Skip to main content

अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याची जनजागृती आवश्यक - नवल किशोर राम

दिनांक 24 जानेवारी 2016

औरंगाबाद, दि.24 - भारतीय संविधानाचे संरक्षण, अंमलबजावणी करणे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे. संविधानातील तरतुदीनुसार अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनुसूचित जाती, जमाती घटकातील सर्वांपर्यंत या कायद्याबाबत जनजागृती होणेही अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केले.
महसूल प्रबोधिनी येथे औरंगाबाद परीक्षेत्रातील नागरी हक्क संरक्षण व महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाच्यावतीने अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत पोलिस अधिकाऱ्यांसाठी आयेाजित प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी श्री. राम बोलत होते. यावेळी औरंगाबाद परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे, नागरी हक्क संरक्षण व महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक कैसर खालिद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह , पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, उस्मानाबादचे जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज क्षीरसागर, बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जालना जिल्हा पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. राम म्हणाले, अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाची (ॲट्रॉसिटी) योग्यप्रकारे प्रभावी अंमलबजावणी होणे अत्यावश्यक आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हास्तरावर समिती आहे. समितीच्या माध्यमातून अंमलबजावणी आणि कार्यवाहीचा सातत्याने आढावा घेण्यात येत असतो. तरीदेखील सामान्यांपर्यंत या कायद्याबाबत अजूनही मोठ्याप्रमाणात जनजागृती होणे अपेक्षित आहे. माहिती, शिक्षण आणि संवादाच्या माध्यमातून ॲट्रॉसिटीबाबत सामान्यांत जागृती निर्माण करणे. या कायद्याचा गैरवापर होणार नाही याबाबतची खबरदारी घेणे. सर्व यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी सतर्क राहून योग्य कार्यवाही पार पाडणे अत्यावश्यक असल्याचेही श्री. राम यांनी सांगितले. औरंगाबाद जिल्ह्यात ॲट्रॉसिटी कायद्याची योग्य आणि प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सर्व यंत्रणा कार्य करीत आहे. ॲट्रॉसिटी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही श्री. राम म्हणाले.
              सुरुवातीला दीपप्रज्वलन करुन कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यशाळेचे प्रास्ताविक पोलिस अधीक्षक श्री. परदेशी यांनी केले. त्यांनी कार्यशाळे मागील हेतू, आवश्यकता आणि कायदा अंमलबजावणीसाठी करावयाची कार्यवाही याबाबत प्रास्ताविकात माहिती दिली. कार्यशाळेस बहुसंख्येने पोलीस, सामाजिक न्याय आणि महसूल यंत्रणेतील अधिकारी उपस्थित होते.
विशेष पोलिस महानिरीक्षकांनी घेतला गुन्ह्यांचा आढावा
    प्रत्येकाने ॲट्रॉसिटी कायद्याची प्रभावी, योग्यप्रकारे आणि वेळेत अंमलबजाणी करणे महत्त्वाचे आहे. त्यानुसार प्रत्येकाने कार्यवाही करावी, असे विशेष  पोलीस महानिरीक्षक कैसर खालिद यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. उद्घाटनसत्रानंतर  गुन्हे सबंधाने आढावा बैठकीत श्री. कैसर अधिका-यांना मार्गदर्शन करत होते. मराठवाड्यातील ॲट्रॉसिटीसंदर्भातील राबविण्यात येणारी कार्यवाही, तपासणी प्रक्रिया, एफआयआर दाखल करणे, जातीचा उल्लेख, पंच फितुरी, प्रलंबित गुन्हे आदींबाबत सविस्तर जिल्हानिहाय आढावा घेऊन उपस्थित अधिकाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले.
पोलिस विभागाने आयोजित केलेल्या या कार्यशाळेचा लाभ सर्व यंत्रणेतील अधिका-यांना नक्कीच होईल, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्यक्त केली. औरंगाबाद परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी समाजातील अनिष्ट रूढी, परंपरांना बळी न पडता ॲट्रॉसिटी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सर्व यंत्रणांनी पुढाकार घेऊन कार्यवाही पार पाडावी, असे यावेळी सांगितले.


Comments

Popular posts from this blog

मनीषा दांडगेचा ‘खडतर प्रवास, जिद्द आणि यश’

दिनांक:- 16-05-2017 लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी पदाची निवड 2013 मध्ये झाली. 2014 मध्ये पोस्टींग मिळाली. परंतु ‘ झोपडपट्टीतील तरूणी झाली उपजिल्हाधिकारी’   अशा आशयाचा मजकूर तरूणांना अजूनही फेसबुक, न्यूज वेब पोर्टल अन् व्हाटसअ्पव्दारे प्रेरित करत आहे. स्पर्धा परीक्षकांसाठी प्रेरणादायी अशीच चंद्रपूर जिल्ह्यातील मूलच्या उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे यांची यशकथा. व्हाटस्अप  आणि आई             व्हाटसअपवरील संदेश उपजिल्हाधिकारी झालेल्या मनीषा दांडगे यांच्या आईला आजही त्यांच्या राहत्या घराच्या परिसरातील तरूण वर्ग वाचून दाखवतात. तेव्हा आईला लेकीचा अभिमान अन् मिळविलेल्या पदाचा झालेला आनंद हा गगनात मावेनासा होतो. परिसरातील तरूण वर्गही झपाट्याने अभ्यास करून डोळ्यासमोर मनीषा दांडगे यांचा आदर्श ठेवून स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षणाचा ध्यास घेत आहे,  शिकत आहे, असे आई असलेल्या लक्ष्मी दांडगे अभिमानाने सांगतात. बुध्दिमत्तेची चुणूक             तसा हा परिसर म्हणजे झोपडपट्टी. औरंगाबादेतील जाधववाडी जवळील आंबेडकर नगर. मनीषा यांचे वडील मातीकाम करणारे (मिस्त्री). 34 वर्षापूर्वी ते जालना

भूसंपादन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा उपयुक्त -नवल किशोर राम

दिनांक 31 जानेवारी 2018 औरंगाबाद,दि. 31   - भूसंपादन कायद्याबाबत सखोल माहिती होऊन योग्य आणि प्रभावीपणे कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी भूसंपादन प्रशिक्षण कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण, उपयुक्त असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा, पारदर्शकतेचा हक्क अधिनियमावर आधारीत जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम बोलत होते. यावेळी उपायुक्त महेंद्र हरपाळकर, अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन समन्वय) मंजुषा मुथा आदींसह सर्व उपविभागीय अधिकारी नायब तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ आदी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेला सुरुवात झाली. कार्यशाळेत नवीन भूसंपादन अधिनियम 2013 कायद्यातील महत्त्वाच्या बाबी, भूसंपादन प्रस्ताव सादर करणे, सामाजिक परिणाम निर्धारण

नयनरम्‍य खिंडसी...

राष्‍ट्रीय कृषी प्रदर्शन नागपुरात पार पडलं. पाच दिवसाच्‍या या प्रदर्शनानंतर पर्यटनाची मजा लुटण्‍यासाठी आम्‍ही खिंडसीला गेलो. नागपूरपासून जवळच असलेलं हे खिंडसी. रामटेकच्‍या राम मंदिरानंतर पाहायला मिळतं. निसर्गरम्‍य अशा ठिकाणी सर्वच जण इथं येतात. अगदी चिमुकल्‍यांपासून ते वृद्धांपर्यंत. तरुणाईसाठी तर सांगायचं कामच नाही. मनाला भावणारं असं हे खिंडसी पर्यटन. या पर्यटनाची मजा लुटली ती आम्‍ही.... म्‍हणजे माझे मित्र चंद्रकांत पाटील , संग्राम इंगळे आणि निलेशने. खूपच सुखावणारा अनुभव होता तो. तरुणाई , शाळकरी मुलं-मुली , शिक्षक , नवदांपत्‍य आणि भरभरून असलेला निसर्ग... डोळे कसे तृप्‍त करून जातो , ही इथं आल्‍यावरच कळतं. जलसफर गोवा आणि मुंबईत केली परंतु इथली जलसफरही तितक्‍याच तोडीची आहे. याठिकाणी येणा-या पर्यटकांची राहण्‍याची सोयही उत्‍तम आहे. जेवणाचीही व्‍यवस्‍था आहे , अगदी मांसाहारापासून शाकाहारापर्यंत , तेही चविष्‍ट. उन्‍हाळयात तर याठिकाणी प्रत्‍येकाने भेट द्यायलाच हवी , असं हे नयनरम्‍य असं ठिकाण आहे.  (व्‍हीडिओ सौजन्‍यः चंद्रकांत पाटील)