Skip to main content

विभागीय आयुक्तांची अनोखी स्वच्छता मोहीम



वेळ सकाळी 7 वा. स्थळ शहागंज परिसरातील महात्मा गांधी यांचा पुतळा. ध्येय शहराची साफसफाई. महात्मा गांधीच्या पुतळ्याला नमन, पुष्पार्पन, अभिवादन. त्यानंतर हातात झाडू घेऊन स्वत: विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर परिसरातील स्वच्छता, साफसफाई करतात. खरंच राज्यात असं पहिल्यांदाच घडत असेल, की शासनाचे सर्व कार्यालये एकाच दिवशी एकदाच शहरात अनोख्या पद्धतीनं नियोजनबद्ध्‍रित्या यशस्वीपणे स्वच्छता अभियान राबवितात. पर्यटनस्थळे, ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता करतात. लोकंही या मोहिमेत उत्सफूर्तपणे सहभागी होऊन स्वच्छतेची शपथ घेतात.
स्वच्छता हीच खऱ्या अर्थाने राष्ट्रभक्ती आहे. स्वच्छता केवळ शासकीय कार्यालये, महापालिकेची जबाबदारी नाही तर प्रत्येक नागरिकाची ती जबाबदारी आहे. महात्मा गांधीजींनी ज्या भारताचे स्वप्न पाहिले त्यात त्यांनी राजनैतिक स्वातंत्र्यापेक्षा स्वच्छता महत्वाची असल्याचे सांगितले. महात्मा गांधीजींनी इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपणाला, भारतमातेला मुक्त केले. स्वातंत्र्य मिळवून दिले. आता आपल्या देशाच्या विकासासाठी, सर्वांच्या आरोग्यासाठी अस्वच्छतेतून मुक्ती देण्यासाठी प्रत्येकाचा पुढाकार महत्त्वाचा आहे. स्वच्छ भारत, स्वच्छ महाराष्ट्र आणि स्वच्छ औरंगाबाद करण्यासाठी सातत्याने प्रयत्न होणे महत्त्वाचे आहे. स्वच्छतेबाबत आग्रह धरून, जागरूक राहून इतरांनाही यासाठी प्रेरित करणे महत्त्वाचे आहे.
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीन वर्षांपूर्वी स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून लोकचळवळ उभारली. त्याचाच प्रत्यय आजच्या स्वच्छता मोहिमेतून आला. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाप्रमाणेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने देखील महाराष्ट्र स्वच्छता अभियानात देशात आघाडी घेतली आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र स्वच्छता अभिायानाला प्रथम प्राधान्य देऊन राज्य सरकार सर्व सामान्यांच्या हित आणि विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाने आठवड्यातून दोन तास असे एकूण वर्षातील एकूण शंभर तास श्रमदान करण्याचा आणि आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प तडीस नेण्यास कटीबद्ध असल्याचे दाखवून दिले पाहिजे. आज झालेल्या स्वच्छता अभियानातून प्रत्येकालाच श्रमदानाचे महत्त्व कळले. शिवाय स्वच्छतेबाबत जागृतीची जबाबदारीही आपल्यावर असल्याचे समजल्यास मदत झाली.
विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी स्वत: महात्मा गांधी पुतळा ते सिटी चौक आणि सिटी चौक ते गुलमंडी परिसराची पाहणी करून स्वच्छता, साफसफाई केली. सोबत इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील स्वच्छता करत होते. महाविद्यालयीन, शाळा, स्काऊट गाईडचे विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, नागरिक, लोकप्रतिनिधीही या अभियानात हिरीरीने सहभाग नोंदवून परिसर स्वच्छ करत होते. अशाचप्रकारे शहरातील प्रमुख अशा 42 ठिकाणी शासनाच्या कार्यालयातील अधिकारी –कर्मचारी यांनी अनोख्या पद्धतीचे एकाच दिवशी स्वच्छता अभियान राबवून जनतेत जागृती केली. या अभियानात जवळपास एक लाख नागरिक, युवक – युवती जोडल्या गेले. परंतु आपण एवढयावरच समाधान न मानता यापुढे ही शहर, शहराबाहेरील, जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणी, पर्यटनस्थळांच्या परिसरात स्वच्छता अभियान राबवावे. पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराला नवी ओळख निर्माण करून द्यावी. या स्वच्छतेच्या अभियानातून पर्यटन व्यवसायालाही चालना मिळण्यास मदत होईल. स्वच्छतेची ही ओळख निर्माण करून विकासाचा ध्यास घेऊ, असेही उपस्थितांना स्वत:च्या कृतीतून डॉ. भापकर यांनी संदेश दिला.
मी घाण करणार नाही आणि दुसऱ्याला करू देणार नाही. सर्वप्रथम स्वत:पासून, माझ्या कुटुंबापासून, माझ्या गल्ली , वस्तीपासून, माझ्या गावापासून, कार्यस्थळांपासून स्वच्छतेच्या कामाला सुरूवात करेल. जगातील इतर देशाप्रमाणे मीही अस्वच्छता करणार नाही. गावोगावी याबाबत इतरांनाही प्रेरित करेल. इतर 100 व्यक्तींनाही स्वच्छतेची शपथ घ्यायला लावेल. माझे स्वच्छतेचे एक पाऊल संपूर्ण देशाला स्वच्छ करेल, याचा मला विश्वास असल्याची शपथही डॉ. भापकर यांनी उपस्थितांना दिली.
अत्यंत साधे, सरळ, आणि स्वच्छतेला प्राधान्य देऊन स्वत:च्या आचरणातून इतरांना संदेश देणारे डॉ. भापकर इतरांनाही अशा कार्यातून सातत्याने प्रेरणा देत असतात. आज तर चक्क त्यांनी पुन्हा स्वत: हातात झाडू घेऊन शहराचा भाग स्वच्छ केला. खरोखरच त्यांचे कार्य भविष्यात देशाला, राज्याला आणि पर्यटननगरी औरंगाबादला विकासाच्या मार्गावर घेऊन जाईलच, यात शंका नाही.

-श्याम टरके,
औरंगाबाद

Comments

Popular posts from this blog

मनीषा दांडगेचा ‘खडतर प्रवास, जिद्द आणि यश’

दिनांक:- 16-05-2017 लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी पदाची निवड 2013 मध्ये झाली. 2014 मध्ये पोस्टींग मिळाली. परंतु ‘ झोपडपट्टीतील तरूणी झाली उपजिल्हाधिकारी’   अशा आशयाचा मजकूर तरूणांना अजूनही फेसबुक, न्यूज वेब पोर्टल अन् व्हाटसअ्पव्दारे प्रेरित करत आहे. स्पर्धा परीक्षकांसाठी प्रेरणादायी अशीच चंद्रपूर जिल्ह्यातील मूलच्या उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे यांची यशकथा. व्हाटस्अप  आणि आई             व्हाटसअपवरील संदेश उपजिल्हाधिकारी झालेल्या मनीषा दांडगे यांच्या आईला आजही त्यांच्या राहत्या घराच्या परिसरातील तरूण वर्ग वाचून दाखवतात. तेव्हा आईला लेकीचा अभिमान अन् मिळविलेल्या पदाचा झालेला आनंद हा गगनात मावेनासा होतो. परिसरातील तरूण वर्गही झपाट्याने अभ्यास करून डोळ्यासमोर मनीषा दांडगे यांचा आदर्श ठेवून स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षणाचा ध्यास घेत आहे,  शिकत आहे, असे आई असलेल्या लक्ष्मी दांडगे अभिमानाने सांगतात. बुध्दिमत्तेची चुणूक             तसा हा परिसर म्हणजे झोपडपट्टी. औरंगाबादेतील जाधववाडी जवळील आंबेडकर नगर. मनीषा यांचे वडील मातीकाम करणारे (मिस्त्री). 34 वर्षापूर्वी ते जालना

भूसंपादन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा उपयुक्त -नवल किशोर राम

दिनांक 31 जानेवारी 2018 औरंगाबाद,दि. 31   - भूसंपादन कायद्याबाबत सखोल माहिती होऊन योग्य आणि प्रभावीपणे कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी भूसंपादन प्रशिक्षण कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण, उपयुक्त असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा, पारदर्शकतेचा हक्क अधिनियमावर आधारीत जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम बोलत होते. यावेळी उपायुक्त महेंद्र हरपाळकर, अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन समन्वय) मंजुषा मुथा आदींसह सर्व उपविभागीय अधिकारी नायब तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ आदी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेला सुरुवात झाली. कार्यशाळेत नवीन भूसंपादन अधिनियम 2013 कायद्यातील महत्त्वाच्या बाबी, भूसंपादन प्रस्ताव सादर करणे, सामाजिक परिणाम निर्धारण

नयनरम्‍य खिंडसी...

राष्‍ट्रीय कृषी प्रदर्शन नागपुरात पार पडलं. पाच दिवसाच्‍या या प्रदर्शनानंतर पर्यटनाची मजा लुटण्‍यासाठी आम्‍ही खिंडसीला गेलो. नागपूरपासून जवळच असलेलं हे खिंडसी. रामटेकच्‍या राम मंदिरानंतर पाहायला मिळतं. निसर्गरम्‍य अशा ठिकाणी सर्वच जण इथं येतात. अगदी चिमुकल्‍यांपासून ते वृद्धांपर्यंत. तरुणाईसाठी तर सांगायचं कामच नाही. मनाला भावणारं असं हे खिंडसी पर्यटन. या पर्यटनाची मजा लुटली ती आम्‍ही.... म्‍हणजे माझे मित्र चंद्रकांत पाटील , संग्राम इंगळे आणि निलेशने. खूपच सुखावणारा अनुभव होता तो. तरुणाई , शाळकरी मुलं-मुली , शिक्षक , नवदांपत्‍य आणि भरभरून असलेला निसर्ग... डोळे कसे तृप्‍त करून जातो , ही इथं आल्‍यावरच कळतं. जलसफर गोवा आणि मुंबईत केली परंतु इथली जलसफरही तितक्‍याच तोडीची आहे. याठिकाणी येणा-या पर्यटकांची राहण्‍याची सोयही उत्‍तम आहे. जेवणाचीही व्‍यवस्‍था आहे , अगदी मांसाहारापासून शाकाहारापर्यंत , तेही चविष्‍ट. उन्‍हाळयात तर याठिकाणी प्रत्‍येकाने भेट द्यायलाच हवी , असं हे नयनरम्‍य असं ठिकाण आहे.  (व्‍हीडिओ सौजन्‍यः चंद्रकांत पाटील)