Skip to main content

शेतकऱ्यांनी उत्पादनाच्या विपणनाबरोबर गुणवत्तेचा आग्रह धरावा - हरिभाऊ बागडे

                                                                                                           दिनांक.5.1.2018

औरंगाबाद, दि.05-स्पर्धेच्या युगात तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शेतकऱ्यांनी जागरुक रहावे. शेतमालाच्या विपणनाबरोबरच गुणवत्तेचा ध्यास धरावा, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले.
                        अयोध्या नगरीत आयोजित तीन दिवसीय महाॲग्रो राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी श्री. बागडे बोलत होते. यावेळी पशु संवर्धन, मत्स्यव्यवसाय व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, खासदार चंद्रकांत खैरे, रावसाहेब दानवे, आमदार अतुल सावे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड, मसिआचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष समीर दुधगावकर, मुख्य समन्वयक ॲड. वसंत देशमुख, विजय बोराडे, उद्योजक राम भोगले, मानसिंग पवार, नंदलाल काळे, जगन्नाथ पाटील आदींची उपस्थिती होती.
विधानसभा अध्यक्ष श्री. बागडे म्हणाले, आपला देश दूध उत्पादनात जगात अव्वल आहे. परंतु दूध उत्पादनाच्या गुणवत्तेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. शेती नसलेल्यांकडे दुग्धव्यवसाय हे उत्तम साधन आहे. दुग्ध व्यवसायाचे साधन असलेल्या भागात शेतकरी आत्महत्या कमी प्रमाणात होत असल्याचे आढळले आहे. ही आनंदाची बाब आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा यांचे उत्तम उदाहरण यासाठी घेता येईल. दुग्धव्यवसाय शेतकऱ्यांना वरदानच असून शेतकऱ्यांनी याकडे वळल्यास आर्थिक समृद्धी येणास मदत होईल.पीक विमा योजना, जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, पशु संवर्धन विभागाच्या विविध योजनांचाही शेतकऱ्यांनी लाभ घेऊन प्रगती साधावी, असेही श्री. बागडे म्हणाले.
                        पशुसंवर्धन मंत्री जानकर म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीकोनातून शेतीला शाश्वत विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न कसोशीने होत आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे ठाकलेले आहे. शेतकऱ्यांनीही आजच्या स्पर्धेचा विचार करुन पाल्याला उत्तमप्रकारचे शिक्षण देऊन सनदी अधिकारी बनविण्याचे स्वप्न पाहायलाच हवे.
            कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांच्या ज्ञानात अधिक भर पडून उत्तम शेती, समृद्ध शेती होण्यास मदतच होते. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यायलाच हवा. त्याचबरोबर दूध उत्पादनातून रोजगारही मिळवावा, असे आवाहन श्री. जानकर यांनी केले. खासदार खैरे यांनीही शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकार खंबीरपणे उभे असल्याचे सांगून कृषी प्रदर्शनाला शुभेच्छा दिल्या. खासदार दानवे यांनी देखील शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. त्याचबरोबर शासनाने गटशेतीसाठी 200 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करुन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे, असेही श्री. दानवे म्हणाले.
            विभागीय आयुक्त डॉ. भापकर म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेतततळे, गटशेतीच्या माध्यमातून शासन आणि प्रशासनाच्या प्रयत्नाने शेतकऱ्यांचा विकास, संपन्न शेती करण्यावर भर असल्याचेही श्री. भापकर म्हणाले.
            शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मंगल वाघमारे, मधुकर अण्णा छिंद्रे, दीपक पवार, शिवाजी देशमुख, शरद गोरे, चंदशेखर कुलकर्णी, कपीलेश्वर सोनटक्के, विठ्ठल क्षीरसागर, गजानन गावंडे, दत्ता काकडे, महादेव भांगे, नारायण इथ्थर, ज्ञानेश्वर चौधरी, राजाराम महाजन, बाळकृष्ण पाटील, अमृत देशमुख यांचा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
            प्रारंभी विधानसभा अध्यक्ष श्री. बागडे यांच्याहस्ते फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. मंडलेचा यांनी केले. सूत्रसंचालन समाधान इंगळे यांनी केले आभार श्री. दूधगावकर यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

मनीषा दांडगेचा ‘खडतर प्रवास, जिद्द आणि यश’

दिनांक:- 16-05-2017 लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी पदाची निवड 2013 मध्ये झाली. 2014 मध्ये पोस्टींग मिळाली. परंतु ‘ झोपडपट्टीतील तरूणी झाली उपजिल्हाधिकारी’   अशा आशयाचा मजकूर तरूणांना अजूनही फेसबुक, न्यूज वेब पोर्टल अन् व्हाटसअ्पव्दारे प्रेरित करत आहे. स्पर्धा परीक्षकांसाठी प्रेरणादायी अशीच चंद्रपूर जिल्ह्यातील मूलच्या उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे यांची यशकथा. व्हाटस्अप  आणि आई             व्हाटसअपवरील संदेश उपजिल्हाधिकारी झालेल्या मनीषा दांडगे यांच्या आईला आजही त्यांच्या राहत्या घराच्या परिसरातील तरूण वर्ग वाचून दाखवतात. तेव्हा आईला लेकीचा अभिमान अन् मिळविलेल्या पदाचा झालेला आनंद हा गगनात मावेनासा होतो. परिसरातील तरूण वर्गही झपाट्याने अभ्यास करून डोळ्यासमोर मनीषा दांडगे यांचा आदर्श ठेवून स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षणाचा ध्यास घेत आहे,  शिकत आहे, असे आई असलेल्या लक्ष्मी दांडगे अभिमानाने सांगतात. बुध्दिमत्तेची चुणूक             तसा हा परिसर म्हणजे झोपडपट्टी. औरंगाबादेतील जाधववाडी जवळील आंबेडकर नगर. मनीषा यांचे वडील मातीकाम करणारे (मिस्त्री). 34 वर्षापूर्वी ते जालना

भूसंपादन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा उपयुक्त -नवल किशोर राम

दिनांक 31 जानेवारी 2018 औरंगाबाद,दि. 31   - भूसंपादन कायद्याबाबत सखोल माहिती होऊन योग्य आणि प्रभावीपणे कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी भूसंपादन प्रशिक्षण कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण, उपयुक्त असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा, पारदर्शकतेचा हक्क अधिनियमावर आधारीत जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम बोलत होते. यावेळी उपायुक्त महेंद्र हरपाळकर, अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन समन्वय) मंजुषा मुथा आदींसह सर्व उपविभागीय अधिकारी नायब तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ आदी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेला सुरुवात झाली. कार्यशाळेत नवीन भूसंपादन अधिनियम 2013 कायद्यातील महत्त्वाच्या बाबी, भूसंपादन प्रस्ताव सादर करणे, सामाजिक परिणाम निर्धारण

नयनरम्‍य खिंडसी...

राष्‍ट्रीय कृषी प्रदर्शन नागपुरात पार पडलं. पाच दिवसाच्‍या या प्रदर्शनानंतर पर्यटनाची मजा लुटण्‍यासाठी आम्‍ही खिंडसीला गेलो. नागपूरपासून जवळच असलेलं हे खिंडसी. रामटेकच्‍या राम मंदिरानंतर पाहायला मिळतं. निसर्गरम्‍य अशा ठिकाणी सर्वच जण इथं येतात. अगदी चिमुकल्‍यांपासून ते वृद्धांपर्यंत. तरुणाईसाठी तर सांगायचं कामच नाही. मनाला भावणारं असं हे खिंडसी पर्यटन. या पर्यटनाची मजा लुटली ती आम्‍ही.... म्‍हणजे माझे मित्र चंद्रकांत पाटील , संग्राम इंगळे आणि निलेशने. खूपच सुखावणारा अनुभव होता तो. तरुणाई , शाळकरी मुलं-मुली , शिक्षक , नवदांपत्‍य आणि भरभरून असलेला निसर्ग... डोळे कसे तृप्‍त करून जातो , ही इथं आल्‍यावरच कळतं. जलसफर गोवा आणि मुंबईत केली परंतु इथली जलसफरही तितक्‍याच तोडीची आहे. याठिकाणी येणा-या पर्यटकांची राहण्‍याची सोयही उत्‍तम आहे. जेवणाचीही व्‍यवस्‍था आहे , अगदी मांसाहारापासून शाकाहारापर्यंत , तेही चविष्‍ट. उन्‍हाळयात तर याठिकाणी प्रत्‍येकाने भेट द्यायलाच हवी , असं हे नयनरम्‍य असं ठिकाण आहे.  (व्‍हीडिओ सौजन्‍यः चंद्रकांत पाटील)