Skip to main content

हिंदी प्रचार सभेच्या प्रधानमंत्रीपदी प्रा.सुरेश पुरींची निवड

                  औरंगाबाद, दिनांक 7- हिंदी प्रचार आणि प्रसारासाठी नावलौकिक प्राप्त, स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्य करणाऱ्या हैद्राबाद येथील हिंदी प्रचार सभेच्या प्रधानमंत्री या सर्वोच्च पदावर पहिल्यांदाच महाराष्ट्रातील व्यक्तीची एकमताने निवड करण्यात आली आहे. संस्थेने हा मान प्रा.सुरेश पुरी यांना देऊन त्यांच्या कार्याची खऱ्या अर्थाने दखल घेतली आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा असा तुरा खोवला गेला.

      आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यात हिंदी प्रचार आणि प्रसाराचे कार्य हिंदी प्रचार सभा, हैद्राबाद करते. १९३५  साली स्थापन झालेल्या या संस्थेमार्फत दक्षिण भारतात हिंदी प्रचार आणि प्रसाराचे कार्य होते. त्यात प्रा.पुरी यांचाही मोलाचा वाटा आहे. यापूर्वी प्रधानमंत्री पदाचा मान हैद्राबाद राज्याशिवाय इतर राज्याला मिळालेला नाही. परंतु प्रा.पुरी यांना हा मान मिळाल्याने त्यांच्या कार्यासह महाराष्ट्र राज्यासाठी देखील त्यांची निवड कौतुक,अभिमानास्पद अशीच आहे.
      डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुमारे 30 वर्ष प्रा.पुरी यांनी वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद विभागात अध्यापनाचे कार्य केले. यावेळी त्यांनी विभागप्रमुख आणि विविध महत्त्वाच्या पदांवर आपला ठसा उमटविला. सन 2010 मध्ये विद्यापीठातून नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त झाल्यानंतर त्यांनी 2011 पासून हैद्राबादच्या हिंदी प्रचार सभेसाठी परीक्षा मंत्री म्हणून पूर्णवेळ कार्यास सुरुवात केली. विद्यार्थीप्रिय म्हणून त्यांची राज्यात ख्याती आहे.
‘जनसंपर्क संकल्पना आणि सिद्धांत’ हे मराठीतील पहिले जनसंपर्क विषयावरील प्रसिद्ध पुस्तक त्यांनी काढले. आता त्या पुस्तकाचा हिंदी अनुवादही प्रकाशित करण्यात आला आहे. त्यांचे विद्यार्थी शासनाच्या माहिती व जनसंपर्क, शासकीय जनसंपर्क यंत्रणा, महाराष्ट्र वीज वितरण कंपनीत मोठ्या हुद्यावर अधिकारी पदावर आहेत. हिंदी प्रचारसभेच्या सर्वसाधारण समितीच्या बैठकीत (संचालन) दिनांक 6 रोजी प्रा.पुरी यांची एकमताने निवड झाल्याने त्यांच्या हितचितकांसह, आप्तस्वकीय, सहकारी आणि विद्यार्थी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. तसेच सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Comments

Popular posts from this blog

मनीषा दांडगेचा ‘खडतर प्रवास, जिद्द आणि यश’

दिनांक:- 16-05-2017 लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी पदाची निवड 2013 मध्ये झाली. 2014 मध्ये पोस्टींग मिळाली. परंतु ‘ झोपडपट्टीतील तरूणी झाली उपजिल्हाधिकारी’   अशा आशयाचा मजकूर तरूणांना अजूनही फेसबुक, न्यूज वेब पोर्टल अन् व्हाटसअ्पव्दारे प्रेरित करत आहे. स्पर्धा परीक्षकांसाठी प्रेरणादायी अशीच चंद्रपूर जिल्ह्यातील मूलच्या उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे यांची यशकथा. व्हाटस्अप  आणि आई             व्हाटसअपवरील संदेश उपजिल्हाधिकारी झालेल्या मनीषा दांडगे यांच्या आईला आजही त्यांच्या राहत्या घराच्या परिसरातील तरूण वर्ग वाचून दाखवतात. तेव्हा आईला लेकीचा अभिमान अन् मिळविलेल्या पदाचा झालेला आनंद हा गगनात मावेनासा होतो. परिसरातील तरूण वर्गही झपाट्याने अभ्यास करून डोळ्यासमोर मनीषा दांडगे यांचा आदर्श ठेवून स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षणाचा ध्यास घेत आहे,  शिकत आहे, असे आई असलेल्या लक्ष्मी दांडगे अभिमानाने सांगतात. बुध्दिमत्तेची चुणूक             तसा हा परिसर म्...

भूसंपादन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा उपयुक्त -नवल किशोर राम

दिनांक 31 जानेवारी 2018 औरंगाबाद,दि. 31   - भूसंपादन कायद्याबाबत सखोल माहिती होऊन योग्य आणि प्रभावीपणे कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी भूसंपादन प्रशिक्षण कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण, उपयुक्त असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा, पारदर्शकतेचा हक्क अधिनियमावर आधारीत जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम बोलत होते. यावेळी उपायुक्त महेंद्र हरपाळकर, अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन समन्वय) मंजुषा मुथा आदींसह सर्व उपविभागीय अधिकारी नायब तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ आदी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेला सुरुवात झाली. कार्यशाळेत नवीन भूसंपादन अधिनियम 2013 कायद्यातील महत्त्वाच्या बाबी, भूसंपादन प्रस्ताव सादर करणे, सामाजिक परिणाम निर्ध...

मुदत द्या, नक्कीच कायमस्वरूपी प्रश्न सोडवू -डॉ. दीपक सावंत

नारेगाव येथील कचरा डेपोची पालकमंत्र्यांकडून पाहणी औरंगाबाद, दिनांक 23- नारेगाव कचरामुक्त व्हावे, यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे. प्रश्न चर्चेने सुटतात, त्याकरिता आपण सकारात्मक पद्धतीने नारेगावचा कचरा प्रश्न कायमस्वरूपी सोडवू. मात्र, त्यासाठी नारेगाववासीयांनी काही महिन्यांची मुदत प्रशासनाला द्यावी, असे आवाहन पालकमंत्री तथा आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज केले. नारेगाव येथे सुरू असलेल्या ग्रामस्थांच्या आंदोलनाला भेट देऊन श्री. पालकमंत्री सावंत यांनी गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मुंबई, पुण्याचा कचरा प्रश्न मार्गी लावला. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनीदेखील नारेगावच्या कचरा समस्येत लक्ष घातले असून ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी ग्रामस्थांनीदेखील शासनाला सहकार्याच्या भूमिकेतून मुदत द्यावी, असे आवाहन श्री.सावंत यांनी यावेळी गावकऱ्यांना केले. पर्यायी जागा उपलब्धतेसाठी जिल्हाधिकारी जागा शोधतील, परंतु त्याला गावकऱ्यांनीदेखील सकारात्मक तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही श्री. सावंत यांनी ग्रामस्थांना आवाहन केले. यावेळी खासदार चंद्रकांत खै...