Skip to main content

सरकारचा पहिला निर्णय : सेवेची हमी आणि अंमलबजावणी

सरकारचा पहिला निर्णय :
सेवेची हमी आणि अंमलबजावणी
          रकारी काम आणि सहा महिने थांब, असं उपरोधानं बोलल्या जायचं. पण आता अशी परिस्थिती राहलेली नाही ; कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेवा हमी विधेयक लागू करणार असल्याचं पहिलं आश्वासन त्यांच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत जनतेला दिलं, अन् ते लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या अंमलबजावणी करून पूर्णही केलं. आता सामान्य नागरिकांना सरकारी उंबरठे झिजवण्याची गरज नाही. सेवा, सेवेचा कालावधी; त्यासंबंधित सरकारी जबाबदारी या अधिनियमामुळे निश्चित झाली. योग्य वेळेत सेवा दिली नाही. तर कसूरदार अधिका-यांवर किमान पाचशे ते पाच हजार रूपयांपर्यंतची शास्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता सामान्यांना वेळेत सेवा मिळण्याचा हक्क लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीतून मिळण्यास सुरूवात झालेली आहे.
              सरकारी कार्यालयातील स्थिती अधिनियमामुळे बदलण्यास मदत होणार आहे. सामान्यांना सरकारी कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागणार नाहीत; ते केवळ 28 एप्रिल 2015 रोजी अंमलात आलेल्या लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मुळे. पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम समायोचित लोकसेवा देण्यासाठी हा अधिनियम करण्यात आला. शासनाची मालकी, नियंत्रण असलेली किंवा वित्त पुरवठा केलेली संस्था, सहकारी संस्था, शासकीय कंपनी किंवा प्राधिकरण तसेच शासनाकडून वित्तीय सहाय मिळणारी अशासकीय संघटना यांकरिताही हा अधिनियम बंधनकारक असणार आहे.
              नवीन शिधापत्रिका, गहाळ झालेली दुय्यम शिधापत्रिका असो वा त्यात पत्ता बदल करावयाचा असो. उत्त्पन्नाचे प्रमाणपत्र असो की, हैसियत, वास्तव्याचे प्रमाणपत्र, जन्म, मृत्यू नोंद आदेश आदी प्रकारच्या अशा एकूण 29 विभागांच्या 160 लोकसेवा शासनाने अधिसूचित केलेल्या आहेत. त्यामुळं नागरिकांना आता शासनाच्या कोणत्याही विभागात सेवा नियत मिळविण्याची हमी मिळाली आहे. लोकसेवा देणाऱ्या यंत्रणेत अधिकाधिक पारदर्शकता व उत्तरदायित्वाची जाणीव निर्माण होण्यास मदतच होणार आहे.
             सदर कायदा अधिक प्रभावी करण्यासाठी लोकसेवा देणाऱ्या विभागांतील अधिकाऱ्यांमध्ये या अधिनियमातील तरतूदी, नियत कालमर्यादा, लोकसेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर, उचित प्रशिक्षकाची नियुक्ती, शास्ती वसुलीची कार्यपद्धती आदींबाबत या अधिनियमाची तोंडओळख होऊन  अधिकारी, कर्मचारी यांना  प्रशिक्षित करण्याचा कार्यक्रम राज्यभरात राबविण्यात आला. त्यामुळे या अधिनियमाबाबतच्या शंकांचे निरसनही झाले.
            लोकसेवा प्राप्त करण्यासाठी कोणत्याही पात्र व्यक्तीस पदनिर्देशित अधिका-याकडे अर्ज करता येणार आहे. अर्ज मिळाल्याची रीतसर पोच कार्यालयाकडून मिळेल. पात्र व्यक्तीस, असा अर्ज निकाली काढण्यासाठी निश्चित केलेल्या कालमर्यादेसह अर्ज मिळाल्याचा दिनांक आणि ठिकाण, विशिष्ट अर्ज क्रमांक, लेखी किंवा इलेक्ट्रॉनिक साधनांमार्फत कळविण्यात येईललोकसेवा प्राप्त करण्यासाठी सर्व बाबतीत परिपूर्ण असलेला आवश्यक तो अर्ज कार्यालयात दाखल केला तेव्हापासून कालमर्यादा मोजली जाईल.  
                किती कालावधीत सेवेचे काम पूर्ण करणार, त्यासाठी शुल्क किती, कागदपत्रे कोणती द्यावयाची याची माहिती संबंधित कार्यालयाला जाहीर करावी लागली आहेत. त्यामुळे, योग्य कागदपत्रे दिल्यानंतर, वेळेत काम पूर्ण करणे बंधनकारक झाले आहे. काम झाल्यास, पात्र व्यक्तीला तक्रार करता येणार आहे. आतापर्यंत हा हक्क नागरिकांना नव्हता. तो आता मिळाल्याने, भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक कारभार कार्यक्षम प्रशासनाची प्रचिती नागरिकांना येते आहे.
             नागरिकांना सेवा देण्यामध्ये एका वर्षात कसुरीची कोणतीही नोंद करण्यात आलेली नसेल पदनिर्देशित अधिकारी नियत कालमर्यादेच्या आत  लोकसेवा देत असेल अशा अधिका-याला शासनाकडून अधिसूचित करण्यात येईल इतकी रोख रक्कम प्रोत्साहन म्हणून प्रशस्ती प्रमाणपत्रासह, देता येईल आणि तसेच संबंधित अधिका-याच्या सेवा अभिलेखात त्याबाबतची नोंद देखील घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकसेवेला प्राधान्य देणा-या अधिकारी, कर्मचा-यांचा गौरव आणि कामाची दखल यामाध्यामातून घेतली जाणार आहे.
              त्यामुळं हा अधिनियम जनतेसह कार्यक्षम प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांचेसाठी -या अर्थाने गतिमानतेचे द्योतकच आहे. शासनासाठी गतिमान प्रशासनाची हमी असून जनतेलाही नियत सेवेची हमी यामाध्यमातून मिळण्याचा हक्क, शस्त्र प्राप्त झालेले आहे.                                                                                                                       - श्याम टरके, वर्धा

Comments

Popular posts from this blog

मनीषा दांडगेचा ‘खडतर प्रवास, जिद्द आणि यश’

दिनांक:- 16-05-2017 लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी पदाची निवड 2013 मध्ये झाली. 2014 मध्ये पोस्टींग मिळाली. परंतु ‘ झोपडपट्टीतील तरूणी झाली उपजिल्हाधिकारी’   अशा आशयाचा मजकूर तरूणांना अजूनही फेसबुक, न्यूज वेब पोर्टल अन् व्हाटसअ्पव्दारे प्रेरित करत आहे. स्पर्धा परीक्षकांसाठी प्रेरणादायी अशीच चंद्रपूर जिल्ह्यातील मूलच्या उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे यांची यशकथा. व्हाटस्अप  आणि आई             व्हाटसअपवरील संदेश उपजिल्हाधिकारी झालेल्या मनीषा दांडगे यांच्या आईला आजही त्यांच्या राहत्या घराच्या परिसरातील तरूण वर्ग वाचून दाखवतात. तेव्हा आईला लेकीचा अभिमान अन् मिळविलेल्या पदाचा झालेला आनंद हा गगनात मावेनासा होतो. परिसरातील तरूण वर्गही झपाट्याने अभ्यास करून डोळ्यासमोर मनीषा दांडगे यांचा आदर्श ठेवून स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षणाचा ध्यास घेत आहे,  शिकत आहे, असे आई असलेल्या लक्ष्मी दांडगे अभिमानाने सांगतात. बुध्दिमत्तेची चुणूक             तसा हा परिसर म्हणजे झोपडपट्टी. औरंगाबादेतील जाधववाडी जवळील आंबेडकर नगर. मनीषा यांचे वडील मातीकाम करणारे (मिस्त्री). 34 वर्षापूर्वी ते जालना

भूसंपादन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा उपयुक्त -नवल किशोर राम

दिनांक 31 जानेवारी 2018 औरंगाबाद,दि. 31   - भूसंपादन कायद्याबाबत सखोल माहिती होऊन योग्य आणि प्रभावीपणे कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी भूसंपादन प्रशिक्षण कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण, उपयुक्त असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा, पारदर्शकतेचा हक्क अधिनियमावर आधारीत जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम बोलत होते. यावेळी उपायुक्त महेंद्र हरपाळकर, अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन समन्वय) मंजुषा मुथा आदींसह सर्व उपविभागीय अधिकारी नायब तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ आदी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेला सुरुवात झाली. कार्यशाळेत नवीन भूसंपादन अधिनियम 2013 कायद्यातील महत्त्वाच्या बाबी, भूसंपादन प्रस्ताव सादर करणे, सामाजिक परिणाम निर्धारण

नयनरम्‍य खिंडसी...

राष्‍ट्रीय कृषी प्रदर्शन नागपुरात पार पडलं. पाच दिवसाच्‍या या प्रदर्शनानंतर पर्यटनाची मजा लुटण्‍यासाठी आम्‍ही खिंडसीला गेलो. नागपूरपासून जवळच असलेलं हे खिंडसी. रामटेकच्‍या राम मंदिरानंतर पाहायला मिळतं. निसर्गरम्‍य अशा ठिकाणी सर्वच जण इथं येतात. अगदी चिमुकल्‍यांपासून ते वृद्धांपर्यंत. तरुणाईसाठी तर सांगायचं कामच नाही. मनाला भावणारं असं हे खिंडसी पर्यटन. या पर्यटनाची मजा लुटली ती आम्‍ही.... म्‍हणजे माझे मित्र चंद्रकांत पाटील , संग्राम इंगळे आणि निलेशने. खूपच सुखावणारा अनुभव होता तो. तरुणाई , शाळकरी मुलं-मुली , शिक्षक , नवदांपत्‍य आणि भरभरून असलेला निसर्ग... डोळे कसे तृप्‍त करून जातो , ही इथं आल्‍यावरच कळतं. जलसफर गोवा आणि मुंबईत केली परंतु इथली जलसफरही तितक्‍याच तोडीची आहे. याठिकाणी येणा-या पर्यटकांची राहण्‍याची सोयही उत्‍तम आहे. जेवणाचीही व्‍यवस्‍था आहे , अगदी मांसाहारापासून शाकाहारापर्यंत , तेही चविष्‍ट. उन्‍हाळयात तर याठिकाणी प्रत्‍येकाने भेट द्यायलाच हवी , असं हे नयनरम्‍य असं ठिकाण आहे.  (व्‍हीडिओ सौजन्‍यः चंद्रकांत पाटील)