Skip to main content

Posts

Showing posts from July, 2017

आला पावसाळा… चला गौताळा !

दिनांक  19 जुलै 2017 अजिंठ्याच्या डोंगररांगात म्हणा,की सातमाळ्याच्या रांगात 260.61 चौ. किमीमध्ये गौताळा अभयारण्य आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठं असं अरण्य. बिबट, हरिण, काळवीट, नीलगाय, सायळ इथे आढळतात. औरंगाबादपासून 75 कि.मी अंतरावर असलेलं गौताळा कन्नड तालुक्यात येतं. निसर्गसहलीसाठी भेट द्यावं असंच हे ठिकाण. डोंगरदऱ्यांच्या कपारातून वाट काढत, उंचावरुन कोसळणारे नयनरम्य धबधबे, उंचच उंच डोंगरे, तेही हिरवेगार… डोळ्याचे पारणंच फेडतात. पावसाळी पर्यटनासाठी एकदा तरी भेट द्यावं, असंच गौताळा अभयारण्य. गौताळा अभयारण्याची 1986 साली स्थापना झाली. कन्नड तालुक्यातील 17 गावातील वनक्षेत्राचा अभयारण्यात समावेश होतो. कन्नडपासून केवळ 15 कि.मी. अंतरावरच अभयारण्य आहे. चाळीसगावपासून 20 कि.मी अंतरावर असलेल्या फाट्यापासून सरळ गेल्यास गौताळ्याचे प्रवेशव्दार लागते. तिथे चौकी आहे. तिथून आत प्रवेश मिळतो. अभयारण्यात पायी, वाहनानेही फिरता येते. पर्यटकांसाठी अतिशय चांगल्याप्रकारचे ट्रेकिंग ट्रॅक वन विभागाने तयार केलेत. पर्यावरण, निसर्गप्रेमींना, तरूणाईला आनंददायी, आल्हाददायक असाच अभयारण्याचा परिसर आहे. पावसा

नवनवीन तंत्रज्ञान, संशोधनाचा ध्यास घ्या - दुष्यंत आठवले

दिनां क : 15.5.201 7           वय 52 वर्ष. उद्योजक होण्याची बालवयापासून मनोमन इच्छा. अंगी शासकीय विद्यानिकेतन ‘उध्दवरावा स्वयें आत्मा’ हा संस्कार. प्रचंड आत्मविश्वास, नवं काहीतरी शोधण्याची नजर अन् कृतीही. वेळप्रसंगी जोखीम घेण्याची तयारी. या वृत्तीने केंद्रीय सरकारी नोकरीही चुटकीसरशी सोडणारा तरुण, मार्गदर्शक, औरंगाबादेतील वैशाली लेझर उद्योगाचे संचालक दुष्यंत आठवले. त्यांच्याशी त्यांनी केलेल्या उद्योग भरारी विषयीची ही विशेष मुलाखत. v दुष्यंतजी आपल्या शिक्षणाबाबत काय सांगाल? माझं गाव नांदेड जिल्हयातील बारड. वडील शिक्षण खात्यात वरिष्ठ पदावर, आई गृहिणी. प्राथमिक शिक्षण औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा, माध्यमिक शिक्षण औरंगाबादच्या शासकीय विद्यानिकेतन या शाळेत झाले. पुढे 1981 मध्ये शासकीय पॉलिटेक्नीक येथून इलेक्ट्रीकल पदविकेस प्रवेश घेतला. त्यानंतर 1984 मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उद्योग उभारावा असे मनोमन वाटत, परंतु ते शक्य झाले नाही. v शिक्षणानंतर उद्योजक होण्यासाठी काय प्रयत्न केले? उद्योग उभारायचा म्हटल्यावर त्यापुर्वी अनुभव घ्यावा आणि नंतरच उद्योग करा

मनीषा दांडगेचा ‘खडतर प्रवास, जिद्द आणि यश’

दिनांक:- 16-05-2017 लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी पदाची निवड 2013 मध्ये झाली. 2014 मध्ये पोस्टींग मिळाली. परंतु ‘ झोपडपट्टीतील तरूणी झाली उपजिल्हाधिकारी’   अशा आशयाचा मजकूर तरूणांना अजूनही फेसबुक, न्यूज वेब पोर्टल अन् व्हाटसअ्पव्दारे प्रेरित करत आहे. स्पर्धा परीक्षकांसाठी प्रेरणादायी अशीच चंद्रपूर जिल्ह्यातील मूलच्या उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे यांची यशकथा. व्हाटस्अप  आणि आई             व्हाटसअपवरील संदेश उपजिल्हाधिकारी झालेल्या मनीषा दांडगे यांच्या आईला आजही त्यांच्या राहत्या घराच्या परिसरातील तरूण वर्ग वाचून दाखवतात. तेव्हा आईला लेकीचा अभिमान अन् मिळविलेल्या पदाचा झालेला आनंद हा गगनात मावेनासा होतो. परिसरातील तरूण वर्गही झपाट्याने अभ्यास करून डोळ्यासमोर मनीषा दांडगे यांचा आदर्श ठेवून स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षणाचा ध्यास घेत आहे,  शिकत आहे, असे आई असलेल्या लक्ष्मी दांडगे अभिमानाने सांगतात. बुध्दिमत्तेची चुणूक             तसा हा परिसर म्हणजे झोपडपट्टी. औरंगाबादेतील जाधववाडी जवळील आंबेडकर नगर. मनीषा यांचे वडील मातीकाम करणारे (मिस्त्री). 34 वर्षापूर्वी ते जालना

‘माऊली’ चा जागर !

दिनांक 18 जुलै 2017          अत्यंत साधी राहणी. उच्च विचार. पद अप्पर विभागीय आयुक्त. कुठलाही आविरभाव, गर्व मनाशी शिवलेला नाही. इर्षा, द्वेष आणि मत्सरही नाही. कृतीतही   दिसत नाही. प्रेमाने समजून सांगण्याची वृत्ती. प्रशासनात असूनही बरेचजण ‘माऊली’ संबोधतात. कार्यालयातच काम होतं, असं मुळीच नाही. तर ज्या ठिकाणी संधी मिळेल, मिळवता येईल तिथे काम सुरू. त्यातच अध्यात्माची गोडी. म्हणून कीर्तन, हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायणातूनही सरकारच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमावर जागृती करण्याचे कार्य औरंगाबाद विभागीय आयुक्तालयातील अप्पर आयुक्त डॉ. विजयकुमार फड नेटाने पार पाडतात.           जलयुक्त शिवार, शेतकरी आत्महत्या, स्वच्छता अभियान, पाल्यांसाठी आवश्यक संस्कार, स्पर्धा परीक्षा, शासनाच्या विविध महत्त्वकांक्षी योजनांवर सातत्याने लेखन डॉ. विजयकुमार फड करतात. हेच विषय कीर्तनातूनही सांगतात. जनसामान्यांपर्यंत पोहोचवायचे असेल तर पारंपरिक माध्यमे प्रभावशालीच. त्याचा पुरेपूर व सुयोग्य पद्धतीने अगदी सामान्यांहून सामान्यांच्या लक्षात येईल, अशाप्रकारे कीर्तनातून सरकारच्या योजना, लोकांचा आवश्यक सहभाग

ना जामीन, ना तारण ‘मुद्रा’ चे हेच धोरण !

                    दिनां क : 17 .7 .201 7 होतकरु, बुद्धीमान, यशस्वी उद्योजक होण्याचे स्वप्न बाळगणारे तरुण आहेत. त्यांना कौटुंबिक पार्श्वभूमी नसल्याने एखादा लहान उद्योग, व्यवसाय उभारणीला अडचणी येतात. मुख्य अडचण असते ती भांडवलाची. उद्योग उभारायचा तर कमी व्याजदरात भांडवल आवश्यकच. याचा विचार करुन तरुण उद्योजकांसाठी प्रधानमं त्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या मुद्रा बँक योजनेवर आधारीत हा विशेष लेख. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तरूणांना नोकरी ऐवजी व्यवसायाकडे वळवून नोकर नव्हे तर मालक बनवण्याची संधी प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून उपलब्ध करून दिली आहे. या योजनेच्या माध्यमातून रोजगाराबरोबरच बेरोजगारांना शाश्वत, खात्रीलायक व्यवसायामध्ये भरारी घेण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी अशी प्रधानमंत्री मुद्रा योजना 8 एप्रिल 2015 पासून सुरू झाली. उद्योगाला आणि उद्योजकाला या योजनेच्या माध्यमातून भरारी मिळणार आहे. राज्यातील औद्योगिक क्षेत्रातील झपाट्याने वाढणाऱ्या औरंगाबादसाठी ही तर पर्वणीच. छोट्या उद्योगांना यामुळे बळ मिळून ते स्वत: बरोबरच इतरांनाही आर्थिक

वनराईसाठी सैनिकांचा इको टास्क फोर्स

                     दिनां क : 7.7 .201 7         आव्हान नवे पेलू चला, हिरवे रान फुलवू चला ! असे म्हणत शासनाने दि. 1 जुलै ते 7 जुलै कालावधीत चार कोटी वृक्ष लागवडीचा निर्धार केला होता. हा निर्धार अवघ्या सहा दिवसातच पूर्ण झाला. मराठवाड्यातही जोमाने वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात आली. या वृक्ष लागवड कार्यक्रमावर आधारित हा विशेष लेख.             ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे…वनचरे…’, असं संत तुकारामांनी आपल्याला वृक्षाचे महत्त्व सांगितलं आहे. मराठवाडा तर संतांची भूमी. तरी देखील इथल्या वनक्षेत्राचा विचार केला तर ते अवघं 4.82 टक्के. ‘राष्ट्रीय वन नीती’ नुसार एकूण भूभागाच्या वनक्षेत्र 33 टक्के असायला हवं. पण ते नाहीय, हे वास्तव. राज्यभरात सध्या गतवर्षीप्रमाणे ‘वृक्ष लागवड कार्यक्रम सप्ताह’ उत्साहात साजरा झाला. यामध्ये सर्वजण उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहे. ते होणं स्वास्थदायी समाजासाठी पूरक आणि आवश्यकच आहे. त्यादृष्टीनं समाजाने, शासनाने द्रूतगतीनं पावले उचललीत. यंदाचे ठरविलेले वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट एक दिवस अगोदरच पूर्ण झाले. त्यामुळे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जनतेचे आभारही मानले. एक

महाराष्ट्राचे नाथ : संत एकनाथ

दिनां क : 14 . 3 .201 7 औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणमधील नाथ षष्ठी सोहळा म्हणजे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची यात्रा. पंढरपूर यात्रे खालोखाल लाखोंच्या संख्येने भाविक येथे येतात. सप्तमी, अष्टमीला मोठ्याप्रमाणात उत्सव साजरा होतो. मुख्य पालखीसोबत अंदाजे 600 दिंड्या राज्यभरातून येथे येतात. यामध्ये जवळपास 4 लाखांपेक्षा अधिक भाविक श्री एकनाथ महाराजांच्या दर्शनाला महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेरुन येतात. काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता होते. दरवर्षी यात्रेचे सुनियोजन प्रशासनामार्फत केले जाते. यंदाही जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांनी नियोजनासंदर्भात पैठण येथे आढावा बैठक घेतली. त्यांच्या निर्देशानुसार प्रशासनाने भाविकांना सुविधा देण्यावर भर दिला आहे. दिनांक 18 ते 20 मार्च या कालावधीत पार पडणाऱ्या श्री नाथ षष्ठी सोहळयानिमित्त हा विशेष लेख. संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील महत्त्वाचे संत. त्यांचे जन्मस्थान गोदावरी काठावरील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण. संत एकनाथ महाराज स्वत: आपल्या गुरुंचा जन्मदिवस आणि पुण्यतिथी षष्ठीलाच साजरी करत. पारंपरिक मराठी पंचांग, दिनदर्शिकेप्रमाणे फाल्गुन महिन्यात

मराठवाड्याच्या विकासाला ‘मेन’ मार्गदर्शक

          मराठवाड्यात पहिल्यांदाच संपादकांची परिषद हा स्तुत्य प्रयोग औरंगाबाद येथे झाला. दिवसभर विचारांची देवाण-घेवाण होऊन मराठवाड्यातील संपादकांची साखळी  (मराठवाडा एडिटर्स नेटवर्क) निर्माण व्हावी, अशी संकल्पना यातून समोर आली. समाजाला दिशा देण्याचे कार्य करणा-या संपादकांनी या विचारमंथनात उत्सफूर्तपणे सहभाग नोंदवला. या परिषदेवरचा हा वृत्तांत.           माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, युनिसेफ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागाच्यावतीने या कार्यक्रमाचे दि.20 रोजी विद्यापीठाच्या महात्मा फुले सभागृहात आयोजन करण्यात आले होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए.चोपडे , जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख प्रोफेसर डॉ. सुधीर गव्हाणे, माहिती व जनसंपर्क मराठवाडा विभागाचे प्र. संचालक यशवंत भंडारे, आरोग्य विभागाचे उपसंचालक विजय कंदेवाड, युनिसेफच्या स्वाती मोहोपात्रा, राजेश्वरी चंद्रशेखर,भूयान खनेंद्र, अल्पा व्होरा, विकास सावंत यांनी या परिषदेत बालक, स्त्रियांचे प्रश्न आणि विकास याबाबतीत संपादकांसमोर विचार मांडले.मा