Skip to main content

सायबर सुरक्षेसाठी जनजागृती आवश्यक - डॉ.आरती सिंह

 दिनांक 23 जानेवारी 2018

औरंगाबाद, दि.23 : आजच्या काळात सायबर सुरक्षा, खबरदारी आणि जनजागृतीची गरज आहे. तंत्रज्ञानामुळे वाढलेली सायबर गुन्हेगारी कमी होण्यास त्यामुळे मदतच होणार असल्याचे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह यांनी आज येथे केले.
औरंगाबाद पोलिस आयुक्तालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एमजीएम परिसरातील आर्यभट्ट सभागृहात माध्यम प्रतिनिधींसाठी सायबर गुन्हे आणि जनजागृती अभियानांतर्गत सायबर सुरक्षा विषयक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीमती सिंह बोलत होत्या. पोलीस उपायुक्त डॉ.दीपाली धाटे-घाडगे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे माहिती संचालक देवेंद्र भुजबळ, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात,  आयसीआयसीआय बँकेचे शेखर शिंदे, शासकीय न्यायवैद्यकीय आणि विज्ञान संस्थेचे प्रा. डॉ.चरणसिंग कायटे, सहायक पोलीस आयुक्त श्री.कोडे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ.सिंह म्हणाल्या, पोलिस यंत्रणा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिक मजबूत झाली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाने सजग राहावयास हवे. नागरिकांनी ऑनलाईन बँकिंगचे व्यवहार, व्हॉटसअप, फेसबुकसह सोशल मीडियाचा वापर, मोबाईल, संगणक हाताळणी काळजीपूर्वक करायला हवी. समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आपल्या वैयक्तिक माहितीचा वापर करुन आपली फसवणूक करणार नाहीत, यासाठी सातत्याने दक्ष असायला हवे, असेही सिंह यांनी सांगितले.
श्रीमती धाटे-घाटगे म्हणाल्या, सायबर गुन्ह्यांच्याबाबतीत प्रत्येकाने जागरुक राहण्याची  गरज आहे. सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करून होणा-या फसवणुकीबाबत दक्षता बाळगणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी भारत सरकारने डिजीटल इंडियाचे धोरण अवलंबिले आहे. त्याचप्रकारे महाराष्ट्र शासनाने डिजीटल महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. नव्या युगात ती सर्वांनाच नांदीच ठरणारी आहे. सामान्यांसाठी पारदर्शक पद्धतीचा अवलंब या डिजीटल धोरणामुळे अस्तित्त्वात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तरी देखील नवतंत्रज्ञानाचा वापर करताना सुरक्षा महत्त्वाची असून खबरदारीही तितकीच महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्वानुभवातून सांगितले.
मुंबईतील आयसीआयसीआय बँकेचे व्यवस्थापक शेखर शिंदे यांनी इंटरनेटचा वाढता वापर, फसवे इमेल, दूरध्वनी, एटीएम कार्डचे क्लोनिंग, पिन, ओटीपी, सीव्हीव्ही, सोशल मीडियाचा गैरवापर, ई-वॉलेट याबाबत घ्यावयाची काळजी यावर सविस्तर सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले. त्याचप्रकारे शासकीय न्यायवैद्यकीय आणि विज्ञान संस्थेचे प्रा. डॉ.चरणसिंग कायटे यांनीही मोबाईल, इंटरनेटच्या विविध संकेतस्थळ वापराबाबतची आचारसंहिता आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी वापरावयाचे तंत्रज्ञान याबाबत माहिती दिली. सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनीही मोबाईल, इंटरनेट निष्काळजीपणे वापरामुळे त्याचा फायदा गुन्हेगारी प्रवृत्तींना होतो. परंतु राज्यात शासनाने प्रत्येक जिल्ह्यात सायबर लॅब स्थापन करून वाढत्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे होणा-या गुन्हेगारीवर आळा घातला आहे. तसेच पोलिस विभाग तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम झाल्याचेही त्यांनी सांगितले.
लोकराज्य अंकांचे पोलिस उपायुक्तांच्याहस्ते प्रकाशन
माध्यम प्रतिनिधींच्या कार्यशाळेत पोलिस प्रशासनावर माहितीपूर्ण असलेला जानेवारी 2018 च्या स्मार्ट, समर्थ, संवेदनशील आपले पोलिस आपली अस्मिता या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकराज्य विशेषांकाचे प्रकाशन पोलीस उपायुक्त डॉ.दीपाली धाटे-घाडगे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे माहिती संचालक देवेंद्र भुजबळ, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात,  आयसीआयसीआय बँकेचे शेखर शिंदे, शासकीय न्यायवैद्यकीय आणि विज्ञान संस्थेचे प्रा. डॉ.चरणसिंग कायटे, सहायक पोलीस आयुक्त श्री.कोडे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदींची उपस्थिती होती.
*****

Comments

Popular posts from this blog

मनीषा दांडगेचा ‘खडतर प्रवास, जिद्द आणि यश’

दिनांक:- 16-05-2017 लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी पदाची निवड 2013 मध्ये झाली. 2014 मध्ये पोस्टींग मिळाली. परंतु ‘ झोपडपट्टीतील तरूणी झाली उपजिल्हाधिकारी’   अशा आशयाचा मजकूर तरूणांना अजूनही फेसबुक, न्यूज वेब पोर्टल अन् व्हाटसअ्पव्दारे प्रेरित करत आहे. स्पर्धा परीक्षकांसाठी प्रेरणादायी अशीच चंद्रपूर जिल्ह्यातील मूलच्या उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे यांची यशकथा. व्हाटस्अप  आणि आई             व्हाटसअपवरील संदेश उपजिल्हाधिकारी झालेल्या मनीषा दांडगे यांच्या आईला आजही त्यांच्या राहत्या घराच्या परिसरातील तरूण वर्ग वाचून दाखवतात. तेव्हा आईला लेकीचा अभिमान अन् मिळविलेल्या पदाचा झालेला आनंद हा गगनात मावेनासा होतो. परिसरातील तरूण वर्गही झपाट्याने अभ्यास करून डोळ्यासमोर मनीषा दांडगे यांचा आदर्श ठेवून स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षणाचा ध्यास घेत आहे,  शिकत आहे, असे आई असलेल्या लक्ष्मी दांडगे अभिमानाने सांगतात. बुध्दिमत्तेची चुणूक             तसा हा परिसर म्हणजे झोपडपट्टी. औरंगाबादेतील जाधववाडी जवळील आंबेडकर नगर. मनीषा यांचे वडील मातीकाम करणारे (मिस्त्री). 34 वर्षापूर्वी ते जालना

भूसंपादन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा उपयुक्त -नवल किशोर राम

दिनांक 31 जानेवारी 2018 औरंगाबाद,दि. 31   - भूसंपादन कायद्याबाबत सखोल माहिती होऊन योग्य आणि प्रभावीपणे कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी भूसंपादन प्रशिक्षण कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण, उपयुक्त असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा, पारदर्शकतेचा हक्क अधिनियमावर आधारीत जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम बोलत होते. यावेळी उपायुक्त महेंद्र हरपाळकर, अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन समन्वय) मंजुषा मुथा आदींसह सर्व उपविभागीय अधिकारी नायब तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ आदी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेला सुरुवात झाली. कार्यशाळेत नवीन भूसंपादन अधिनियम 2013 कायद्यातील महत्त्वाच्या बाबी, भूसंपादन प्रस्ताव सादर करणे, सामाजिक परिणाम निर्धारण

नयनरम्‍य खिंडसी...

राष्‍ट्रीय कृषी प्रदर्शन नागपुरात पार पडलं. पाच दिवसाच्‍या या प्रदर्शनानंतर पर्यटनाची मजा लुटण्‍यासाठी आम्‍ही खिंडसीला गेलो. नागपूरपासून जवळच असलेलं हे खिंडसी. रामटेकच्‍या राम मंदिरानंतर पाहायला मिळतं. निसर्गरम्‍य अशा ठिकाणी सर्वच जण इथं येतात. अगदी चिमुकल्‍यांपासून ते वृद्धांपर्यंत. तरुणाईसाठी तर सांगायचं कामच नाही. मनाला भावणारं असं हे खिंडसी पर्यटन. या पर्यटनाची मजा लुटली ती आम्‍ही.... म्‍हणजे माझे मित्र चंद्रकांत पाटील , संग्राम इंगळे आणि निलेशने. खूपच सुखावणारा अनुभव होता तो. तरुणाई , शाळकरी मुलं-मुली , शिक्षक , नवदांपत्‍य आणि भरभरून असलेला निसर्ग... डोळे कसे तृप्‍त करून जातो , ही इथं आल्‍यावरच कळतं. जलसफर गोवा आणि मुंबईत केली परंतु इथली जलसफरही तितक्‍याच तोडीची आहे. याठिकाणी येणा-या पर्यटकांची राहण्‍याची सोयही उत्‍तम आहे. जेवणाचीही व्‍यवस्‍था आहे , अगदी मांसाहारापासून शाकाहारापर्यंत , तेही चविष्‍ट. उन्‍हाळयात तर याठिकाणी प्रत्‍येकाने भेट द्यायलाच हवी , असं हे नयनरम्‍य असं ठिकाण आहे.  (व्‍हीडिओ सौजन्‍यः चंद्रकांत पाटील)