Skip to main content

सशक्त लोकशाहीसाठी योग्य उमेदवाराची निवड करा – बलदेव सिंह


☯️राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा

☯️नव मतदारांचा कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद


औरंगाबाद,दिनांक 25  : सर्वसमावेशकनैतिकदृष्ट्या निवडणूक पार पाडण्यासाठी पारदर्शीनिर्भय वातावरणात मतदारांच्या सर्व शंकांचे निरसन करण्याचे प्रयत्न भारत निवडणूक आयोग करत असते. तरी मतदारांनी सशक्त लोकशाहीसाठी योग्य उमेदवारांची निवड करावीअसे आवाहन प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी आज केले.

भारत निवडणूक आयोगाच्यावतीने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज  शिक्षण संस्थेच्या राजर्षी शाहू सभागृहात राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. सिंह होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर व विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरअतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे,  पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसादविशेष पोलिस महानिरीक्षक रवींद्र कुमार सिंगलडिस्ट्रीक्ट युथ आयकॉन नवेली देशमुख यांची उपस्थिती होती.

श्री. सिंह म्हणालेभारत निवडणूक आयोग दिवसेंदिवस नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर निवडणूक प्रक्रियेत करत आहे. इव्हीएमव्हीव्हीपॅटचा  वापर प्रभावीपणे देशात होतो आहे. पूर्वी या तंत्रज्ञानावर आक्षेप घेण्यात येत होता. परंतु नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर कोणीही या यंत्रांवर आक्षेप नोंदवलेला नाही. या मतदान यंत्रावर व निवडणूक प्रक्रियेबाबत देशातील सर्व जिल्हाधिकारी यांनी मोठ्याप्रमाणात जनजागृती केली. मतदारांच्या शंकांचे निरसन केले. नुकत्याच पार पडलेल्या या निवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्याची विभागीय आयुक्तजिल्हा व पोलिस प्रशासनाची कामगिरीही कौतुकास्पद होतीत्यांचे मी अभिनंदनही करतोअसेही श्री. सिंह म्हणाले.

श्री. चपळगावर यांनी लोकशाहीच्या प्रतिज्ञेची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याचे आवाहन तरुणांना केले. या प्रतिज्ञेच्या अंमलबजावणीतून देशात मोठ्याप्रमाणात क्रांती निर्माण होऊ शकतेअसे ते म्हणाले. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या प्रौढ मतदार अधिकाराबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.  मताचा अधिकारमतदार नोंदणीची आवश्यकतापदवीधर मतदार नोंदणीची  प्रक्रिया यावरही त्यांनी भाष्य केले. स्वच्छ व पारदर्शी  विचारातूनच लोकशाही सशक्त होण्यास मदत होतेम्हणून प्रत्येकाने या दृष्टीने मतदानाचा अधिकार वापरात आणण्याचे आवाहन श्री.चपळगावकर यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी चौधरी यांनी केले. जिल्हा निवडणूक कार्यालयाच्यावतीने सातत्याने मतदारांचा समावेशमतदार यादींची दुरूस्तीशुद्धीकरण आदी कार्यक्रम राबविण्यात येतात. मतदारांमध्ये विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येते. मागील वर्षभरात बहुसंख्येने नवमतदारांचा समावेश मतदार यादीमध्ये करण्यात आलेला आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी या सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावायलाच हवाअसेही श्री. चौधरी म्हणाले.

जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने तयार करण्यात आलेली ध्वनीचित्रफितही यावेळी दाखविण्यात आली. तसेच राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्तचा मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांचा संदेशही यावेळी दाखविण्यात आला.

प्रारंभी मान्यवरांनी चित्रकलावक्तृत्वभित्तीचित्र आणि निबंध स्पर्धेतील स्पर्धकांच्या कलागुणांचे निरीक्षणही केले. कार्यक्रमात उपस्थितांना मतदाराची  प्रतिज्ञाही दिली. मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. आभार उपजिल्हा निवडणूक अधिकारी पांडुरंग कुलकर्णी यांनी मानले.

 स्पर्धकांना मान्यवरांच्याहस्ते बक्षीस वितरण

चित्रकलावक्तृत्वभित्तीचित्र आणि निबंध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्याहस्ते धनादेश व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. निबंध स्पर्धेत प्रथम उदय कुलकर्णीद्वितीय विशाल जाधवतृतीय जे.पी. वैद्य आणि उत्तेजनार्थ इरफान शेखमनोजकुमार गुप्ता विजेते ठरले.  वक्तृत्व स्पर्धेत प्रथम पोर्णिमा तोटेवाडद्वितीय स्नेहल व्हलगडेतृतीय  प्रतीक्ष सिरसाठउत्तेजनार्थ गुंजन पाटीलसिद्दीकी सारा सनोबर,  भित्तीचित्र स्पर्धेत प्रथम सागर सोनवणे लुकसद्वितीय ललित बोंडेतृतीय  ललित अत्तर्डेउत्तेजनार्थ मानसी अपूर्वाउत्तेजनार्थ श्रृतिका दाभाडे आणि चित्रकला स्पर्धेत प्रथम पूजा गंगावणे,  द्वितीय सिद्धी जावळे,  तृतीय सृष्टी गाडेउत्तेजनार्थ अर्बिना  शेखअनिकेत वाघ यांनाही मान्यवरांनी सन्मानित केले.

Comments

Popular posts from this blog

मनीषा दांडगेचा ‘खडतर प्रवास, जिद्द आणि यश’

दिनांक:- 16-05-2017 लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी पदाची निवड 2013 मध्ये झाली. 2014 मध्ये पोस्टींग मिळाली. परंतु ‘ झोपडपट्टीतील तरूणी झाली उपजिल्हाधिकारी’   अशा आशयाचा मजकूर तरूणांना अजूनही फेसबुक, न्यूज वेब पोर्टल अन् व्हाटसअ्पव्दारे प्रेरित करत आहे. स्पर्धा परीक्षकांसाठी प्रेरणादायी अशीच चंद्रपूर जिल्ह्यातील मूलच्या उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे यांची यशकथा. व्हाटस्अप  आणि आई             व्हाटसअपवरील संदेश उपजिल्हाधिकारी झालेल्या मनीषा दांडगे यांच्या आईला आजही त्यांच्या राहत्या घराच्या परिसरातील तरूण वर्ग वाचून दाखवतात. तेव्हा आईला लेकीचा अभिमान अन् मिळविलेल्या पदाचा झालेला आनंद हा गगनात मावेनासा होतो. परिसरातील तरूण वर्गही झपाट्याने अभ्यास करून डोळ्यासमोर मनीषा दांडगे यांचा आदर्श ठेवून स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षणाचा ध्यास घेत आहे,  शिकत आहे, असे आई असलेल्या लक्ष्मी दांडगे अभिमानाने सांगतात. बुध्दिमत्तेची चुणूक             तसा हा परिसर म्हणजे झोपडपट्टी. औरंगाबादेतील जाधववाडी जवळील आंबेडकर नगर. मनीषा यांचे वडील मातीकाम करणारे (मिस्त्री). 34 वर्षापूर्वी ते जालना

भूसंपादन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा उपयुक्त -नवल किशोर राम

दिनांक 31 जानेवारी 2018 औरंगाबाद,दि. 31   - भूसंपादन कायद्याबाबत सखोल माहिती होऊन योग्य आणि प्रभावीपणे कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी भूसंपादन प्रशिक्षण कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण, उपयुक्त असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा, पारदर्शकतेचा हक्क अधिनियमावर आधारीत जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम बोलत होते. यावेळी उपायुक्त महेंद्र हरपाळकर, अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन समन्वय) मंजुषा मुथा आदींसह सर्व उपविभागीय अधिकारी नायब तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ आदी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेला सुरुवात झाली. कार्यशाळेत नवीन भूसंपादन अधिनियम 2013 कायद्यातील महत्त्वाच्या बाबी, भूसंपादन प्रस्ताव सादर करणे, सामाजिक परिणाम निर्धारण

नयनरम्‍य खिंडसी...

राष्‍ट्रीय कृषी प्रदर्शन नागपुरात पार पडलं. पाच दिवसाच्‍या या प्रदर्शनानंतर पर्यटनाची मजा लुटण्‍यासाठी आम्‍ही खिंडसीला गेलो. नागपूरपासून जवळच असलेलं हे खिंडसी. रामटेकच्‍या राम मंदिरानंतर पाहायला मिळतं. निसर्गरम्‍य अशा ठिकाणी सर्वच जण इथं येतात. अगदी चिमुकल्‍यांपासून ते वृद्धांपर्यंत. तरुणाईसाठी तर सांगायचं कामच नाही. मनाला भावणारं असं हे खिंडसी पर्यटन. या पर्यटनाची मजा लुटली ती आम्‍ही.... म्‍हणजे माझे मित्र चंद्रकांत पाटील , संग्राम इंगळे आणि निलेशने. खूपच सुखावणारा अनुभव होता तो. तरुणाई , शाळकरी मुलं-मुली , शिक्षक , नवदांपत्‍य आणि भरभरून असलेला निसर्ग... डोळे कसे तृप्‍त करून जातो , ही इथं आल्‍यावरच कळतं. जलसफर गोवा आणि मुंबईत केली परंतु इथली जलसफरही तितक्‍याच तोडीची आहे. याठिकाणी येणा-या पर्यटकांची राहण्‍याची सोयही उत्‍तम आहे. जेवणाचीही व्‍यवस्‍था आहे , अगदी मांसाहारापासून शाकाहारापर्यंत , तेही चविष्‍ट. उन्‍हाळयात तर याठिकाणी प्रत्‍येकाने भेट द्यायलाच हवी , असं हे नयनरम्‍य असं ठिकाण आहे.  (व्‍हीडिओ सौजन्‍यः चंद्रकांत पाटील)