Skip to main content

मराठवाड्याच्या विकासाला सर्वोतोपरी प्राधान्य -नितीन गडकरी


 ‘ॲडव्हांटेज महाराष्ट्र एक्सपो’चा थाटात समारोप 
औरंगाबाद,दिनांक 12  -   मराठवाड्याच्या विकासाला सर्वोतोपरी प्राधान्य राहील. मराठवाड्यातील दुष्काळ, येथील अडचणी दूर करण्यासाठी, रोजगार निर्मितीत वाढ करण्यासाठी शासनाकडून मराठवाड्याच्या विकासाला सर्वोतोपरी प्राधान्य असल्याचे प्रतिपादन  परिवहन, सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
मराठवाडा लघु उद्योग व कृषी संघटनेच्यावतीने (मसिआ) कलाग्राम येथे आयोजित ॲडव्हांटेज महाराष्ट्र एक्सपो 2020 च्या समारोपीय कार्यक्रमात श्री. गडकरी बोलत होते. यावेळी खासदार इम्तियाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, विशेष सचिव तथा विकास आयुक्त राम मोहन मिश्रा, ‘मसिआ’चे  अध्यक्ष ज्ञानदेव राजळे, सुनील किर्दक व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. गडकरी म्हणाले, उद्योग उभा केल्यास संकट येतात. परंतु या संकटाला संधीत रुपांतरीत करावे. उद्योग वाढीसाठी उत्पादनाची गुणवत्ता राखावी. ग्राहकांचा विश्वास संपादन करावा. वेळेचे महत्त्व ओळखावे, या बाबी  व्यवसायात प्राधान्याने विचारात घ्याव्यात, तरच उद्योगाचा विकास होण्यास मदत होईल. शेतक-यांची मुलं उद्योग जगतात पुढे जात असल्याचा आनंद वाटतो. मराठवाड्याच्या विकासासाठी उद्यमशीलतेचा विकास करण्यावर सर्वांनी भर द्यायला हवा. त्यासाठी गुणवत्तेत मात्र तडजोड करू नका. उद्योग, शेतीचा विकास महत्त्वाचा आहे, त्यासाठी शासनाकडून सर्वोतोपरी सहकायर् आहेच. मराठवाड्याचा सर्वांगीण विकासाला पुढे घेऊन जाण्यासाठी आवश्यक ती मदत करणार असल्याचेही ते म्हणाले. औरंगाबाद-अजिंठा रस्त्याचे काम लवकरच पूर्णत्वास येईल. तसेच औरंगाबाद-शिर्डी रस्त्याचे चौपदरीकरण करण्यावर भर आहे, असेही श्री. गडकरी म्हणाले.  आगामी काळात मराठवाडा उद्योग क्षेत्रातील निर्यातीचे शक्तीशाली असे हब होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांचे विचार मांडले. मसिआचे राजळे,किर्दक यांनीही मनोगत व्यक्त केले.
सुरूवातीला श्री.गडकरी यांनी प्रदर्शनातील विविध दालनांना भेटी देऊन उद्योजकांशी संवाद साधला. त्यानंतर दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. श्री.गडकरी यांच्याहस्ते एक्सपोतील दालन, सहभागी आणि उद्योजकांना मान्यवरांच्याहस्ते गौरवण्यात आले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निता पानसरे यांनी केले. 
****

Comments

Popular posts from this blog

मनीषा दांडगेचा ‘खडतर प्रवास, जिद्द आणि यश’

दिनांक:- 16-05-2017 लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी पदाची निवड 2013 मध्ये झाली. 2014 मध्ये पोस्टींग मिळाली. परंतु ‘ झोपडपट्टीतील तरूणी झाली उपजिल्हाधिकारी’   अशा आशयाचा मजकूर तरूणांना अजूनही फेसबुक, न्यूज वेब पोर्टल अन् व्हाटसअ्पव्दारे प्रेरित करत आहे. स्पर्धा परीक्षकांसाठी प्रेरणादायी अशीच चंद्रपूर जिल्ह्यातील मूलच्या उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे यांची यशकथा. व्हाटस्अप  आणि आई             व्हाटसअपवरील संदेश उपजिल्हाधिकारी झालेल्या मनीषा दांडगे यांच्या आईला आजही त्यांच्या राहत्या घराच्या परिसरातील तरूण वर्ग वाचून दाखवतात. तेव्हा आईला लेकीचा अभिमान अन् मिळविलेल्या पदाचा झालेला आनंद हा गगनात मावेनासा होतो. परिसरातील तरूण वर्गही झपाट्याने अभ्यास करून डोळ्यासमोर मनीषा दांडगे यांचा आदर्श ठेवून स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षणाचा ध्यास घेत आहे,  शिकत आहे, असे आई असलेल्या लक्ष्मी दांडगे अभिमानाने सांगतात. बुध्दिमत्तेची चुणूक             तसा हा परिसर म्हणजे झोपडपट्टी. औरंगाबादेतील जाधववाडी जवळील आंबेडकर नगर. मनीषा यांचे वडील मातीकाम करणारे (मिस्त्री). 34 वर्षापूर्वी ते जालना

भूसंपादन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा उपयुक्त -नवल किशोर राम

दिनांक 31 जानेवारी 2018 औरंगाबाद,दि. 31   - भूसंपादन कायद्याबाबत सखोल माहिती होऊन योग्य आणि प्रभावीपणे कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी भूसंपादन प्रशिक्षण कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण, उपयुक्त असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा, पारदर्शकतेचा हक्क अधिनियमावर आधारीत जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम बोलत होते. यावेळी उपायुक्त महेंद्र हरपाळकर, अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन समन्वय) मंजुषा मुथा आदींसह सर्व उपविभागीय अधिकारी नायब तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ आदी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेला सुरुवात झाली. कार्यशाळेत नवीन भूसंपादन अधिनियम 2013 कायद्यातील महत्त्वाच्या बाबी, भूसंपादन प्रस्ताव सादर करणे, सामाजिक परिणाम निर्धारण

नयनरम्‍य खिंडसी...

राष्‍ट्रीय कृषी प्रदर्शन नागपुरात पार पडलं. पाच दिवसाच्‍या या प्रदर्शनानंतर पर्यटनाची मजा लुटण्‍यासाठी आम्‍ही खिंडसीला गेलो. नागपूरपासून जवळच असलेलं हे खिंडसी. रामटेकच्‍या राम मंदिरानंतर पाहायला मिळतं. निसर्गरम्‍य अशा ठिकाणी सर्वच जण इथं येतात. अगदी चिमुकल्‍यांपासून ते वृद्धांपर्यंत. तरुणाईसाठी तर सांगायचं कामच नाही. मनाला भावणारं असं हे खिंडसी पर्यटन. या पर्यटनाची मजा लुटली ती आम्‍ही.... म्‍हणजे माझे मित्र चंद्रकांत पाटील , संग्राम इंगळे आणि निलेशने. खूपच सुखावणारा अनुभव होता तो. तरुणाई , शाळकरी मुलं-मुली , शिक्षक , नवदांपत्‍य आणि भरभरून असलेला निसर्ग... डोळे कसे तृप्‍त करून जातो , ही इथं आल्‍यावरच कळतं. जलसफर गोवा आणि मुंबईत केली परंतु इथली जलसफरही तितक्‍याच तोडीची आहे. याठिकाणी येणा-या पर्यटकांची राहण्‍याची सोयही उत्‍तम आहे. जेवणाचीही व्‍यवस्‍था आहे , अगदी मांसाहारापासून शाकाहारापर्यंत , तेही चविष्‍ट. उन्‍हाळयात तर याठिकाणी प्रत्‍येकाने भेट द्यायलाच हवी , असं हे नयनरम्‍य असं ठिकाण आहे.  (व्‍हीडिओ सौजन्‍यः चंद्रकांत पाटील)