Skip to main content

 

उदगीर तालुका पत्रकार संघाचा
जीवन गौरव पुरस्कार सुरेश पुरी यांना जाहीर

SURESH PURI
औरंगाबाद, दिनांक 06: उदगीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने सन २०१९-२०२० चे मराठवाडास्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथील जनसंवाद व वृत्तपत्रविभागाचे प्रा. सुरेश पुरी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे पत्रकार संघाचे अध्यक्ष राम मोतीपवळे व सचिव दयानंद बिरादार यांनी जाहीर केले. लवकरच मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

उदगीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने गत दहा वर्षापासून मराठवाडास्तरीय उत्कृष्ट वार्ता व शोध वार्ता या दोन गटातून पुरस्काराचे आयोजन केले जाते. पुरस्काराचे अकरावे वर्ष आहे. या वर्षी जाहीर झालेल्या पुरस्कारात

उत्कृष्ट वार्ता गटामध्ये‍ प्रथम पुरस्कार दैनिक सकाळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा बातमीदार अविनाश काळे यांच्या 'शेतमजूरी करुन शिक्षणासाठी घेतला फोन' या बातमीस अर्जुन मुद्दा यांच्यावतीने जेष्ठ पत्रकार कै.महादप्पा मुद्दा यांच्या स्मरणार्थ पाच हजार रुपये रोख रक्कम सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, व्दितीय पुरस्कार लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील वांजरवाडा येथील दैनिक पुण्यनगरीचे प्रतिनिधी विनोद गुरमे यांना 'रेणुकाच्या यशाला दु:खाची किनार' या बातमीस जेष्ठ संपादक निर्मलाताई बांगे यांच्यावतीने कै.वसंतराव बांगे यांच्या स्मरणार्थ तीन हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय पुरस्कार बीड जिल्ह्यातील माजलगावच्या दैनिक आदर्श गावकरीचे प्रतिनिधी ज्योतिराव पांढरपोटे यांच्या 'मिरची लागवडीतून एकरात चार लाखाचे उत्पन्न' या बातमीस पत्रकार दयानंद बिरादार यांच्यावतीने कै.नागनाथ बिरादार यांच्या स्मरणार्थ दोन हजार रुपये,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

शोध वार्ता गटामध्ये प्रथम पुरस्कार दैनिक पुढारीचे उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथील प्रतिनिधी शंकर बिराजदार यांच्या 'कुटुंबाच्या सुखदायिनीचेच आरोग्य धोक्यात' या बातमीस अर्जुन मुद्दा यांच्यावतीने जेष्ठ पत्रकार कै. महादप्पा मुद्दा यांच्या स्मरणार्थ पाच हजार रोख सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र, व्दितीय पुरस्कार लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील घोणसी येथील दैनिक पुण्यनगरीचे प्रतिनिधी हणमंत केंद्रे यांच्या 'राजूने बनवले वायरलेस विद्युत यंत्र' या बातमीस स्वामी विवेकानंद महाविद्यालय वृत्तपत्र विद्या विभाग यांच्यावतीने रोख तीन हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह, तृतीय पुरस्कार बापू नाईकवाडी जि.उस्मानाबाद यांच्या समय सारथी मधील 'गुराळामुळे परिसरातील शेकडो युवकांना रोजगार' या बातमीस पत्रकार  प्रशांत अपसिंगेकर यांच्यावतीने जेष्ठ पत्रकार कै.अनंत अपसिंगेकर यांच्या स्मरणार्थ रोख दोन हजार रुपये रोख सन्मानचिन्ह व प्रमाण पत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.

या पुरस्काराच्या निवडीसाठी परीक्षक म्हणून लातूर येथील जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, प्रा.शिवशंकर पटवारी व प्रा. डॉ.दत्ताहरी होनराव यांनी काम पाहिले.

*****

Comments

Popular posts from this blog

मनीषा दांडगेचा ‘खडतर प्रवास, जिद्द आणि यश’

दिनांक:- 16-05-2017 लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी पदाची निवड 2013 मध्ये झाली. 2014 मध्ये पोस्टींग मिळाली. परंतु ‘ झोपडपट्टीतील तरूणी झाली उपजिल्हाधिकारी’   अशा आशयाचा मजकूर तरूणांना अजूनही फेसबुक, न्यूज वेब पोर्टल अन् व्हाटसअ्पव्दारे प्रेरित करत आहे. स्पर्धा परीक्षकांसाठी प्रेरणादायी अशीच चंद्रपूर जिल्ह्यातील मूलच्या उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे यांची यशकथा. व्हाटस्अप  आणि आई             व्हाटसअपवरील संदेश उपजिल्हाधिकारी झालेल्या मनीषा दांडगे यांच्या आईला आजही त्यांच्या राहत्या घराच्या परिसरातील तरूण वर्ग वाचून दाखवतात. तेव्हा आईला लेकीचा अभिमान अन् मिळविलेल्या पदाचा झालेला आनंद हा गगनात मावेनासा होतो. परिसरातील तरूण वर्गही झपाट्याने अभ्यास करून डोळ्यासमोर मनीषा दांडगे यांचा आदर्श ठेवून स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षणाचा ध्यास घेत आहे,  शिकत आहे, असे आई असलेल्या लक्ष्मी दांडगे अभिमानाने सांगतात. बुध्दिमत्तेची चुणूक             तसा हा परिसर म्हणजे झोपडपट्टी. औरंगाबादेतील जाधववाडी जवळील आंबेडकर नगर. मनीषा यांचे वडील मातीकाम करणारे (मिस्त्री). 34 वर्षापूर्वी ते जालना

भूसंपादन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा उपयुक्त -नवल किशोर राम

दिनांक 31 जानेवारी 2018 औरंगाबाद,दि. 31   - भूसंपादन कायद्याबाबत सखोल माहिती होऊन योग्य आणि प्रभावीपणे कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी भूसंपादन प्रशिक्षण कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण, उपयुक्त असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा, पारदर्शकतेचा हक्क अधिनियमावर आधारीत जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम बोलत होते. यावेळी उपायुक्त महेंद्र हरपाळकर, अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन समन्वय) मंजुषा मुथा आदींसह सर्व उपविभागीय अधिकारी नायब तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ आदी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेला सुरुवात झाली. कार्यशाळेत नवीन भूसंपादन अधिनियम 2013 कायद्यातील महत्त्वाच्या बाबी, भूसंपादन प्रस्ताव सादर करणे, सामाजिक परिणाम निर्धारण

नयनरम्‍य खिंडसी...

राष्‍ट्रीय कृषी प्रदर्शन नागपुरात पार पडलं. पाच दिवसाच्‍या या प्रदर्शनानंतर पर्यटनाची मजा लुटण्‍यासाठी आम्‍ही खिंडसीला गेलो. नागपूरपासून जवळच असलेलं हे खिंडसी. रामटेकच्‍या राम मंदिरानंतर पाहायला मिळतं. निसर्गरम्‍य अशा ठिकाणी सर्वच जण इथं येतात. अगदी चिमुकल्‍यांपासून ते वृद्धांपर्यंत. तरुणाईसाठी तर सांगायचं कामच नाही. मनाला भावणारं असं हे खिंडसी पर्यटन. या पर्यटनाची मजा लुटली ती आम्‍ही.... म्‍हणजे माझे मित्र चंद्रकांत पाटील , संग्राम इंगळे आणि निलेशने. खूपच सुखावणारा अनुभव होता तो. तरुणाई , शाळकरी मुलं-मुली , शिक्षक , नवदांपत्‍य आणि भरभरून असलेला निसर्ग... डोळे कसे तृप्‍त करून जातो , ही इथं आल्‍यावरच कळतं. जलसफर गोवा आणि मुंबईत केली परंतु इथली जलसफरही तितक्‍याच तोडीची आहे. याठिकाणी येणा-या पर्यटकांची राहण्‍याची सोयही उत्‍तम आहे. जेवणाचीही व्‍यवस्‍था आहे , अगदी मांसाहारापासून शाकाहारापर्यंत , तेही चविष्‍ट. उन्‍हाळयात तर याठिकाणी प्रत्‍येकाने भेट द्यायलाच हवी , असं हे नयनरम्‍य असं ठिकाण आहे.  (व्‍हीडिओ सौजन्‍यः चंद्रकांत पाटील)