Skip to main content

Posts

सायबर सुरक्षेसाठी जनजागृती आवश्यक - डॉ.आरती सिंह

  दिनांक 23 जानेवारी 2018 औरंगाबाद, दि.23 : आजच्या काळात सायबर सुरक्षा, खबरदारी आणि जनजागृतीची गरज आहे. तंत्रज्ञानामुळे वाढलेली सायबर गुन्हेगारी कमी होण्यास त्यामुळे मदतच होणार असल्याचे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह यांनी आज येथे केले. औरंगाबाद पोलिस आयुक्तालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एमजीएम परिसरातील आर्यभट्ट सभागृहात माध्यम प्रतिनिधींसाठी सायबर गुन्हे आणि जनजागृती अभियानांतर्गत सायबर सुरक्षा विषयक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीमती सिंह बोलत होत्या. पोलीस उपायुक्त डॉ.दीपाली धाटे-घाडगे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे माहिती संचालक देवेंद्र भुजबळ, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात,  आयसीआयसीआय बँकेचे शेखर शिंदे, शासकीय न्यायवैद्यकीय आणि विज्ञान संस्थेचे प्रा. डॉ.चरणसिंग कायटे, सहायक पोलीस आयुक्त श्री.कोडे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ.सिंह म्हणाल्या, पोलिस यंत्रणा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिक मजबूत झाली आहे. माहिती तंत्रज्ञ

घटना दुरूस्तीवर अधिकारी, पदाधिकारी, तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन

  औरंगाबाद, दि.22 :  राज्य निवडणूक आयोगाच्या संकल्पनेवर आधारित 73 व 74 व्या घटनादुरूस्तीला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोकशाही निवडणूक, सुशासनावर आधारीत असलेल्या विभागीय परिषदेत प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी आणि ज्येष्ठ तज्ज्ञांनी विचारमंथन करून उपस्थितांना आजच्या विभागीय परिषदेत मार्गदर्शन केले.  परिषदेचे आयोजन राज्य निवडणूक आयोगाच्या नियंत्रणाखाली विभागीय आयुक्त कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगर पालिका यांच्यावतीने मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी येथे करण्यात आले होते.  उद्घाटन सत्रानंतर चार सत्रांत तज्ज्ञांनी लोकशाहीची प्रक्रिया, घटना दुरूस्ती, मतदान, मतदान प्रक्रिया, अंमलबजावणी, स्त्रियांचे हक्क आणि जबाबदारी, घटना दुरूस्तीनंतर महिलांचे सशक्तीकरण आदी विषयांवर विचार मांडले. स्थानिक स्वराज्य संस्था व शासनाचे संबंध व उद्भवणाऱ्या अडीअडचणी, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सर्वसमावेशक प्रशासन, निवडणूक सुधारणा या विषयावर तीन सत्र पार पडली. स्थानिक स्वराज्य संस्था व शासनाचे संबंध या पहिल्या सत्रात कृषी परिषदेचे

घटना दुरुस्तीमुळे राष्ट्रनिर्माणात महिलांना समान संधी - विजया रहाटकर

औरंगाबाद,दि. 22- प्राचीन काळापासून पंचायत राज व्यवस्था देशात आहे. कालांतराने त्यात बदल होत गेले घटना दुरुस्तीमुळे महिलांना भरभ रुन संधी देण्यात आली  त्यात विशेषत्वाने पुरुषांच्या  बरोबरीचे समान स्थान महिलांना या घटना दुरुस्तीतून मिळाल्याने देशाची विकासाची व्दारे खुली झाल्याचे प्रतिपादन राज्य महिला आयेागाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी केले. Add caption मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी येथे 73 व 74 व्या घटना दुरुस्तीच्या 25 वर्षापुर्ती निमित्त  ‘प्रगती आणि भावी वाटचाल ’ यावर आयोजित विभागीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी श्रीमती रहाटकर बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, महापौर नंदकुमार घोडेले, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. बी.ए. चोपडे, मनपा आयुक्त डॉ. एम. मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकरी अधिकारी मधुकरराजे अर्दड, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, राज्य निवडणूक आयोगाचे मृदूल निळे, अवर सचिव रीना फणसेकर, कृषी परिषदेचे सेवानिवृत्त संचालक के.एम. ना

होमिओपॅथीच्या शिक्षण विकासाला प्रथम प्राधान्य - श्रीपाद नाईक

औरंगाबाद :  प्राचीन काळापासून सुरक्षित चिकित्सापद्धती म्हणून होमिओपॅथीला पुढे नेण्यासाठी केंद्राच्या आयुष मंत्रालयामार्फत मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. शिक्षण, संशोधनाला यामध्ये प्राधान्य देण्यात आले असून या माध्यमातून अधिकाधिक रुग्णांची सेवा व्हावी हा उद्देश असल्याचे केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले. पडेगाव येथील सायली चॅरिटेबल ट्रस्टच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी श्री.नाईक बोलत होते. यावेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे डॉ.दिलीप म्हैसेकर, आमदार अतुल सावे, केंद्रीय होमिओपॅथी परिषदेचे अध्यक्ष डॉ. रामजी सिंह, उपाध्यक्ष डॉ. अरुण भस्मे, एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, सचिव अंकुशराव कदम आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय राज्यमंत्री श्री.नाईक म्हणाले, केंद्र सरकारने होमिओपॅथीला पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. देशात 218 महाविद्यालयातून हजारो विद्यार्थी या शिक्षणाकडे वळले आहेत. देशात होमिओपॅथी शिक्षणाचा प्रचार व प्रसार व्हावा. त्या माध्यमातून चांगले डॉक्टर्स घडावेत. रुग्णांची सेवा उत्तमप्रकारे त्या

मुद्रा बँक चित्ररथाचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते उद्घाटन

            दिनांक सोमवार, १५ जानेवारी, २०१८ औरंगाबाद :  प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनांच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी औरंगाबाद जिल्हा माहिती कार्यालयातर्फे तयार करण्यात आलेल्या मुद्रा बँक चित्ररथाचे उद्घाटन आज पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते झाले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चित्ररथाचे फित कापून पालकमंत्री कदम यांनी उद्घाटन केले. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, आमदार अतुल सावे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदींसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेच्या माध्यमातून योजनेच्या लाभाबाबत ध्वनीफीत, पथनाट्य आणि माहिती पत्रकांद्वारे जिल्ह्यातील दीडशे गावांमध्ये दोन चित्ररथाद्वारे प्रचार आणि प्रसिद्धी करण्यात येणार आहे. या चित्ररथाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरजूंसह पात्र लाभार्थ्यांना लाभ होणार आहे. या चित्ररथामुळे प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना गावागावापर्यंत पोहचविण्यास मदतच होईल. या उपक्रमामुळे सर्वसामान्यांमध्ये योजनांबाबत जागृती निर्माण होईल. हा उपक्रम स्तुत्य असून लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे

लासूर येथील महाआरोग्य शिबिरातील रुग्णांवर फेब्रुवारी अखेरपर्यंत मोफत शस्त्रक्रिया

  खुलताबाद तालुक्यातील नेत्ररुग्णांनी घाटीमध्ये सोमवार, मंगळवार, बुधवारी अनुक्रमे दि.22,23 आणि 24  रोजी तर कन्नड, औरंगाबाद तालुक्यातील नेत्ररुग्णांनी दि. 29,30 आणि 31 रोजी शस्त्रक्रियेसाठी आवश्यक तपासणीसह नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालयात करुन महाआरोग्य शिबिरातील नस्तीसोबत घाटीमध्ये तालुका आरोग्य अधिकारी यांचेमार्फत दाखल व्हावे.   जिल्हा सामान्य रुग्णालयात वैजापूर तालुक्यातील नेत्ररुग्णांनी सोमवार दि. 22 आणि 29 रोजी व गंगापूर तालुक्यातील नेत्र रुग्णांनी दि. 17,24आणि 31 रोजी मोफत शस्त्रक्रियेसाठी उपस्थित राहावे.                    औरंगाबाद,दि.15- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय  शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नुकत्याच लासूर येथे पार पडलेल्या महाआरोग्य शिबिरात आलेल्या रुग्णांवर वेळेत उपचारांची प्रक्रिया सुरु आहे. शिबिरात आलेल्या रुग्णांना आवश्यक त्या मोफत शस्त्रक्रियेबाबत संपर्क साधून फेब्रुवारी अखेरपर्यंत त्यांच्यावर उपचार करण्यात येणार असल्याचे आजच्या आढावा बैठकीत ठरविण्यात आले.           जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आयो

राष्ट्रमाता, राजमाता माँ जिजाऊ

दिनांक 12 जानेवारी 2018 जिजाऊ शिवबांच्या आदर्श माता, आदर्श गुरूही. कर्तृत्वान, वात्स्ल्य, ममता, मुत्सद्दीपणा, उत्तम निर्णयशक्ती, आत्मसन्मान, तल्लख बुद्धिमत्ता, दृढनिश्चय, विनयशीलता, संघटनकौशल्य, औदार्य, महत्त्वाकांक्षा, त्याग, नि:स्वार्थीवृत्ती अशा विविध गुणांचा राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ संगमच. माँ जिजाऊंचा आज जन्म दिवस त्यानिमित्त त्यांच्या महान कार्याला स्मरण करून कोटी कोटी वंदन.            शिवबांच्या जडणघडणीत जिजाऊंचा अनमोल असा वाटा.  जन्मापासूनच शिवबांना राजमाता जिजाऊंचा सहवास अधिक लाभल्याने असाधारण अशी मातृभक्ती त्यांच्यात निर्माण झाली.  हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणा-या राजमाता जिजाऊ आऊसाहेब! रयतेवर पोटच्या लेकराप्रमाणे प्रेम करण्याचे बाळकडू ज्या मातेने दिले त्या म्हणजे राजमाता जिजाऊ.    जिजाऊंचा जन्म विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा इथला. देवगिरी, यादव वंशातील लखुजीराजे जाधव, म्हाळसाबाई यांच्या त्या कन्या. लखुजीराजेंचे घराणे वैभवशाली, स