Skip to main content

Posts

Showing posts with the label Fishery

शेतकऱ्यांनी उत्पादनाच्या विपणनाबरोबर गुणवत्तेचा आग्रह धरावा - हरिभाऊ बागडे

                                                                                                            दिनांक.5.1.2018 औरंगाबाद, दि.05-स्पर्धेच्या युगात तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शेतकऱ्यांनी जागरुक रहावे. शेतमालाच्या विपणनाबरोबरच गुणवत्तेचा ध्यास धरावा, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले.                         अयोध्या नगरीत आयोजित तीन दिवसीय महाॲग्रो राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी श्री. बागडे बोलत होते. यावेळी पशु संवर्धन, मत्स्यव्यवसाय व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, खासदार चंद्रकांत खैरे, रावसाहेब दानवे, आमदार अतुल सावे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड, मसिआचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष समीर दुधगावकर, मुख्य समन्वयक ॲड. वसंत देशमुख, विजय बोराडे, उद्योजक राम भोगले, मानसिंग पवार, नंदलाल काळे, जगन्नाथ पाटील आदींची उपस्थिती होती. विधानसभा अध्यक्ष श्री. बागडे म्हणाले, आपला देश दूध उत्पादनात