Skip to main content

Posts

मुद्रा बँक चित्ररथाचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते उद्घाटन

            दिनांक सोमवार, १५ जानेवारी, २०१८ औरंगाबाद :  प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनांच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी औरंगाबाद जिल्हा माहिती कार्यालयातर्फे तयार करण्यात आलेल्या मुद्रा बँक चित्ररथाचे उद्घाटन आज पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते झाले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चित्ररथाचे फित कापून पालकमंत्री कदम यांनी उद्घाटन केले. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, आमदार अतुल सावे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदींसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेच्या माध्यमातून योजनेच्या लाभाबाबत ध्वनीफीत, पथनाट्य आणि माहिती पत्रकांद्वारे जिल्ह्यातील दीडशे गावांमध्ये दोन चित्ररथाद्वारे प्रचार आणि प्रसिद्धी करण्यात येणार आहे. या चित्ररथाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरजूंसह पात्र लाभार्थ्यांना लाभ होणार आहे. या चित्ररथामुळे प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना गावागावापर्यंत पोहचविण्यास मदतच होईल. या उपक्रमामुळे सर्वसामान्यांमध्ये योजनांबाबत जागृती निर्माण होईल. हा उपक्रम स्तुत्य असून लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे

लासूर येथील महाआरोग्य शिबिरातील रुग्णांवर फेब्रुवारी अखेरपर्यंत मोफत शस्त्रक्रिया

  खुलताबाद तालुक्यातील नेत्ररुग्णांनी घाटीमध्ये सोमवार, मंगळवार, बुधवारी अनुक्रमे दि.22,23 आणि 24  रोजी तर कन्नड, औरंगाबाद तालुक्यातील नेत्ररुग्णांनी दि. 29,30 आणि 31 रोजी शस्त्रक्रियेसाठी आवश्यक तपासणीसह नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालयात करुन महाआरोग्य शिबिरातील नस्तीसोबत घाटीमध्ये तालुका आरोग्य अधिकारी यांचेमार्फत दाखल व्हावे.   जिल्हा सामान्य रुग्णालयात वैजापूर तालुक्यातील नेत्ररुग्णांनी सोमवार दि. 22 आणि 29 रोजी व गंगापूर तालुक्यातील नेत्र रुग्णांनी दि. 17,24आणि 31 रोजी मोफत शस्त्रक्रियेसाठी उपस्थित राहावे.                    औरंगाबाद,दि.15- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय  शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नुकत्याच लासूर येथे पार पडलेल्या महाआरोग्य शिबिरात आलेल्या रुग्णांवर वेळेत उपचारांची प्रक्रिया सुरु आहे. शिबिरात आलेल्या रुग्णांना आवश्यक त्या मोफत शस्त्रक्रियेबाबत संपर्क साधून फेब्रुवारी अखेरपर्यंत त्यांच्यावर उपचार करण्यात येणार असल्याचे आजच्या आढावा बैठकीत ठरविण्यात आले.           जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आयो

राष्ट्रमाता, राजमाता माँ जिजाऊ

दिनांक 12 जानेवारी 2018 जिजाऊ शिवबांच्या आदर्श माता, आदर्श गुरूही. कर्तृत्वान, वात्स्ल्य, ममता, मुत्सद्दीपणा, उत्तम निर्णयशक्ती, आत्मसन्मान, तल्लख बुद्धिमत्ता, दृढनिश्चय, विनयशीलता, संघटनकौशल्य, औदार्य, महत्त्वाकांक्षा, त्याग, नि:स्वार्थीवृत्ती अशा विविध गुणांचा राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ संगमच. माँ जिजाऊंचा आज जन्म दिवस त्यानिमित्त त्यांच्या महान कार्याला स्मरण करून कोटी कोटी वंदन.            शिवबांच्या जडणघडणीत जिजाऊंचा अनमोल असा वाटा.  जन्मापासूनच शिवबांना राजमाता जिजाऊंचा सहवास अधिक लाभल्याने असाधारण अशी मातृभक्ती त्यांच्यात निर्माण झाली.  हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणा-या राजमाता जिजाऊ आऊसाहेब! रयतेवर पोटच्या लेकराप्रमाणे प्रेम करण्याचे बाळकडू ज्या मातेने दिले त्या म्हणजे राजमाता जिजाऊ.    जिजाऊंचा जन्म विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा इथला. देवगिरी, यादव वंशातील लखुजीराजे जाधव, म्हाळसाबाई यांच्या त्या कन्या. लखुजीराजेंचे घराणे वैभवशाली, स

विकासकामे कामे वेळेत पूर्ण करा - खासदार चंद्रकांत खैरे

औरंगाबाद, दि.10 - केंद्र आणि राज्य शासनाच्या शहरी विकासासाठी असलेल्या विविध योजना प्रभावीपणे राबवून नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रासह शहरांच्या विविध विकासकामांना गती देण्याचे निर्देश खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज दिले.    जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीच्या बैठकीत श्री. खैरे बोलत होते. यावेळी आमदार सुभाष झांबड, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर, उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर, महानगरपालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे, सिकंदर अली,श्री. कुलकर्णी, सर्व नगरपालिका,नगरपंचायतचे मुख्याधिकारी, मनपाचे अधिकारी, पदाधिकारी यांची उपस्थिती होती. बैठकीत स्वच्छ भारत मिशन, हेरीटेज सिटी विकास, अंत्योदय योजना, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी), अटल अभियान (अमृत), स्वच्छ भारत अभियान (नागरी), दीनदयाल अंत्योदय योजना, समांतर जलवाहिनी, भूमिगत गटार योजना, पाणी पुरवठा योजना, औरंगाबाद शहरातील स्मार्ट सिटी योजना, राष्ट्रीय शहरी आरोग्य योजना, रस

प्राण्यांच्या संरक्षणासाठी जनजागृती निर्माण करा - अप्पर जिल्हाधिकारी

औरंगाबाद, दि.9 - प्राण्यांच्या संरक्षणासाठी लोकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व यंत्रणांनी मिळून शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आज अप्पर जिल्हाधिकारी श्री. पी. एल. सोरमारे यांनी दिल्या.           अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीच्या बैठकीत श्री. सोरमारे बोलत होते. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. बी. डी. फुंदे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण्‍ा नकाते, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. डी.एस कांबळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी विभागाचे डी.पी. जऊळकर यांची उपस्थिती होती.           श्री. सोरमारे म्हणाले, जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीच्या अशासकीय सदस्यांची निवड अधिसूचनान्वये करण्यात यावी. सोसायटीच्या कार्य आणि उद्दिष्टांबाबत जिल्ह्यातील तालुकास्तरापर्यंत पोलिस स्टेशन, परिवहन अधिकारी, तहसीलदार यांना माहिती पाठविण्यात यावी. प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी जनावर वाहतुकीबाबत असलेल्या जिल्ह्यातील परवाना यादी पोलिस विभागांना कळविण्यात यावी, असेही श्री.

कौटुंबिक वाद मिटविण्यात मध्यस्थांची भूमिका बहुमोलाची - जिल्हा न्यायाधीश शिंदे

·           कौटुंबिक न्यायालयात  मध्यस्थ जागृती कार्यक्रम  औरंगाबाद, दि.6 (जिमाका )---- कौटुंबिक वादातून दोन्ही कुटुंबातील नातेसंबंध दुरावल्या जातात. परंतु मध्यस्थांच्या माध्यमातून कौटुंबिक वाद सामंजस्याने, तडजोडीने मिटवला जातो. त्यामुळे मध्यस्थांची भूमिका उपयुक्त, महत्त्वपूर्ण असल्याचे जिल्हा व सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश डी.एस.शिंदे यांनी आज सांगितले. कौटुंबिक न्यायालयात आयोजित मध्यस्थ जागृती कार्यक्रमात श्री. शिंदे बोलत होते. यावेळी कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश अरूणा फरस्वाणी, न्यायाधीश एस.ए.मोरे यांची उपस्थिती होती. मध्यस्थांची भूमिका, प्रक्रिया, न्यायालयीन भूमिका, मध्यस्थांचे कार्य, यश आणि अपयश याबाबत सविस्तर माहिती श्री. शिंदे यांनी दिली. मध्यस्थ केंद्राच्या माध्यमातून जलदगतीने न्याय निवाडा होण्यास मदत होत असल्याचेही ते म्हणाले. श्रीमती फरस्वाणी यांनी श्री. शिंदे यांचे तुळशीचे रोप देऊन स्वागत केले. प्रास्ताविक ॲड. छाया गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन ॲड. पोर्णिमा जोशी यांनी केले. आभार ॲड.पद्मिनी मोदी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कौटुंबिक न्यायालय

शेतकऱ्यांनी उत्पादनाच्या विपणनाबरोबर गुणवत्तेचा आग्रह धरावा - हरिभाऊ बागडे

                                                                                                            दिनांक.5.1.2018 औरंगाबाद, दि.05-स्पर्धेच्या युगात तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शेतकऱ्यांनी जागरुक रहावे. शेतमालाच्या विपणनाबरोबरच गुणवत्तेचा ध्यास धरावा, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले.                         अयोध्या नगरीत आयोजित तीन दिवसीय महाॲग्रो राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी श्री. बागडे बोलत होते. यावेळी पशु संवर्धन, मत्स्यव्यवसाय व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, खासदार चंद्रकांत खैरे, रावसाहेब दानवे, आमदार अतुल सावे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड, मसिआचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष समीर दुधगावकर, मुख्य समन्वयक ॲड. वसंत देशमुख, विजय बोराडे, उद्योजक राम भोगले, मानसिंग पवार, नंदलाल काळे, जगन्नाथ पाटील आदींची उपस्थिती होती. विधानसभा अध्यक्ष श्री. बागडे म्हणाले, आपला देश दूध उत्पादनात