Skip to main content

कला, क्रीडा, पर्यटनालाअधिक चालना देणार : अदिती तटकरे


औरंगाबाद, दिनांक 9 :  औरंगाबादेतील कला, क्रीडा आणि पर्यटनाला अधिक चालना देऊन पर्यटन विकासासाठी आवश्यक त्या बाबींवर लवकरच अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही आज उद्योग, क्रीडा, पर्यटन आणि माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
प्रोझोन मॉल येथील आयनॉक्स चित्रपट गृहात यशवंतराव प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित सातव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक रवींद्र सिंगल, औरंगाबाद मनपाचे आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक वामन केंद्रे, एमजीएमचे अंकुशराव कदम, सत्कारमूर्ती सुमित्रा भावे, महोत्सवाचे संचालक अशोक राणे, उद्योजक नंदकिशोर कागलीवाल,  चंद्रकांत कुलकर्णी, निलेश राऊत व प्रतिष्ठानचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री तटकरे म्हणाल्या, ऐतिहासिक औरंगाबादची ओळख जपण्यासाठी शहरातील दरवाजांचे संवर्धन,  वेरूळ महोत्सव या बाबींवर योग्य अंमलबजावणी करण्यात येईल. औरंगाबाद पर्यटनाची राजधानी असल्याबरोबरच येथे कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्राला मोठया प्रमाणात वाव असल्याचेही त्या म्हणाल्या. 
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या या चित्रपट महोत्सवातून विविध चित्रपटातील सामाजिक प्रतिबिंब प्रेक्षकांसमोर आले. या महोत्सवातून चित्रपटप्रेमी, रसिकांना मोठ्याप्रमाणात व्यासपीठ, वैचारिक ठेवा उपलब्ध झाले आहे, ती काळाची गरज असल्याचे सांगत राज्यमंत्री तटकरे यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित या चित्रपट महोत्सवातील आयोजकांचे कौतुक केले. यावेळी श्री. कदम, कागलीवाल, केंद्रे, राणे, कुलकर्णी, श्रीमती पाटील यांनी महोत्सवाबाबत विचार व्यक्त केले.
 महोत्सव समितीच्यावतीने चित्रपट, लघुपट, माहितीपट विजेत्यांना मान्यवरांच्याहस्ते सन्मान देऊन गौरविण्यात आले. श्रीमती भावे यांना पदमपाणी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
  

Comments

Popular posts from this blog

मनीषा दांडगेचा ‘खडतर प्रवास, जिद्द आणि यश’

दिनांक:- 16-05-2017 लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी पदाची निवड 2013 मध्ये झाली. 2014 मध्ये पोस्टींग मिळाली. परंतु ‘ झोपडपट्टीतील तरूणी झाली उपजिल्हाधिकारी’   अशा आशयाचा मजकूर तरूणांना अजूनही फेसबुक, न्यूज वेब पोर्टल अन् व्हाटसअ्पव्दारे प्रेरित करत आहे. स्पर्धा परीक्षकांसाठी प्रेरणादायी अशीच चंद्रपूर जिल्ह्यातील मूलच्या उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे यांची यशकथा. व्हाटस्अप  आणि आई             व्हाटसअपवरील संदेश उपजिल्हाधिकारी झालेल्या मनीषा दांडगे यांच्या आईला आजही त्यांच्या राहत्या घराच्या परिसरातील तरूण वर्ग वाचून दाखवतात. तेव्हा आईला लेकीचा अभिमान अन् मिळविलेल्या पदाचा झालेला आनंद हा गगनात मावेनासा होतो. परिसरातील तरूण वर्गही झपाट्याने अभ्यास करून डोळ्यासमोर मनीषा दांडगे यांचा आदर्श ठेवून स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षणाचा ध्यास घेत आहे,  शिकत आहे, असे आई असलेल्या लक्ष्मी दांडगे अभिमानाने सांगतात. बुध्दिमत्तेची चुणूक             तसा हा परिसर म्हणजे झोपडपट्टी. औरंगाबादेतील जाधववाडी जवळील आंबेडकर नगर. मनीषा यांचे वडील मातीकाम करणारे (मिस्त्री). 34 वर्षापूर्वी ते जालना

भूसंपादन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा उपयुक्त -नवल किशोर राम

दिनांक 31 जानेवारी 2018 औरंगाबाद,दि. 31   - भूसंपादन कायद्याबाबत सखोल माहिती होऊन योग्य आणि प्रभावीपणे कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी भूसंपादन प्रशिक्षण कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण, उपयुक्त असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा, पारदर्शकतेचा हक्क अधिनियमावर आधारीत जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम बोलत होते. यावेळी उपायुक्त महेंद्र हरपाळकर, अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन समन्वय) मंजुषा मुथा आदींसह सर्व उपविभागीय अधिकारी नायब तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ आदी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेला सुरुवात झाली. कार्यशाळेत नवीन भूसंपादन अधिनियम 2013 कायद्यातील महत्त्वाच्या बाबी, भूसंपादन प्रस्ताव सादर करणे, सामाजिक परिणाम निर्धारण

नयनरम्‍य खिंडसी...

राष्‍ट्रीय कृषी प्रदर्शन नागपुरात पार पडलं. पाच दिवसाच्‍या या प्रदर्शनानंतर पर्यटनाची मजा लुटण्‍यासाठी आम्‍ही खिंडसीला गेलो. नागपूरपासून जवळच असलेलं हे खिंडसी. रामटेकच्‍या राम मंदिरानंतर पाहायला मिळतं. निसर्गरम्‍य अशा ठिकाणी सर्वच जण इथं येतात. अगदी चिमुकल्‍यांपासून ते वृद्धांपर्यंत. तरुणाईसाठी तर सांगायचं कामच नाही. मनाला भावणारं असं हे खिंडसी पर्यटन. या पर्यटनाची मजा लुटली ती आम्‍ही.... म्‍हणजे माझे मित्र चंद्रकांत पाटील , संग्राम इंगळे आणि निलेशने. खूपच सुखावणारा अनुभव होता तो. तरुणाई , शाळकरी मुलं-मुली , शिक्षक , नवदांपत्‍य आणि भरभरून असलेला निसर्ग... डोळे कसे तृप्‍त करून जातो , ही इथं आल्‍यावरच कळतं. जलसफर गोवा आणि मुंबईत केली परंतु इथली जलसफरही तितक्‍याच तोडीची आहे. याठिकाणी येणा-या पर्यटकांची राहण्‍याची सोयही उत्‍तम आहे. जेवणाचीही व्‍यवस्‍था आहे , अगदी मांसाहारापासून शाकाहारापर्यंत , तेही चविष्‍ट. उन्‍हाळयात तर याठिकाणी प्रत्‍येकाने भेट द्यायलाच हवी , असं हे नयनरम्‍य असं ठिकाण आहे.  (व्‍हीडिओ सौजन्‍यः चंद्रकांत पाटील)