Skip to main content

Posts

उद्योगक्षेत्रात सातत्याने संशोधनाची आवश्यकता - उद्योगमंत्री देसाई

औरंगाबाद,दि. 16 – उद्योगक्षेत्राला शिक्षणक्षेत्राची जोड महत्त्वाची आहे. या शिक्षण क्षेत्राच्या सहकार्याने उद्योगक्षेत्रात सातत्याने संशोधनाची आवश्यकता निर्माण झाल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज केले. तरुणांनी उद्योजक होण्यासाठी संशोधनावर भर देऊन उद्योजक होण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले.   पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या (पीइएस) अभियांत्रिकी महाविद्यालयात चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज आणि ॲग्रीकल्चर (सीएमआयए) च्यावतीने आयोजित चौथ्या ‘एनर्जी    कॉन्क्लेव्ह 2018 ’ मध्ये   श्री. देसाई बोलत होते. यावेळी पीइएसचे   प्राचार्य डॉ. अभिजित वाडेकर, सीएमआयएचे अध्यक्ष प्रकाश कोकील, डॉ. बी.एन. चौधरी, राहुल देशपांडे यांची उपस्थिती होती. श्री. देसाई म्हणाले, राज्य शासनाने नुकतेच महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेईकल धोरण जाहीर केले आहे. या धोरणाच्या माध्यमातून राज्यात 25 हजारकोटींच्या गुंतवणुकीसह एक लाख रोजगार निर्मितीचे लक्ष गाठण्यात येणार असल्याचेही श्री. देसाई म्हणाले. सध्या राज्यात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. त्यातून  

लघु उद्योजकांनी उद्योगक्षेत्रात भरारी घ्यावी - सुभाष देसाई

औरंगाबाद,दि. 16 – दुर्दम्य इच्छाशक्ती आणि स्वत: वर विश्वास ठेवून उद्योग उभारणीसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेत लघु उद्योजकांनी उद्योगक्षेत्रात भरारी घ्यावी, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज केले. हॉटेल विंडसर कॅसल येथे राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती   हबच्या 19 व्या राज्यस्तरीय बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी श्री. देसाई बोलत होत. यावेळी सुक्ष्म व लघु मंत्रालयाचे संचालक पीजीएस राव, पी. उदयकुमार, आर. बी. गुप्ते, उद्योग संचालनालयाचे सहसंचालक दिलीप गुरूलवार, राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळाचे क्षेत्रीय प्रमुख पी. कृष्ण मोहन, बुद्धीष्ट इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग ॲन्ड ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष नंदकिशोर रत्नपारखे, उच्च अधिकार नियंत्रण समितीचे सदस्य सुनील झो डे, मसिआचे अध्यक्ष सुनील किर्दक   उपस्थित होते. श्री. देसाई म्हणाले, जमशेदजी टाटा, धीरूभाई अंबानी, लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी अगदी छोट्या व्यवसायापासून सुरूवात केली. परंतु सातत्य आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी   नावलौकिक प्राप्त केला. लघु उद्योजकांनी त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन र

पालकमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून पिकांची पाहणी

औरंगाबाद,दि. 15 - बोंडअळी, गारपिटीने झालेल्या पिकांच्या नुकसानीची आज पालकमंत्री तथा आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी पाहणी करुन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. त्याचबरोबर होणाऱ्या नुकसानीबाबत हानी टाळण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करा, असे निर्देश कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.   सिल्लोड तालुक्यातील वरखेडी, बनकिन्होळा आणि फुलंब्री तालुक्यातील नायगव्हाण, महालकिन्होळा याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी डॉ. सावंत यांनी केली, शेतकऱ्यांशी संवादही साधला. वरखेडी येथे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याहस्ते पालकमंत्री डॉ. सावंत यांचे प्रशासनाच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर , अप्पर जिल्हाधिकारी पी.एल.सोरमारे, प्रशिक्षणार्थी तहसीलदार सौरभ कटियार, उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, तालुका कृषी अधिकारी श्री. आघाव आदींची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी येथील संतोष फलके यांच्याशेतात तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील कापूस उत्पादन पिकांब

जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे कामांचे जिओ टॅगिंग करा - नवल किशोर राम

औरंगाबाद, दि.14 -   शासनाच्या महत्त्वाकांक्षी अशा जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे योजनेच्या झालेल्या कामांचे जिओ टॅगिंग करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्यात.           जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनांचा आढावा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना योजना वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही दिले. अनुलोम संस्थेच्या सहकार्याने ग्रामपंचायतींच्या माध्यमातून जिल्ह्यातील तलावांचे कामे करण्यात यावीत. सन 2016-17 मध्ये जिल्ह्यात 201 गावांमध्ये जलयुक्त शिवाराची कामे पूर्ण झालीत. तरी देखील संपूर्णत: जिओ टॅगिंग झालेले नाही. तरी जलसंधारण, कृषी, वन, जिल्हा परिषद व इतर कार्यालयाकडून झालेल्या विहिर पुनर्भरण, लोकसहभागातील कामाचे जिओ टॅगिंग करावे. त्याचबरोबर सर्व कामांमध्ये पारदर्शकता ठेवून इ-टेंडरिंगव्दारे कामे पार पाडावीत. झालेल्या कामाचा परिपूर्ती अहवाल तत्काळ कृषी कार्यालयाला कळवावा, असेही श्री. राम यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले.

पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करा – डॉ. गडप्पा

औरंगाबाद,दि. 8 - प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याची (पीसीपीएनडीटी) प्रभावीपणे अंमलवजावणीसाठी जिल्हास्तरीय सल्लागार समितीमार्फत योग्य अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश देण्यात येतात. तरीही या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सर्व अधिकाऱ्यांनी अधिक प्रभावीपणे कार्य करावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष तथा घाटीचे प्रसूती व स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी केले.           घाटीच्या प्रसूती व स्त्रीरोग विभागात श्री. गडप्पा यांच्या दालनात आयोजित जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत बोलत होते. यावेळी समितीचे सदस्य बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पाटील, क्ष-किरण विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. वर्षा शेटे, डॉ. घाटकर आदींची उपस्थिती होती.           डॉ. गडप्पा म्हणाले, सोनोग्राफी केंद्राने सोनोग्राफी करावयाच्या संदर्भात करावयाच्या सर्व नोंदी व्यवस्थित व अद्यावत ठेवाव्यात. सोनोग्राफी केंद्राकडून सोनोग्राफी होत नसेल तरीही नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच टूडीइको, सिटीस्कॅन आणि एमआरआयसाठी नोंदणी आवश्यक आहे. सोनोग्राफी करणाऱ्या नेत्र तज्ञांनीदेखील सोनोग्राफी केंद्र व यंत्रांची नोंदणी करणे

हिंदी प्रचार सभेच्या प्रधानमंत्रीपदी प्रा.सुरेश पुरींची निवड

                    औरंगाबाद, दिनांक 7- हिंदी प्रचार आणि प्रसारासाठी नावलौकिक प्राप्त, स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्य करणाऱ्या हैद्राबाद येथील हिंदी प्रचार सभेच्या प्रधानमंत्री या सर्वोच्च पदावर पहिल्यांदाच महाराष्ट्रातील व्यक्तीची एकमताने निवड करण्यात आली आहे. संस्थेने हा मान प्रा.सुरेश पुरी यांना देऊन त्यांच्या कार्याची खऱ्या अर्थाने दखल घेतली आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा असा तुरा खोवला गेला.       आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यात हिंदी प्रचार आणि प्रसाराचे कार्य हिंदी प्रचार सभा, हैद्राबाद करते. १९३५  साली स्थापन झालेल्या या संस्थेमार्फत दक्षिण भारतात हिंदी प्रचार आणि प्रसाराचे कार्य होते. त्यात प्रा.पुरी यांचाही मोलाचा वाटा आहे. यापूर्वी प्रधानमंत्री पदाचा मान हैद्राबाद राज्याशिवाय इतर राज्याला मिळालेला नाही. परंतु प्रा.पुरी यांना हा मान मिळाल्याने त्यांच्या कार्यासह महाराष्ट्र राज्यासाठी देखील त्यांची निवड कौतुक,अभिमानास्पद अशीच आहे.       डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुमारे 30 वर्ष प्रा.पुरी यांनी वृत्तपत्रविद्या आणि ज

जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्याहस्ते फेब्रुवारीच्या लोकराज्य अंकाचे प्रकाशन

      औरंगाबाद,दि. 7 -जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री  प्रा.राम शिंदे आणि राष्ट्रीय जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या फेब्रुवारी महिन्याच्या लोकराज्य विशेषांकाचे प्रकाशन आज करण्यात आले. वाल्मी येथील जलनायक, जलयोद्धा उजळणी  प्रशिक्षण आणि चिंतनशिबिरात श्री. शिंदे यांनी लोकराज्य विशेषांकाचे  प्रकाशन केले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, मृद व जलसंधारण आयुक्त तथा वाल्मीचे महासंचालक दीपक सिंगला, राज्य जलसाक्षरता  केंद्राचे आनंद पुसावळे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या  मराठवाडा विभागाचे प्र. संचालक यशवंत भंडारे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदींची उपस्थिती होती. फेब्रुवारी महिन्याच्या लोकराज्य विशेषांकात साहित्य संमेलन, मराठी भाषा आणि व्यवसाय मार्गदर्शनावर भर देण्यात आला आहे. विविध तज्ज्ञांचे लेख यामध्ये समाविष्ट असून मलपृष्ठावर दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यावर आधारीत महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावलेले छायाचित्र देण्यात आलेले आहे.