Skip to main content

Posts

Showing posts from 2015

वन संवर्धनाचा अमूल्य ठेवा ‘पेंच’

वन संवर्धनाचा अमूल्य ठेवा ‘पेंच’ वि दर्भातील वाघांच्या सर्वाधिक अधिवासामुळे नागपूर हे टायगर कॅपिटल म्हणून प्रकाशझोतात आले आहे . नागपूरच्या पेंच व्याघ्र संवर्धन प्रकल्पामुळे जैवविविधता आणि निसर्ग सौंदर्याबरोबरच वन्यप्राण्यांचे दर्शन याठिकाणी आपणाला घडते . पट्टेदार वाघ , हरिण , साळिंदर , नीलगाय , अस्वल , मोर आदी प्रकारचे वन्यप्राणी पर्यटकांना वारंवार येण्यासाठी खुणावतात . त्यांचे व वनाचे उत्तम संवर्धन म्हणजे आपल्यासाठी पेंच प्रकल्प अमूल्य असा ठेवाच म्हणावे लागेल . निसर्गावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने एकदा तरी या ठिकाणी भेट द्यावीच , असाच हा पेंच व्याघ्र संवर्धन प्रकल्प होय .        येथील डिसेंबर महिन्यातली गुलाबी थंडी आणि आजूबाजूचे पर्यटन पर्यटकांना भूरळ घालतातच. राज्यातील सहापैकी पाच व्याघ्र प्रकल्प एकट्या नागपूर-अमरावती विभागात आहेत. महाराष्ट्र शासनाचे प्रयत्न, पर्यावरणप्रेमी संघटनांची साथ आणि सेलिब्रिटींचा सहभाग यामुळे वन्यजीवांचे संवर्धन होत आहे. राज्यातील सर्वाधिक वाघांचा अधिवास नागपूर-अमरावती विभागात आहे. त्यातही स

जलयुक्त शिवार एक समृद्ध गाव असतं....

जलयुक्त शिवार एक समृद्ध गाव असतं....   मध्य भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय कृषी प्रदर्शन, नागपूरच्या रेशीम बाग मैदानावर आयोजि त करण्यात आले आहे. ॲग्रो व्हिजन असे या प्रदर्शनाचे नाव. शेतक-यांना नवनवीन तंत्रज्ञानाची कास धरण्यास उद्युक्त करून शेतीत आमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी मोलाची भर पाडणारे हे कृषी प्रदर्शन. याठिकाणी 250 हून अधिक शेतीशी संबंधित दालने आहेत. दालनात शेती, शेतीपूरक उद्योग, बी-बियाणे, आधुनिक तंत्रज्ञान, अर्थसाहाय्य करणा-या वित्तीय संस्था, शेती उपयोगी वाहने, मसालेदार, चटपट अशा घरगुती उपयोगी वस्तू, खाद्यान्नाचे 23 हून अधिक बचत गटांचे स्टॉल्स यावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहावयास मिळत आहे.           शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, पर्यटन, कृषी मंडळे, विविध राज्यातून आलेले कृषीविषयक स्टॉल्स, देशातील कृषीशी संबंधित महत्त्वपूर्ण अशी विविध मंडळे, संस्था यांची दालने येथील शेतक-यांच्या ज्ञानात मोलाची भर घालत आहेत. त्यातच शेतक-यांना त्यांच्या प्रयोगात्मक शेतीसाठी तज्ञांचे मार्गदर्शनही या प्रदर्शन व कार्यशाळेत आयोजित करण्यात आलेले आहे. त्यामध्येही सर्वात अधिक महत्त्वाचे आणि

तान्हा पोळा

सिंधी रेल्वे येथील तान्हा पोळा.

आरोग्‍यं धन संपदा ...

आरोग्‍य हीच आपली संपत्‍ती आरोग्‍याची काळजी प्रत्‍येकाने घ्‍यावी ती घेणे गरजेचेच आहे. म्‍हणून तर सर सलाम तर पगडी पचास... असं म्‍हटल जातं. आपल्‍या आरोग्‍यात बिघाड झाला तर आरोग्‍य यंत्रणा आहेतच. जिल्‍ह्यातील जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय आणि तेथे रुग्‍णांना मिळत असलेल्‍या लोकोपयोगी अशा योजना  व कार्यक्रमांची माहिती घेणारा हा आढावा.... https://commons.wikimedia.org                आरोग्यं धन संपदा असं म्‍हटलं जातं. मानवाच्‍या  उत्‍पत्‍तीपासूनच मानव आरोग्‍याची त्‍याला जमेल तशी काळजी घेतो. पूर्वी आयुर्वेदाचा आधाराने आजारावर उपचार होत. वैद्य जडीबुटी देऊन आजारी व्‍यक्‍तीला नीट  करत. काळ बदलला आज 21 व्‍या शतकात मानव वाटचाल करीत आहे. युगानुरुप आरोग्‍य सुविधेत आमुलाग्र बदल झाले. विज्ञानाने प्रगती साधली . असाध्‍य आजारावर साध्य असे उपचार होऊ लागलेत. वर्धा जिल्ह्यातील आरोग्‍य यंत्रणेने रुग्‍णसेवा हीच ईश्‍वर सेवा मानून येथील जनतेची निःस्‍वार्थपणे , योग्‍य व यथोचितरीत्‍या सेवा केली, करत आहेत ते येथील कर्तव्‍य तत्‍पर असे  शल्यचिकित्‍सक, वैद्यकीय तज्ञ , अधिकारी, पारिचारिका यांच्‍या दैनंदिन कार

सरकारचा पहिला निर्णय : सेवेची हमी आणि अंमलबजावणी

सरकारचा पहिला निर्णय : सेवेची हमी आणि अंमलबजावणी           स रकारी काम आणि सहा महिने थांब , असं उपरोधानं बोलल्या जायचं . पण आता अशी परिस्थिती राहलेली नाही ; कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेवा हमी विधेयक लागू करणार असल्याचं पहिलं आश्वासन त्यांच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत जनतेला दिलं , अन् ते लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या अंमलबजावणी करून पूर्णही केलं . आता सामान्य नागरिकांना सरकारी उंबरठे झिजवण्याची गरज नाही . सेवा , सेवेचा कालावधी ; त्यासंबंधित सरकारी जबाबदारी या अधिनियमामुळे निश्चित झाली . योग्य वेळेत सेवा दिली नाही . तर कसूरदार अधिका - यांवर किमान पाचशे ते पाच हजार रूपयांपर्यंतची शास्ती करण्यात आलेली आहे . त्यामुळे आता सामान्यांना वेळेत सेवा मिळण्याचा हक्क लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीतून मिळण्यास सुरूवात झालेली आहे .               सरकारी कार्यालयातील स्थिती अधिनियमामुळे बदलण्यास मदत होणार आहे . सामान्यांना सरकारी कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागणार नाहीत