Skip to main content

Posts

Showing posts from February, 2018

नाथषष्ठी सोहळ्यातील भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्या - अप्पर जिल्हाधिकारी सोरमारे

स्वयंसेवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन       औरंगाबाद,दि.27—राज्यातील महत्त्वाच्या सोहळ्यांपैकी पैठणचा नाथषष्ठी सोहळा आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून भाविक येतात. सर्व भाविकांना योग्य, आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. हा भक्तीमय सोहळा आनंददायी होण्यासाठी सर्व यंत्रणांनी निश्चित केलेली जबाबदारी पार पाडावी, अशा सूचना श्री एकनाथ महाराज विश्वस्त संस्थानचे कार्यकारी विश्वस्त तथा अप्पर जिल्हाधिकारी पी.एल.सोरमारे यांनी आज पैठण येथे अधिकाऱ्यांना केल्या. त्याचबरोबर स्वयंसेवकांनी यात्रा उत्सव व्यवस्थित पार पाडण्यासाठी पैठण नगर परिषदेत नाव नोंदणी करुन पुढाकार घ्यावा,असे आवाहनही श्री. सोरमारे यांनी केले.              पैठण येथील कीर्तन सभागृहात नाथषष्ठी सोहळ्याच्या आयोजनाबाबत पूर्वतयारी आढावा बैठक पार पडली. यावेळी श्री. सोरमारे बोलत होते. बैठकीस पैठणचे नगराध्यक्ष सूरज लोळगे, जिल्हा परिषदेचे सभापती विलास भुमरे उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, पैठण नगर परिषद मुख्य अधिकारी सो मनाथ जाधव, तहसीलदार महेश सावंत,पोलिस निरीक्षक चंदन ईमले, श्री. संत एकनाथ महाराज विश्वस्त मं

इज्तेमातील तैनात अधिकारी–कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी यांच्याकडून कौतूक

औरंगाबाद,दि. 26 - लिंबेजळगाव येथे तीन दिवसीय राज्यस्तरीय इज्तेमा सोहळ्यास मोठ्याप्रमाणावर भाविकांची उपस्थिती होती. सोहळ्यासाठी संयोजकांमार्फत चोख व्यवस्था करण्यात आली होती. संयोजकांकडून उपलब्ध सोयी-सुविधांवर सनियंत्रण, प्रसंगी शासकीय विभागामार्फत सुविधांची उपलब्धता करून देण्यासाठी एकूण 250 अधिकारी- कर्मचारी यांची नियुक्ती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली होती. सोहळ्यात चोख व व्यवस्थितपणे कामगिरी पार पाडल्याबद्दल या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतूक करत जिल्हाधिकारी श्री. राम यांनी त्यांचे अभिनंदन केले असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी सांगितले. लिंबेजळगाव येथील इज्तेमा सोहळा व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी, कायदा   व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 13 नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती व त्यांच्या अधिनस्थ 235 कर्मचाऱ्यांच्या पथकांची स्थापना जिल्हाधिकारी श्री. राम यांनी केली होती.   वैजापूरचे उपविभागीय अधिकारी यांनी   मुख्य संनियंत्रण अधिकारी आणि गंगापूर तहसीलदार यांनी सहाय्यक मुख्य संनियंत्रण अधिकारी म्हणून कामगिरी बजावली. इज्तेमा सोहळा व्यवस्थित पार पाडण्यात यावा या

एड्स नियंत्रण कार्यक्रमासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देणार - जिल्हाधिकारी

                औरंगाबाद,दि.23  –एड्समुक्त जिल्हा करण्यासाठी जनजागृतीवर अधिक भर द्यावा. लोकांमध्ये जागृती निर्माण करावी. रुग्णालयातील एड्स तपासणी कीटसाठी आवश्यक उपकरणाकरीता,माहिती, शिक्षण आणि संवादाकरीता आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज दिली.              जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या त्रैमासिक बैठकीत श्री. राम बोलत होते. जिल्ह्यातील आयसीटीसी, डापकु व प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर एड्स तपासणी कीट ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या उपकरणासाठी नव्याने प्रस्ताव सादर करण्यात यावा. माहिती, शिक्षण आणि संवादावरही भर देऊन मोठ्याप्रमाणात जिल्ह्यात एड्सबाबत जनजागृती व्हावी, यासाठी देखील प्रस्ताव द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. राम   यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या.             सुरुवातीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गोवर्धन गायकवाड यांनी समितीच्यावतीने जिल्हाधिकारी   श्री. राम यांचे स्वागत केले. जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांबाबत जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण पथक

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री लोणीकर यांनी इज्तेमा सोहळ्याची केली पाहणी

औरंगाबाद,दि. 23 –लिंबे जळगाव येथे दि. 24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या इज्तेमा सोहळ्याच्या ठिकाणाची पाहणी करुन येथील भाविकांशी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दि. 22 रोजी संवाद साधला.   यावेळी इज्तेमा आयोजन समितीच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमास आमदार अतुल सावे, एकनाथ जाधव, राजू बागडे, हाजी मोहम्मद, एजाज देशमुख, आयोजन समितीचे डॉ. रियाज शेख, आयेशा खान, अतिक खान यांची उपस्थिती होती. कारी शकील, आमीर साहब, जुबेर मोतीवाला, लिंबेगावचे सरपंच अनिक अमिर पटेल आदींसह बाहेरुन आलेल्या धर्मगुरु, भाविकांशी श्री. लोणीकर यांनी संवाद साधला. तसेच सोहळ्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सोयीसुविधांची देखील श्री. लोणीकर यांनी यावेळी पाहणी केली. ******

मुदत द्या, नक्कीच कायमस्वरूपी प्रश्न सोडवू -डॉ. दीपक सावंत

नारेगाव येथील कचरा डेपोची पालकमंत्र्यांकडून पाहणी औरंगाबाद, दिनांक 23- नारेगाव कचरामुक्त व्हावे, यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे. प्रश्न चर्चेने सुटतात, त्याकरिता आपण सकारात्मक पद्धतीने नारेगावचा कचरा प्रश्न कायमस्वरूपी सोडवू. मात्र, त्यासाठी नारेगाववासीयांनी काही महिन्यांची मुदत प्रशासनाला द्यावी, असे आवाहन पालकमंत्री तथा आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज केले. नारेगाव येथे सुरू असलेल्या ग्रामस्थांच्या आंदोलनाला भेट देऊन श्री. पालकमंत्री सावंत यांनी गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मुंबई, पुण्याचा कचरा प्रश्न मार्गी लावला. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनीदेखील नारेगावच्या कचरा समस्येत लक्ष घातले असून ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी ग्रामस्थांनीदेखील शासनाला सहकार्याच्या भूमिकेतून मुदत द्यावी, असे आवाहन श्री.सावंत यांनी यावेळी गावकऱ्यांना केले. पर्यायी जागा उपलब्धतेसाठी जिल्हाधिकारी जागा शोधतील, परंतु त्याला गावकऱ्यांनीदेखील सकारात्मक तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही श्री. सावंत यांनी ग्रामस्थांना आवाहन केले. यावेळी खासदार चंद्रकांत खै

समाजाचा सर्वांगीण विकास साधा - महादेव जानकर

Ø राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचा औरंगाबादेत   शुभारंभ Ø देशातील पहिली योजना, भविष्यात 1 लाख लाभार्थ्यांना होणार लाभ औरंगाबाद,दि. 17   – राजे यशवंतराव होळकर महामेष योजना सहा मुख्य घटकांसह सन 2017-18 या आर्थिक वर्षापासून भटक्या जमातीतील लाभार्थ्यांसाठी राज्यात 34 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेचा शुभारंभ आज औरंगाबादेतून होत असल्याने आनंद वाटतो, असे मत पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केले. शेतकरी, मेंढपाळ, मजुर आदींच्या पाल्यांनी नियमित अभ्यास करावा. कष्टाने महत्त्वाच्या सर्वोच्च पदांवर पोहचवून समाजाचा सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन श्री. जानकर यांनी केले.    पडेगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळामार्फत आयोजित राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचा शुभारंभ व शेळ्या-मेंढ्यांचे खाद्य बनविणाऱ्या फिड मिलच्या उद्घाटनप्रसंगी श्री जानकर बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आयुक्त कांतीलाल उमाप, अतिरिक्त आयुक

उद्योगक्षेत्रात सातत्याने संशोधनाची आवश्यकता - उद्योगमंत्री देसाई

औरंगाबाद,दि. 16 – उद्योगक्षेत्राला शिक्षणक्षेत्राची जोड महत्त्वाची आहे. या शिक्षण क्षेत्राच्या सहकार्याने उद्योगक्षेत्रात सातत्याने संशोधनाची आवश्यकता निर्माण झाल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज केले. तरुणांनी उद्योजक होण्यासाठी संशोधनावर भर देऊन उद्योजक होण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले.   पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या (पीइएस) अभियांत्रिकी महाविद्यालयात चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज आणि ॲग्रीकल्चर (सीएमआयए) च्यावतीने आयोजित चौथ्या ‘एनर्जी    कॉन्क्लेव्ह 2018 ’ मध्ये   श्री. देसाई बोलत होते. यावेळी पीइएसचे   प्राचार्य डॉ. अभिजित वाडेकर, सीएमआयएचे अध्यक्ष प्रकाश कोकील, डॉ. बी.एन. चौधरी, राहुल देशपांडे यांची उपस्थिती होती. श्री. देसाई म्हणाले, राज्य शासनाने नुकतेच महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेईकल धोरण जाहीर केले आहे. या धोरणाच्या माध्यमातून राज्यात 25 हजारकोटींच्या गुंतवणुकीसह एक लाख रोजगार निर्मितीचे लक्ष गाठण्यात येणार असल्याचेही श्री. देसाई म्हणाले. सध्या राज्यात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. त्यातून  

लघु उद्योजकांनी उद्योगक्षेत्रात भरारी घ्यावी - सुभाष देसाई

औरंगाबाद,दि. 16 – दुर्दम्य इच्छाशक्ती आणि स्वत: वर विश्वास ठेवून उद्योग उभारणीसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेत लघु उद्योजकांनी उद्योगक्षेत्रात भरारी घ्यावी, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज केले. हॉटेल विंडसर कॅसल येथे राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती   हबच्या 19 व्या राज्यस्तरीय बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी श्री. देसाई बोलत होत. यावेळी सुक्ष्म व लघु मंत्रालयाचे संचालक पीजीएस राव, पी. उदयकुमार, आर. बी. गुप्ते, उद्योग संचालनालयाचे सहसंचालक दिलीप गुरूलवार, राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळाचे क्षेत्रीय प्रमुख पी. कृष्ण मोहन, बुद्धीष्ट इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग ॲन्ड ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष नंदकिशोर रत्नपारखे, उच्च अधिकार नियंत्रण समितीचे सदस्य सुनील झो डे, मसिआचे अध्यक्ष सुनील किर्दक   उपस्थित होते. श्री. देसाई म्हणाले, जमशेदजी टाटा, धीरूभाई अंबानी, लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी अगदी छोट्या व्यवसायापासून सुरूवात केली. परंतु सातत्य आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी   नावलौकिक प्राप्त केला. लघु उद्योजकांनी त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन र

पालकमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून पिकांची पाहणी

औरंगाबाद,दि. 15 - बोंडअळी, गारपिटीने झालेल्या पिकांच्या नुकसानीची आज पालकमंत्री तथा आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी पाहणी करुन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. त्याचबरोबर होणाऱ्या नुकसानीबाबत हानी टाळण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करा, असे निर्देश कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.   सिल्लोड तालुक्यातील वरखेडी, बनकिन्होळा आणि फुलंब्री तालुक्यातील नायगव्हाण, महालकिन्होळा याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी डॉ. सावंत यांनी केली, शेतकऱ्यांशी संवादही साधला. वरखेडी येथे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याहस्ते पालकमंत्री डॉ. सावंत यांचे प्रशासनाच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर , अप्पर जिल्हाधिकारी पी.एल.सोरमारे, प्रशिक्षणार्थी तहसीलदार सौरभ कटियार, उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, तालुका कृषी अधिकारी श्री. आघाव आदींची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी येथील संतोष फलके यांच्याशेतात तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील कापूस उत्पादन पिकांब

जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे कामांचे जिओ टॅगिंग करा - नवल किशोर राम

औरंगाबाद, दि.14 -   शासनाच्या महत्त्वाकांक्षी अशा जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे योजनेच्या झालेल्या कामांचे जिओ टॅगिंग करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्यात.           जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनांचा आढावा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना योजना वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही दिले. अनुलोम संस्थेच्या सहकार्याने ग्रामपंचायतींच्या माध्यमातून जिल्ह्यातील तलावांचे कामे करण्यात यावीत. सन 2016-17 मध्ये जिल्ह्यात 201 गावांमध्ये जलयुक्त शिवाराची कामे पूर्ण झालीत. तरी देखील संपूर्णत: जिओ टॅगिंग झालेले नाही. तरी जलसंधारण, कृषी, वन, जिल्हा परिषद व इतर कार्यालयाकडून झालेल्या विहिर पुनर्भरण, लोकसहभागातील कामाचे जिओ टॅगिंग करावे. त्याचबरोबर सर्व कामांमध्ये पारदर्शकता ठेवून इ-टेंडरिंगव्दारे कामे पार पाडावीत. झालेल्या कामाचा परिपूर्ती अहवाल तत्काळ कृषी कार्यालयाला कळवावा, असेही श्री. राम यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले.

पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करा – डॉ. गडप्पा

औरंगाबाद,दि. 8 - प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याची (पीसीपीएनडीटी) प्रभावीपणे अंमलवजावणीसाठी जिल्हास्तरीय सल्लागार समितीमार्फत योग्य अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश देण्यात येतात. तरीही या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सर्व अधिकाऱ्यांनी अधिक प्रभावीपणे कार्य करावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष तथा घाटीचे प्रसूती व स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी केले.           घाटीच्या प्रसूती व स्त्रीरोग विभागात श्री. गडप्पा यांच्या दालनात आयोजित जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत बोलत होते. यावेळी समितीचे सदस्य बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पाटील, क्ष-किरण विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. वर्षा शेटे, डॉ. घाटकर आदींची उपस्थिती होती.           डॉ. गडप्पा म्हणाले, सोनोग्राफी केंद्राने सोनोग्राफी करावयाच्या संदर्भात करावयाच्या सर्व नोंदी व्यवस्थित व अद्यावत ठेवाव्यात. सोनोग्राफी केंद्राकडून सोनोग्राफी होत नसेल तरीही नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच टूडीइको, सिटीस्कॅन आणि एमआरआयसाठी नोंदणी आवश्यक आहे. सोनोग्राफी करणाऱ्या नेत्र तज्ञांनीदेखील सोनोग्राफी केंद्र व यंत्रांची नोंदणी करणे

हिंदी प्रचार सभेच्या प्रधानमंत्रीपदी प्रा.सुरेश पुरींची निवड

                    औरंगाबाद, दिनांक 7- हिंदी प्रचार आणि प्रसारासाठी नावलौकिक प्राप्त, स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्य करणाऱ्या हैद्राबाद येथील हिंदी प्रचार सभेच्या प्रधानमंत्री या सर्वोच्च पदावर पहिल्यांदाच महाराष्ट्रातील व्यक्तीची एकमताने निवड करण्यात आली आहे. संस्थेने हा मान प्रा.सुरेश पुरी यांना देऊन त्यांच्या कार्याची खऱ्या अर्थाने दखल घेतली आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा असा तुरा खोवला गेला.       आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यात हिंदी प्रचार आणि प्रसाराचे कार्य हिंदी प्रचार सभा, हैद्राबाद करते. १९३५  साली स्थापन झालेल्या या संस्थेमार्फत दक्षिण भारतात हिंदी प्रचार आणि प्रसाराचे कार्य होते. त्यात प्रा.पुरी यांचाही मोलाचा वाटा आहे. यापूर्वी प्रधानमंत्री पदाचा मान हैद्राबाद राज्याशिवाय इतर राज्याला मिळालेला नाही. परंतु प्रा.पुरी यांना हा मान मिळाल्याने त्यांच्या कार्यासह महाराष्ट्र राज्यासाठी देखील त्यांची निवड कौतुक,अभिमानास्पद अशीच आहे.       डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुमारे 30 वर्ष प्रा.पुरी यांनी वृत्तपत्रविद्या आणि ज

जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्याहस्ते फेब्रुवारीच्या लोकराज्य अंकाचे प्रकाशन

      औरंगाबाद,दि. 7 -जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री  प्रा.राम शिंदे आणि राष्ट्रीय जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या फेब्रुवारी महिन्याच्या लोकराज्य विशेषांकाचे प्रकाशन आज करण्यात आले. वाल्मी येथील जलनायक, जलयोद्धा उजळणी  प्रशिक्षण आणि चिंतनशिबिरात श्री. शिंदे यांनी लोकराज्य विशेषांकाचे  प्रकाशन केले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, मृद व जलसंधारण आयुक्त तथा वाल्मीचे महासंचालक दीपक सिंगला, राज्य जलसाक्षरता  केंद्राचे आनंद पुसावळे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या  मराठवाडा विभागाचे प्र. संचालक यशवंत भंडारे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदींची उपस्थिती होती. फेब्रुवारी महिन्याच्या लोकराज्य विशेषांकात साहित्य संमेलन, मराठी भाषा आणि व्यवसाय मार्गदर्शनावर भर देण्यात आला आहे. विविध तज्ज्ञांचे लेख यामध्ये समाविष्ट असून मलपृष्ठावर दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यावर आधारीत महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावलेले छायाचित्र देण्यात आलेले आहे.

जलसाक्षरता केंद्राच्या माध्यमातूनच जलयुक्त शिवार अभियानाची परिपूर्ती - प्रा. राम शिंदे

औरंगाबाद,दि. 7 - देशात राज्याने जलयुक्त शिवार अभियानात अव्वल कामगिरी केल्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी देखील या अभियानाची दखल घेतली आहे, ही आनंदाची बाब आहे. मात्र या अभियानाला जलसाक्षरतेची जोड आवश्यक असल्याने शासनाने जलसाक्षरता प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्याचे निर्देश दिले आहेत. या केंद्रातूनच खऱ्या अर्थाने जलयुक्त शिवार अभियान परिपूर्ण होणार असल्याचा विश्वास जलसंधाण व राजशिष्टाचार मंत्री प्रा.राम शिंदे यांनी व्यक्त केला. जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) येथील सभागृहात जलनायक, जलयोद्धा उजळणी प्रशिक्षण व चिंतन शिबिरात श्री. शिंदे बोलत होते. यावेळी जलबिरादरी प्रकल्पाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंद्र सिंह , आमदार अतुल सावे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, वाल्मीचे महासंचालक तथा मृद व जलसंधारणचे आयुक्त दीपक सिंगला, राज्य जलसाक्षरता केंद्राचे संचालक आनंद पुसावळे, उपायुक्त सूर्यकांत हजारे आदींची उपस्थिती होती. श्री. शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जलयुक्त शिवार अभियानाच्या महत्त्वाकांक्षी योजनेला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.  आजपर्यंत राज्

ग्राहक जागृती मोठ्याप्रमाणात करा - भारत कदम

औरंगाबाद,दि. 5 -ग्राहकांना त्यांच्या हक्कांबाबत जागृत करण्याचे कार्य जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात करण्यात येऊन ग्राहक हक्कांचे संरक्षण, संवर्धन  करावे,   असे आवाहन  जिल्हा पुरवठा  अधिकारी तथा परिषदेचे सदस्य  सचिव डॉ. भारत कदम यांनी केले.  जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या दालनात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत सदस्यांना मार्गदर्शन करताना डॉ. कदम बोलत होते. यावेळी परिषदेचे राधाकिशन भोसले, देवयानी भारस्वाडकर, राजेश मेहता, नानक वेदी , डॉ. जमादार, मीरा काथार, एस.सी. वसावे, एम.बी.काळे, रावसाहेब नाडे आदींची उपस्थिती होती. बैठकीत ग्राहकाकरिता वस्तूंची उपलब्धता, गुणवत्ता, वस्तूचे दर, ग्राहकांना पुरविल्या जाणाऱ्या सेवा आदी समस्यांबाबत विचार विनिमय झाला. ग्राहकांचे हित लक्षात घेऊन समाजातील विविध यंत्रणांकडून जिल्हा प्रशासनाला उपाययोजना सूचविण्यासाठी, शिफारस करण्यासाठी परिषदेतील सदस्यांनी कार्य करणे अपेक्षित असल्याचे डॉ. कदम म्हणाले. त्याचबरोबर ग्राहकांचे हित जपण्यासाठी, ग्राहक संरक्षण (सुधारणा ) अधिनियमानुसार कार्यवाही  करण्यात यावी, असेही डॉ. कदम या

प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा - अर्थमंत्री मुनगंटीवार

औरंगाबाद,दि. 5 -सुशिक्षित बेरोजगार, कल्पक उमदे तरुण, उद्योजकतेची आवड असणाऱ्या समाजातील सर्व घटकांनी प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन वित्त आणि नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.  औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने मुद्रा योजनेच्या प्रचार, प्रसारासाठी तयार करण्यात आलेल्या फ्लेक्स आणि घडी पुस्तिकेच्या विमोचनानंतर श्री. मुनगंटीवार बोलत होत. यावेळी पालकमंत्री तथा आरोग्य व कुटुंब  कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, कौशल्य विकासमंत्री संभाजीराव पाटील- निलंगेकर, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, खासदार चंद्रकात खैरे, आमदार अतुल सावे , संजय शिरसाट, इम्तियाज जलिल, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, माहिती व जनसंपर्क विभागाचे  प्रभारी संचालक यशवंत भंडारे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, मराठवाड्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  जिल्हयात प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा प्रचार आणि प्रसार होण्याच्या दृष्

आरोग्य, शिक्षण, पाणी, रोजगाराला निधीची कमतरता पडू देणार नाही - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

औरंगाबाद, दि. 5  – औरंगाबाद विभागातील आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय रुग्णालय, घाटीच्या सिटीस्कॅन यंत्रासाठी तत्काळ निधी मंजूर करण्यात येईल. तसेच जिल्ह्याच्या आरोग्य सुविधा, शिक्षण, पाणी, रोजगार या मुलभूत सुविधांसाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे आज सांगितले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हा वार्षिक योजना 2017-2018 च्या आढावा बैठकीत ते बोलत होते. घाटीतील आवश्यक उपचार साधनांपैकी एमआरआय यंत्रासाठी शिर्डी संस्थानच्या माध्यमातून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करावा. सुभेदारी विश्रामगृहाच्या  नूतनीकरणासाठी 3 कोटी, शासकीय दंत महाविद्यालयाकरीता 2 कोटी रु. तरतुदीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, विभागीय क्रीडा संकुलाकरिता क्रीडा विभागाच्या आयुक्तांशी चर्चा करून प्रस्ताव सादर केल्यास क्रीडा खात्याकडून रु. 7 कोटींची तरतूद मार्चमधील पुरवणी मागण्यात मान्य करता येईल असे श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. शहरातील विस्तारीकरणाचा विचार करुन नागरिकांना करमणूक सार्वजनिक उद्यान आवश्यक असल्याचे आमदार संजय शिरसाट यांनी सांगितल