  प्रकाशन केले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, मृद व जलसंधारण आयुक्त तथा वाल्मीचे महासंचालक दीपक सिंगला, राज्य जलसाक्षरता  केंद्राचे आनंद पुसावळे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या  मराठवाडा विभागाचे प्र. संचालक यशवंत भंडारे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदींची उपस्थिती होती. फेब्रुवारी महिन्याच्या लोकराज्य विशेषांकात साहित्य संमेलन, मराठी भाषा आणि व्यवसाय मार्गदर्शनावर भर देण्यात आला आहे. विविध तज्ज्ञांचे लेख यामध्ये समाविष्ट असून मलपृष्ठावर दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यावर आधारीत महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावलेले छायाचित्र देण्यात आलेले आहे.

जलसाक्षरता केंद्राच्या माध्यमातूनच जलयुक्त शिवार अभियानाची परिपूर्ती - प्रा. राम शिंदे

औरंगाबाद,दि. 7 - देशात राज्याने जलयुक्त शिवार अभियानात अव्वल कामगिरी केल्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी देखील या अभियानाची दखल घेतली आहे, ही आनंदाची बाब आहे. मात्र या अभियानाला जलसाक्षरतेची जोड आवश्यक असल्याने शासनाने जलसाक्षरता प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्याचे निर्देश दिले आहेत. या केंद्रातूनच खऱ्या अर्थाने जलयुक्त शिवार अभियान परिपूर्ण होणार असल्याचा विश्वास जलसंधाण व राजशिष्टाचार मंत्री प्रा.राम शिंदे यांनी व्यक्त केला. जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) येथील सभागृहात जलनायक, जलयोद्धा उजळणी प्रशिक्षण व चिंतन शिबिरात श्री. शिंदे बोलत होते. यावेळी जलबिरादरी प्रकल्पाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंद्र सिंह , आमदार अतुल सावे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, वाल्मीचे महासंचालक तथा मृद व जलसंधारणचे आयुक्त दीपक सिंगला, राज्य जलसाक्षरता केंद्राचे संचालक आनंद पुसावळे, उपायुक्त सूर्यकांत हजारे आदींची उपस्थिती होती. श्री. शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जलयुक्त शिवार अभियानाच्या महत्त्वाकांक्षी योजनेला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.  आजपर्यंत राज्