Skip to main content

जलयुक्त शिवार एक समृद्ध गाव असतं....

जलयुक्त शिवार एक समृद्ध गाव असतं....
  मध्य भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय कृषी प्रदर्शन, नागपूरच्या रेशीम बाग मैदानावर आयोजि
त करण्यात आले आहे. ॲग्रो व्हिजन असे या प्रदर्शनाचे नाव. शेतक-यांना नवनवीन तंत्रज्ञानाची कास धरण्यास उद्युक्त करून शेतीत आमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी मोलाची भर पाडणारे हे कृषी प्रदर्शन. याठिकाणी 250 हून अधिक शेतीशी संबंधित दालने आहेत. दालनात शेती, शेतीपूरक उद्योग, बी-बियाणे, आधुनिक तंत्रज्ञान, अर्थसाहाय्य करणा-या वित्तीय संस्था, शेती उपयोगी वाहने, मसालेदार, चटपट अशा घरगुती उपयोगी वस्तू, खाद्यान्नाचे 23 हून अधिक बचत गटांचे स्टॉल्स यावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहावयास मिळत आहे.
          शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, पर्यटन, कृषी मंडळे, विविध राज्यातून आलेले कृषीविषयक स्टॉल्स, देशातील कृषीशी संबंधित महत्त्वपूर्ण अशी विविध मंडळे, संस्था यांची दालने येथील शेतक-यांच्या ज्ञानात मोलाची भर घालत आहेत. त्यातच शेतक-यांना त्यांच्या प्रयोगात्मक शेतीसाठी तज्ञांचे मार्गदर्शनही या प्रदर्शन व कार्यशाळेत आयोजित करण्यात आलेले आहे. त्यामध्येही सर्वात अधिक महत्त्वाचे आणि सर्वांचे लक्ष वेधून घेणारे दालन म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी अशा जलयुक्त शिवार अभियानाचे.  
          प्रदर्शनाच्या सुरूवातीलाच असलेले जलसंधारण व कृषी विभागाच्या या दालनामध्ये अविकसीत पाणलोट या गावाचा नमुना दाखविण्यात आलेला आहे. त्याच्याबाजूलाच सुनियोजनातून जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून हिरवा कंच असा डोंगर आणि या डोंगरावर वसलेल्या जलयुक्त गावात पाण्याच्या योग्य नियोजनाने घडवून आणलेला बदल हे सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. ओसाड आणि नियोजनशुन्य पाणी व्यवस्थापनाच्या डोंगराच्या बाजूलाच या डोंगरावर नियोजन केल्यास जलयुक्त शिवार अभियानाचा हेतू आणि लोककल्याण हे पाहावयास मिळते. त्यावर माथा ते पायथा या संकल्पनेतून जलयुक्त शिवार अभियानातून या जलयुक्त गावाचा कायापालट या ठिकाणी दाखविण्यात आला आहे.         त्यामध्ये  डीपी सिसीटी, गॅबियन स्ट्रक्चर, ढाळीची बांधबंदिस्ती, सिमेंट नाला बांध, माती नाला बांध, शेततळे, पॅडी बंडिंग, ठिबक, तुषार सिंचन, फुलशेती, मुक्त गोठा या ठिकाणी दाखविण्यात आलेले आहे. तसेच कृषीपंप, भूगर्भातील पाण्याच्या पातळीत झालेल्या वाढीमुळे विहिरींना प्राप्त होणारे भरपूर पाणी, प्रोत्साहन देऊन करण्यात आलेली वृक्ष लागवड, अभियानात लोकसहभागाचे महत्त्व याठिकाणी “जलयुक्त गाव” मॉडेलच्या माध्यमातून शेतक-यांना उत्तमरित्या समजावून सांगण्यात येते आहे. 
       राज्यातील 6,202 गावे या अभियानांतर्गत निवडण्यात आलेली असून विदर्भात 2473 गावे निवडण्यात आलेली आहेत. त्यामध्ये राज्यात 1 लाख 24 हजार 584 आणि विदर्भातील 35 हजार 500 कामे पूर्ण झाली आहेत. 3920 सिमेंट नाला बांधांची निर्मिती करण्यात आली आहे. लोकसहभागातून 246 कोटींची कामे पूर्ण झालेली आहेत. या अभियानाच्या माध्यमातून पाण्याचे योग्य नियोजन होऊन शेतीचा शाश्वत विकास होण्यास मदत झाली आहे. अभियानातून राज्यात 6.11 लाख हेक्टर सिंचन क्षमतेची निर्मिती झाली असून त्यात विदर्भातील 1.11 लाख हेक्टरचा समावेश असल्याचा या दालनावर सर्वांना माहिती देत असलेले काटोलचे मंडळ कृषी अधिकारी व्ही.ए. भांडवलकर, नागपूरचे कृषी सहायक एम.बी. गजभिये यांनी सांगितले. 
        निश्चितच शेतक-यांसाठी जलयुक्त शिवार अभियान आता महत्त्वाची योजना झालेली असून या योजनेत शेतक-यांचा सहभागही मोठ्याप्रमाणात वाढत आहे. शेतक-यांना त्याचा फायदा होत असून सिंचन क्षमतेत वाढ होण्यास मदत होते आहे. गावातले पाणी गावात आडवल्याने त्याचा उपयोग गावासह शेतक-यांना शेतीसाठी मोठ्याप्रमाणात होतो आहे. याबाबत आपणाला नागपूरच्या जिल्हा परिषदेच्या विभागामार्फत लावण्यात आलेल्या दालनातून हे स्पष्ट जाणवते. या दालनात काटोल तालुक्यातील गोंडी दिग्रसमध्ये 144 टीसीएम पाणी थांबले यावरून स्पष्ट होते आहे. आजही याठिकाणी जून पासून किमान 3 कि.मी पाणी थांबले आहे.
      आजूबाजूच्या 300 विहिरींना त्याचा लाभ झाला असल्याचे जिल्हा परिषदेचे शाखा अभियंता एस.पी. वाघमारे, उपविभागीय अभियंता टी.डी. पारधी हे प्रदर्शनात येणा-या प्रत्येक शेतक-यांना समजावून सांगताना दिसतात. एकूणच प्रदर्शनामध्ये जलयुक्त शिवार अभियानाचा स्टॉल्सवरील मॉडेल पाहण्यास शेतक-यांची मोठ्याप्रमाणात गर्दी  होत असून यामध्ये त्यांचा सहभाग असल्याचे ते सांगतात. तसेच विविध शंकेचे निरसनही येथील मॉडेलच्या माध्यमातून ते करून घेतात. कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतीला आवश्यक आणि सुनियोजित पाणी दिल्यास पाण्याचा योग्य वापर होऊन शेतीही सुजलाम सुफलाम होईल,असा विश्वास शेतक-यांना आल्याचे याठिकाणी पाहावयास मिळतो. या प्रदर्शनातून काही शेतकरी आदर्श मॉडेल उभे करतील, अशी अपेक्षाही आहे.                                                      - श्याम टरके, नागपूर

Comments

Popular posts from this blog

मनीषा दांडगेचा ‘खडतर प्रवास, जिद्द आणि यश’

दिनांक:- 16-05-2017 लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी पदाची निवड 2013 मध्ये झाली. 2014 मध्ये पोस्टींग मिळाली. परंतु ‘ झोपडपट्टीतील तरूणी झाली उपजिल्हाधिकारी’   अशा आशयाचा मजकूर तरूणांना अजूनही फेसबुक, न्यूज वेब पोर्टल अन् व्हाटसअ्पव्दारे प्रेरित करत आहे. स्पर्धा परीक्षकांसाठी प्रेरणादायी अशीच चंद्रपूर जिल्ह्यातील मूलच्या उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे यांची यशकथा. व्हाटस्अप  आणि आई             व्हाटसअपवरील संदेश उपजिल्हाधिकारी झालेल्या मनीषा दांडगे यांच्या आईला आजही त्यांच्या राहत्या घराच्या परिसरातील तरूण वर्ग वाचून दाखवतात. तेव्हा आईला लेकीचा अभिमान अन् मिळविलेल्या पदाचा झालेला आनंद हा गगनात मावेनासा होतो. परिसरातील तरूण वर्गही झपाट्याने अभ्यास करून डोळ्यासमोर मनीषा दांडगे यांचा आदर्श ठेवून स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षणाचा ध्यास घेत आहे,  शिकत आहे, असे आई असलेल्या लक्ष्मी दांडगे अभिमानाने सांगतात. बुध्दिमत्तेची चुणूक             तसा हा परिसर म्हणजे झोपडपट्टी. औरंगाबादेतील जाधववाडी जवळील आंबेडकर नगर. मनीषा यांचे वडील मातीकाम करणारे (मिस्त्री). 34 वर्षापूर्वी ते जालना

भूसंपादन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा उपयुक्त -नवल किशोर राम

दिनांक 31 जानेवारी 2018 औरंगाबाद,दि. 31   - भूसंपादन कायद्याबाबत सखोल माहिती होऊन योग्य आणि प्रभावीपणे कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी भूसंपादन प्रशिक्षण कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण, उपयुक्त असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा, पारदर्शकतेचा हक्क अधिनियमावर आधारीत जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम बोलत होते. यावेळी उपायुक्त महेंद्र हरपाळकर, अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन समन्वय) मंजुषा मुथा आदींसह सर्व उपविभागीय अधिकारी नायब तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ आदी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेला सुरुवात झाली. कार्यशाळेत नवीन भूसंपादन अधिनियम 2013 कायद्यातील महत्त्वाच्या बाबी, भूसंपादन प्रस्ताव सादर करणे, सामाजिक परिणाम निर्धारण

नयनरम्‍य खिंडसी...

राष्‍ट्रीय कृषी प्रदर्शन नागपुरात पार पडलं. पाच दिवसाच्‍या या प्रदर्शनानंतर पर्यटनाची मजा लुटण्‍यासाठी आम्‍ही खिंडसीला गेलो. नागपूरपासून जवळच असलेलं हे खिंडसी. रामटेकच्‍या राम मंदिरानंतर पाहायला मिळतं. निसर्गरम्‍य अशा ठिकाणी सर्वच जण इथं येतात. अगदी चिमुकल्‍यांपासून ते वृद्धांपर्यंत. तरुणाईसाठी तर सांगायचं कामच नाही. मनाला भावणारं असं हे खिंडसी पर्यटन. या पर्यटनाची मजा लुटली ती आम्‍ही.... म्‍हणजे माझे मित्र चंद्रकांत पाटील , संग्राम इंगळे आणि निलेशने. खूपच सुखावणारा अनुभव होता तो. तरुणाई , शाळकरी मुलं-मुली , शिक्षक , नवदांपत्‍य आणि भरभरून असलेला निसर्ग... डोळे कसे तृप्‍त करून जातो , ही इथं आल्‍यावरच कळतं. जलसफर गोवा आणि मुंबईत केली परंतु इथली जलसफरही तितक्‍याच तोडीची आहे. याठिकाणी येणा-या पर्यटकांची राहण्‍याची सोयही उत्‍तम आहे. जेवणाचीही व्‍यवस्‍था आहे , अगदी मांसाहारापासून शाकाहारापर्यंत , तेही चविष्‍ट. उन्‍हाळयात तर याठिकाणी प्रत्‍येकाने भेट द्यायलाच हवी , असं हे नयनरम्‍य असं ठिकाण आहे.  (व्‍हीडिओ सौजन्‍यः चंद्रकांत पाटील)