Skip to main content

घटना दुरूस्तीवर अधिकारी, पदाधिकारी, तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन

 औरंगाबाद, दि.22 : राज्य निवडणूक आयोगाच्या संकल्पनेवर आधारित 73 व 74 व्या घटनादुरूस्तीला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोकशाही निवडणूक, सुशासनावर आधारीत असलेल्या विभागीय परिषदेत प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी आणि ज्येष्ठ तज्ज्ञांनी विचारमंथन करून उपस्थितांना आजच्या विभागीय परिषदेत मार्गदर्शन केले. 
परिषदेचे आयोजन राज्य निवडणूक आयोगाच्या नियंत्रणाखाली विभागीय आयुक्त कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगर पालिका यांच्यावतीने मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी येथे करण्यात आले होते. 
उद्घाटन सत्रानंतर चार सत्रांत तज्ज्ञांनी लोकशाहीची प्रक्रिया, घटना दुरूस्ती, मतदान, मतदान प्रक्रिया, अंमलबजावणी, स्त्रियांचे हक्क आणि जबाबदारी, घटना दुरूस्तीनंतर महिलांचे सशक्तीकरण आदी विषयांवर विचार मांडले. स्थानिक स्वराज्य संस्था व शासनाचे संबंध व उद्भवणाऱ्या अडीअडचणी, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सर्वसमावेशक प्रशासन, निवडणूक सुधारणा या विषयावर तीन सत्र पार पडली.
स्थानिक स्वराज्य संस्था व शासनाचे संबंध या पहिल्या सत्रात कृषी परिषदेचे सेवानिवृत्त संचालक के.एम.नागरगोजे यांनी अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यातील समन्वय आवश्यक आहे. योजनांचे मुल्यमापन होणे अपेक्षित असल्याचे मत मांडले. उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी 73 व्या घटनादुरूस्तीचे परिणाम आणि वाटचाल याबाबत मार्गदर्शन केले. विकासासाठी चांगले अधिकारी कर्मचारी यांचा सहभाग लोकप्रतिनिधी इतकाच महत्त्वाचा आहे. माहिती, शिक्षण, संवाद आणि सहभाग यावर भर देण्यात यावा, असेही श्री. गोरे यांनी सूचविले. पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.पंडित नलावडे यांनीही सत्ता विकेंद्रीकरण आणि 73 वी घटनादुरूस्ती याबाबत सविस्तर सादरीकरण केले. घटना दुरूस्तीनंतरची प्रगती आणि आव्हाने यावरही विचार मांडले.
दुसऱ्या सत्रात महिला व दुर्बल घटकांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थाकडून सर्वसमावेशक प्रशासन याबाबत औरंगाबादच्या रिसोर्स अँन्ड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हल्पमेंटचे संचालक भीम रासकर यांनी शासनाची धोरणे ही उत्तम प्रकारची आहेत. त्यात अधिक पारदर्शकपणे अंमलबजावणी होणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. जालना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनी देशाला पुढे नेण्यासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्यामध्ये समन्वय महत्त्वाचा असल्याचे सांगितले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिंवसरा यांनी थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडणूकीवर आक्षेप नोंदविला. जालना येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयाच्या डॉ.श्रीमती सुनंदा तिडके यांनी स्त्री आणि पुरूष समान आहेत. महिलांनी दुय्यम दर्जाची भावना मनातून काढून टाकण्याचे आवाहनही त्यांनी केले.
तृतीय सत्रात निवडणूक सुधारणा या विषयावर औरंगाबाद खंडपीठ, मुंबईतील महाराष्ट्र महसूल न्यायाधीकरणाचे न्या.के.यू.चांदीवाल यांनी निवडणूक प्रक्रिया पद्धतीबाबत सूचना मांडल्या. महापौर नंदकुमार घोडेले यांनी माहितीचा अधिकार लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांनाही लागू करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मतदान प्रक्रियेबाबत अनुभव व्यक्त केले. बदलाला सामोरी जाण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. राज्य निवडणूक आयोगाकडून मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल होत असल्याचेही ते म्हणाले. स्वयंसेवी संस्थेचे प्राध्यापक अजित रानडे यांनी मतदार याद्यांबाबत सातत्याने प्रक्रिया राबवावी अशी अपेक्षा व्यक्त केली. स.भु.महाविद्यालयाचे प्राध्यापक नवनाथ आघाव यांनी सर्वसामान्यांच्या हातात सत्ता असावी, असे लोकशाहीला अभिप्रेत आहे. त्याप्रमाणात नव तंत्रज्ञानाचा वापर करुन ग्रामसभेचे कामकाज पार पाडण्यात यावे, असेही सूचविले.
समारोपीय सत्रात उपस्थित सरपंच, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, संशोधक, पदाधिकारी, अधिकारी यांच्या शंकांचे निरसन उपस्थित मान्यवरांनी केले.  अध्यक्षीय समारोपात डॉ.भापकर यांनी भारतीय राज्यघटना हा लोकशाहीचा मूळ गाभा आहे. कर्मालाच देव मानून भक्तीभावाने कार्य करत राहण्याचा सल्लाही देताना ग्रामीण, शहरी भागाचे स्वास्थ्‌य व वंचितांचे उत्थानासाठीच कार्य करत राहावे, असेही श्री. भापकर यांनी सांगितले. कुलगुरू डॉ.चोपडे यांनी सशक्त लोकशाहीसाठी घटनादुरूस्तीचे प्रत्येक वर्षी मुल्यमापन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती डोणगावकर यांनी परिषद आयोजनाबाबत संयोजकांसह राज्य निवडणूक आयोगाचे आभार व्यक्त केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या विभागाचे सेवानिवृत्त विभागप्रमुख डॉ.वि.ल.धारुरकर यांनी पुरोगामी महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था लोकशाहीची मंदिरे आहेत, असे सांगितले. बदलाचा स्वीकार स्वत:पासून सुरूवात करा, असेही ते म्हणाले. 

Comments

Popular posts from this blog

मनीषा दांडगेचा ‘खडतर प्रवास, जिद्द आणि यश’

दिनांक:- 16-05-2017 लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी पदाची निवड 2013 मध्ये झाली. 2014 मध्ये पोस्टींग मिळाली. परंतु ‘ झोपडपट्टीतील तरूणी झाली उपजिल्हाधिकारी’   अशा आशयाचा मजकूर तरूणांना अजूनही फेसबुक, न्यूज वेब पोर्टल अन् व्हाटसअ्पव्दारे प्रेरित करत आहे. स्पर्धा परीक्षकांसाठी प्रेरणादायी अशीच चंद्रपूर जिल्ह्यातील मूलच्या उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे यांची यशकथा. व्हाटस्अप  आणि आई             व्हाटसअपवरील संदेश उपजिल्हाधिकारी झालेल्या मनीषा दांडगे यांच्या आईला आजही त्यांच्या राहत्या घराच्या परिसरातील तरूण वर्ग वाचून दाखवतात. तेव्हा आईला लेकीचा अभिमान अन् मिळविलेल्या पदाचा झालेला आनंद हा गगनात मावेनासा होतो. परिसरातील तरूण वर्गही झपाट्याने अभ्यास करून डोळ्यासमोर मनीषा दांडगे यांचा आदर्श ठेवून स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षणाचा ध्यास घेत आहे,  शिकत आहे, असे आई असलेल्या लक्ष्मी दांडगे अभिमानाने सांगतात. बुध्दिमत्तेची चुणूक             तसा हा परिसर म्हणजे झोपडपट्टी. औरंगाबादेतील जाधववाडी जवळील आंबेडकर नगर. मनीषा यांचे वडील मातीकाम करणारे (मिस्त्री). 34 वर्षापूर्वी ते जालना

भूसंपादन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा उपयुक्त -नवल किशोर राम

दिनांक 31 जानेवारी 2018 औरंगाबाद,दि. 31   - भूसंपादन कायद्याबाबत सखोल माहिती होऊन योग्य आणि प्रभावीपणे कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी भूसंपादन प्रशिक्षण कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण, उपयुक्त असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा, पारदर्शकतेचा हक्क अधिनियमावर आधारीत जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम बोलत होते. यावेळी उपायुक्त महेंद्र हरपाळकर, अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन समन्वय) मंजुषा मुथा आदींसह सर्व उपविभागीय अधिकारी नायब तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ आदी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेला सुरुवात झाली. कार्यशाळेत नवीन भूसंपादन अधिनियम 2013 कायद्यातील महत्त्वाच्या बाबी, भूसंपादन प्रस्ताव सादर करणे, सामाजिक परिणाम निर्धारण

नयनरम्‍य खिंडसी...

राष्‍ट्रीय कृषी प्रदर्शन नागपुरात पार पडलं. पाच दिवसाच्‍या या प्रदर्शनानंतर पर्यटनाची मजा लुटण्‍यासाठी आम्‍ही खिंडसीला गेलो. नागपूरपासून जवळच असलेलं हे खिंडसी. रामटेकच्‍या राम मंदिरानंतर पाहायला मिळतं. निसर्गरम्‍य अशा ठिकाणी सर्वच जण इथं येतात. अगदी चिमुकल्‍यांपासून ते वृद्धांपर्यंत. तरुणाईसाठी तर सांगायचं कामच नाही. मनाला भावणारं असं हे खिंडसी पर्यटन. या पर्यटनाची मजा लुटली ती आम्‍ही.... म्‍हणजे माझे मित्र चंद्रकांत पाटील , संग्राम इंगळे आणि निलेशने. खूपच सुखावणारा अनुभव होता तो. तरुणाई , शाळकरी मुलं-मुली , शिक्षक , नवदांपत्‍य आणि भरभरून असलेला निसर्ग... डोळे कसे तृप्‍त करून जातो , ही इथं आल्‍यावरच कळतं. जलसफर गोवा आणि मुंबईत केली परंतु इथली जलसफरही तितक्‍याच तोडीची आहे. याठिकाणी येणा-या पर्यटकांची राहण्‍याची सोयही उत्‍तम आहे. जेवणाचीही व्‍यवस्‍था आहे , अगदी मांसाहारापासून शाकाहारापर्यंत , तेही चविष्‍ट. उन्‍हाळयात तर याठिकाणी प्रत्‍येकाने भेट द्यायलाच हवी , असं हे नयनरम्‍य असं ठिकाण आहे.  (व्‍हीडिओ सौजन्‍यः चंद्रकांत पाटील)