Skip to main content

घटना दुरुस्तीमुळे राष्ट्रनिर्माणात महिलांना समान संधी - विजया रहाटकर

औरंगाबाद,दि.22- प्राचीन काळापासून पंचायत राज व्यवस्था देशात आहे. कालांतराने त्यात बदल होत गेले घटना दुरुस्तीमुळे महिलांना भरभरुन संधी देण्यात आली  त्यात विशेषत्वाने पुरुषांच्या  बरोबरीचे समान स्थान महिलांना या घटना दुरुस्तीतून मिळाल्याने देशाची विकासाची व्दारे खुली झाल्याचे प्रतिपादन राज्य महिला आयेागाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी केले.
Add caption
मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी येथे 73 व 74 व्या घटना दुरुस्तीच्या 25 वर्षापुर्ती निमित्त  ‘प्रगती आणि भावी वाटचाल ’ यावर आयोजित विभागीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी श्रीमती रहाटकर बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, महापौर नंदकुमार घोडेले, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. बी.ए. चोपडे, मनपा आयुक्त डॉ. एम. मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकरी अधिकारी मधुकरराजे अर्दड, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, राज्य निवडणूक आयोगाचे मृदूल निळे, अवर सचिव रीना फणसेकर, कृषी परिषदेचे सेवानिवृत्त संचालक के.एम. नागरगोजे आदींची उपस्थिती होती.
श्रीमती रहाटकर म्हणाल्या, देशामध्ये 600 जिल्हा परिषद, 6000 पंचायत समिती, 2 लाख 30 हजार ग्रामपंचायती आणि 28 लाख लोकप्रतिनिधी आहेत. त्यात 14 लाख लोकप्रतिनिधी महिला आहेत. जगामध्ये सर्वाधिक महिलांचे प्रतिनिधीत्व भारतात आहेत, ही अभिमानाची बाब असल्याचे श्रीमती रहाटकर म्हणाल्या. घटना दुरुस्तीच्या 25 वर्षाच्या काळात महाराष्ट्रात राजकारणासह विविध क्षेत्रात मोलांचा ठसा महिलांनी उमटविला आहे. अष्टांगवधान असल्याने महिलांनी आज विकासकामात आग्रह धरुन विकासाचा ध्यास  घेतलेला आहे. घटना दुरुस्तीमुळे देशात आमुलाग्र परिवर्तन झाले आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीला सर्वांनी बळ देणे महत्त्वाचे आहे. सुशासनासाठी एकत्रित निवडणुकांचा विचार, पंचायत राज संस्थेला संपूर्ण स्वायत्तत्ता, लोकप्रतिनिधींना उत्तम प्रशिक्षणातून लोकांना अपेक्षित सुशासन निर्माण करता येईल, अशाही श्रीमती रहाटकर यांनी यावेळी सूचना केल्या.
राज्य महिला आयोगामार्फत महिलांच्या विकासासाठी आवश्यक त्या सूचना पोहोचविण्याचे काम करण्यात येते. राज्यात 45 संशोधन प्रकल्प, 250 कार्यशाळांतून  महिला सक्षमीकरणासाठी काम होते आहे. महिलांच्या विकासासाठी आयोगाकडून सर्वोतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाहीही श्रीमती रहाटकर यांनी यावेळी दिली.
विभागीय आयुक्त डॉ. भापकर म्हणाले, मराठवाड्यातली  दुसरी  परिषद औरंगाबादेत होते आहे. देशात जात, पंथ, भाषा यांच्यात वैविध्यता असतानाही केवळ भारतीय संविधानामुळे देश महासत्तेकडे वाटचाल करतो आहे. पंचायत राज बळकटीकरणासाठी अधिकारी, पदाधिकारी यांनी घटना दुरुस्तीचा आदर करुन समन्वयातून काम करणे अपेक्षित आहे. मराठवाड्यात उत्तमप्रकारचे कामे झाली आहेत. शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मूर्तस्वरुप आल्याचे मराठवाड्यातील विकासकामांतून दिसून येते आहे. मागील वर्षभरात पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्या समन्वयातून ग्रामीण भागात 11 लाख शौचालये बांधण्यात आली आहेत. जलयुक्त शिवार अभियानातून गावागावांत ग्रामसभेत पाण्याचे नियोजन, मनरेगाच्या माध्यमातून मागेल त्याला शेततळे, घरकुल, विहिरींची कामे होऊन कायापालट होतो आहे. या सर्व विकासाचे गमक म्हणजे घटना दुरुस्ती असल्याचेही श्री. भापकर यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांनीही गुणवत्ता महत्त्वाचे असल्याचे सांगत लोकप्रतिनिधींना येणाऱ्या अडचणींना दूर करण्यासाठी परिषद महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनीही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इतिहासाबाबत माहिती देऊन ही पद्धत मूळ प्राचीनभारतातून आल्याचे सांगितले. कुलगुरु डॉ. चोपडे यांनीही घटना दुरुस्तीची गरज, यश याबाबत मार्गदर्शन केले. विद्यापीठ, प्राध्यापक, संशोधक आणि अभ्यासकांनीही घटना दुरुस्तीवर संशोधनावर भर द्यावा, असे आवाहन केले.
सुरुवातीला कृषी, पशुसंवर्धन, जिल्हा परिषद, निवडणूक, महापालिका असोशिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिकॉर्ल,  स्वच्छ भारत मिशन, महिला व बालकल्याण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच प्रदर्शनी दालनांचे  विजया रहाटकर यांच्याहस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. परिषदेचे दीपप्रज्वलन करुन सुरुवात झाली. परिषदेत घटनादुरुस्तीच्या शोधप्रबंध पुस्तिकेचे विमोचनही मान्यवरांच्याहस्ते यावेळी करण्यात आले. महापौर घोडेले, श्री निळे, श्री. अर्दड, श्री. मुगळीकर यांनीही घटना दुरुस्तीबाबत विचार मांडले. परिषदेला शुभेच्छाही दिल्या. कार्यकमाचे प्रास्ताविक उपायुक्त डॉ. वर्षा ठाकूर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. प्रशांत अमृतकर यांनी केले. आभार उपायुक्त पारस बोथरा यांनी मानले.
घटना दुरुस्तीमुळेच मी महापौर
घटना दुरुस्तीमुळेच महापौर पदाची माळ गळ्यात पडल्याची कबुली विद्यमान महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रहाटकर यांनीही वर्ग एक अधिकारी म्हणून निवड झाली असताना देखील घटना दुरुस्तीमुळे राजकारणाची दरवाजे महिलांना खुली झाल्याने, समान संधी मिळाल्याने औरंगाबादची महापौर होऊ शकल्याचे परिषदेत सांगितले.

******

Comments

Popular posts from this blog

मनीषा दांडगेचा ‘खडतर प्रवास, जिद्द आणि यश’

दिनांक:- 16-05-2017 लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी पदाची निवड 2013 मध्ये झाली. 2014 मध्ये पोस्टींग मिळाली. परंतु ‘ झोपडपट्टीतील तरूणी झाली उपजिल्हाधिकारी’   अशा आशयाचा मजकूर तरूणांना अजूनही फेसबुक, न्यूज वेब पोर्टल अन् व्हाटसअ्पव्दारे प्रेरित करत आहे. स्पर्धा परीक्षकांसाठी प्रेरणादायी अशीच चंद्रपूर जिल्ह्यातील मूलच्या उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे यांची यशकथा. व्हाटस्अप  आणि आई             व्हाटसअपवरील संदेश उपजिल्हाधिकारी झालेल्या मनीषा दांडगे यांच्या आईला आजही त्यांच्या राहत्या घराच्या परिसरातील तरूण वर्ग वाचून दाखवतात. तेव्हा आईला लेकीचा अभिमान अन् मिळविलेल्या पदाचा झालेला आनंद हा गगनात मावेनासा होतो. परिसरातील तरूण वर्गही झपाट्याने अभ्यास करून डोळ्यासमोर मनीषा दांडगे यांचा आदर्श ठेवून स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षणाचा ध्यास घेत आहे,  शिकत आहे, असे आई असलेल्या लक्ष्मी दांडगे अभिमानाने सांगतात. बुध्दिमत्तेची चुणूक             तसा हा परिसर म्हणजे झोपडपट्टी. औरंगाबादेतील जाधववाडी जवळील आंबेडकर नगर. मनीषा यांचे वडील मातीकाम करणारे (मिस्त्री). 34 वर्षापूर्वी ते जालना

भूसंपादन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा उपयुक्त -नवल किशोर राम

दिनांक 31 जानेवारी 2018 औरंगाबाद,दि. 31   - भूसंपादन कायद्याबाबत सखोल माहिती होऊन योग्य आणि प्रभावीपणे कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी भूसंपादन प्रशिक्षण कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण, उपयुक्त असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा, पारदर्शकतेचा हक्क अधिनियमावर आधारीत जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम बोलत होते. यावेळी उपायुक्त महेंद्र हरपाळकर, अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन समन्वय) मंजुषा मुथा आदींसह सर्व उपविभागीय अधिकारी नायब तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ आदी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेला सुरुवात झाली. कार्यशाळेत नवीन भूसंपादन अधिनियम 2013 कायद्यातील महत्त्वाच्या बाबी, भूसंपादन प्रस्ताव सादर करणे, सामाजिक परिणाम निर्धारण

नयनरम्‍य खिंडसी...

राष्‍ट्रीय कृषी प्रदर्शन नागपुरात पार पडलं. पाच दिवसाच्‍या या प्रदर्शनानंतर पर्यटनाची मजा लुटण्‍यासाठी आम्‍ही खिंडसीला गेलो. नागपूरपासून जवळच असलेलं हे खिंडसी. रामटेकच्‍या राम मंदिरानंतर पाहायला मिळतं. निसर्गरम्‍य अशा ठिकाणी सर्वच जण इथं येतात. अगदी चिमुकल्‍यांपासून ते वृद्धांपर्यंत. तरुणाईसाठी तर सांगायचं कामच नाही. मनाला भावणारं असं हे खिंडसी पर्यटन. या पर्यटनाची मजा लुटली ती आम्‍ही.... म्‍हणजे माझे मित्र चंद्रकांत पाटील , संग्राम इंगळे आणि निलेशने. खूपच सुखावणारा अनुभव होता तो. तरुणाई , शाळकरी मुलं-मुली , शिक्षक , नवदांपत्‍य आणि भरभरून असलेला निसर्ग... डोळे कसे तृप्‍त करून जातो , ही इथं आल्‍यावरच कळतं. जलसफर गोवा आणि मुंबईत केली परंतु इथली जलसफरही तितक्‍याच तोडीची आहे. याठिकाणी येणा-या पर्यटकांची राहण्‍याची सोयही उत्‍तम आहे. जेवणाचीही व्‍यवस्‍था आहे , अगदी मांसाहारापासून शाकाहारापर्यंत , तेही चविष्‍ट. उन्‍हाळयात तर याठिकाणी प्रत्‍येकाने भेट द्यायलाच हवी , असं हे नयनरम्‍य असं ठिकाण आहे.  (व्‍हीडिओ सौजन्‍यः चंद्रकांत पाटील)