Skip to main content

स्वच्छता हीच राष्ट्रभक्ती


स्वच्छता समृध्दीसाठी महत्त्वाची. तशीच आरोग्यदायी जीवनासाठीही. त्यातूनच विकास साधला जातो. मग तो परिसराचा असो वा राज्य, देशाचा. औरंगाबाद शहरात 42 महत्त्वाचे पर्यटनस्थळे, ऐतिहासिक स्थळांची शुक्रवार, दि. 6 रोजी सकाळी  6 ते 9 या वेळेत एकाच दिवशी सर्व शासकीय कार्यालये, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी यांच्यामार्फत स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यानिमित्त स्वच्छतेची महती सांगणारा हा विशेष लेख.
            अनादि कालापासून स्वच्छतेला अनन्य साधारण महत्त्व आहे. ऋषी-मुनीही स्वच्छतेला अग्रक्रम  देत असत. स्वच्छता आरोग्यदायी जीवनाची गुरूकिल्लीच आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींनीही स्वच्छतेचा संदेश जनतेला दिला. महात्मा गांधी स्वत: स्वच्छतेला प्राधान्य देऊन नित्यनेमाने साफसफाई करत. त्यांच्या प्रेरणेतून इतरही गांधीजींचे अनुकरण करत. स्वच्छतेला प्राधान्य देऊन आपला परिसर, ग्राम स्वत: स्वच्छ करत. संत गाडगेबाबाही स्वत: झाडू घेऊन आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता करत. स्वच्छतेबाबत जनजागृती  घडवत.

            तीन वर्षापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात महात्मा गांधी जयंती दिनापासून स्वच्छ भारत अभियानाची सुरूवात करणार असल्याचे सांगितले. त्यानुसार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी स्वत: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता केल्याचेही आपण पाहिलेच आहे. त्या दिवसापासून देशात स्वच्छ भारत अभियानामध्ये उत्स्फूर्तपणे जनता सहभागी होते आहे. आता या अभियानाने लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त केले आहे. इतर राज्य सरकारही अभियानात हिरीरीने सहभागी होताहेत. महाराष्ट्र राज्य यात आघाडीवर आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या नेतृत्त्वाखाली आणि पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान जोमात सुरू आहे. त्यातून शहरांचा, गावांचा कायापालट होतो आहे.

            शहरीभागाबरोबरच मराठवाड्यातील ग्रामीण भागानेही स्वच्छतेची कास धरली आहे. संपूर्ण मराठवाडा हगणदारी मुक्तीच्या वाटचाल करतो आहे. स्वच्छता हीच सेवा हा उपक्रम मराठवाड्यात प्रभावीपणे राबविण्यात आला आहे. ग्रामीण भागामध्ये स्वच्छ भारत अभियानांतर्गत मराठवाडा हागणदारी मुक्तीच्या दिशेने वाटचाल करतो आहे. मराठवाडा विभागामध्ये वैयक्तिक शौचालयाचे काम 24 टक्के झाले होते. मात्र सप्टेंबरपर्यंत 72 टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजेच 17 लाख वैयक्तिक शौचालये पूर्ण झाली आहेत. अशा दृष्टीने वाटचाल सुरू असल्याने मराठवाडा हागणदारी मुक्त होऊन स्वच्छ महाराष्ट्र, स्वच्छ मराठवाडा होणारच यात मात्र शंका नाही. राज्यातील पालघर आणि जालना ही दोन जिल्हे हागणदारी मुक्त झाल्याचेही श्री. लोणीकर यांनी नुकतेच घोषित केले आहे.

स्वच्छता विकासाचा केंद्रबिंदू आहे. स्वच्छ पर्यावरण, चांगले आरोग्य मिळावे यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. शहरातील उघड्यावर शौचालयास जात असलेल्या कुटुंबांना शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी, शहरातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येते आहे. उघड्यावरील शौचविधी बंद करणे, हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांना या कामातून मुक्त करणे, नागरी घनकचरा व्यवस्थापनासाठी आधुनिक, शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब करणे,  स्वच्छतेच्या चांगल्या पध्दतीच्या अनुषंगाने सवयींमध्ये बदल करणे, स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्याची सार्वजनिक आरोग्याशी सांगड घालणे आदी अभियानाचे उद्देश आहेत. त्यादृष्टीने शासनामार्फत कार्यवाही पार पाडल्या जाते आहे.

शहरे स्वच्छ व्हावीत. लोकांना स्वच्छतेची सवय लागावी, त्यातच औरंगाबाद पर्यटनाची राजधानी. दि. 5 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर या कालावधीत पर्यटन विभागाकडून  ‘पर्यटन पर्व’ हा कार्यक्रमही राबविण्यास सुरूवात झाली आहे. म्हणून पर्यटनस्थळे, महत्त्वाची ठिकाणे यांची स्वच्छता व्हावी. यातून  पर्यटनाला चालना मिळावी, या उद्देशाने विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांच्या नेतृत्त्वात औरंगाबादेतील सर्व प्रमुख शासकीय कार्यालये दि. 6 ऑक्‍टोबर रोजी  शहरातील  42 ठिकाणी स्वच्छता अभियान राबवित आहेत.  यामध्ये स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थी, शालेय विद्यार्थी यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहनही डॉ. भापकर यांनी केले आहे.

स्वच्छता अभियान केवळ अभियान नसून लोकचळवळ आहे. स्वच्छता करणे म्हणजे दुय्यम दर्जाचे काम नाही. तर महत्त्वाचे कार्य आहे. त्यातून समाजोन्नती, राष्ट्रोन्नतीचे कार्य होण्यास मदत होते. स्वच्छता करणे केवळ एखाद्या विभागाचे कार्य नाही. स्वच्छता ठेवणे, राखणे ही तर प्रत्येकाची जबाबदारी आहे. म्हणून प्रत्येकाने या राष्ट्रीय कार्यात मोलाचा सहभाग घ्यायलाच हवा. सहभागी होऊन औरंगाबादच्या पर्यटन नगरीला चकाचक करण्याचा ध्यास घ्यायला हवा. त्यामुळे पर्यटनस्थळांचे संवर्धन, रोजगारनिर्मिती होऊन पर्यटन व्यवसायालाही चालना मिळण्यास मदतच होईल. स्वच्छता हीच खऱ्या अर्थाने सेवा, राष्ट्रभक्ती असल्याने प्रत्येकाने यात सामील व्हायलाच हवे. तसेच इतरांनाही याबाबत सांगून सहभागी करायला हवेच.

-     श्याम टरके, औरंगाबाद

Comments

Popular posts from this blog

मनीषा दांडगेचा ‘खडतर प्रवास, जिद्द आणि यश’

दिनांक:- 16-05-2017 लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी पदाची निवड 2013 मध्ये झाली. 2014 मध्ये पोस्टींग मिळाली. परंतु ‘ झोपडपट्टीतील तरूणी झाली उपजिल्हाधिकारी’   अशा आशयाचा मजकूर तरूणांना अजूनही फेसबुक, न्यूज वेब पोर्टल अन् व्हाटसअ्पव्दारे प्रेरित करत आहे. स्पर्धा परीक्षकांसाठी प्रेरणादायी अशीच चंद्रपूर जिल्ह्यातील मूलच्या उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे यांची यशकथा. व्हाटस्अप  आणि आई             व्हाटसअपवरील संदेश उपजिल्हाधिकारी झालेल्या मनीषा दांडगे यांच्या आईला आजही त्यांच्या राहत्या घराच्या परिसरातील तरूण वर्ग वाचून दाखवतात. तेव्हा आईला लेकीचा अभिमान अन् मिळविलेल्या पदाचा झालेला आनंद हा गगनात मावेनासा होतो. परिसरातील तरूण वर्गही झपाट्याने अभ्यास करून डोळ्यासमोर मनीषा दांडगे यांचा आदर्श ठेवून स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षणाचा ध्यास घेत आहे,  शिकत आहे, असे आई असलेल्या लक्ष्मी दांडगे अभिमानाने सांगतात. बुध्दिमत्तेची चुणूक             तसा हा परिसर म्हणजे झोपडपट्टी. औरंगाबादेतील जाधववाडी जवळील आंबेडकर नगर. मनीषा यांचे वडील मातीकाम करणारे (मिस्त्री). 34 वर्षापूर्वी ते जालना

भूसंपादन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा उपयुक्त -नवल किशोर राम

दिनांक 31 जानेवारी 2018 औरंगाबाद,दि. 31   - भूसंपादन कायद्याबाबत सखोल माहिती होऊन योग्य आणि प्रभावीपणे कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी भूसंपादन प्रशिक्षण कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण, उपयुक्त असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा, पारदर्शकतेचा हक्क अधिनियमावर आधारीत जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम बोलत होते. यावेळी उपायुक्त महेंद्र हरपाळकर, अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन समन्वय) मंजुषा मुथा आदींसह सर्व उपविभागीय अधिकारी नायब तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ आदी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेला सुरुवात झाली. कार्यशाळेत नवीन भूसंपादन अधिनियम 2013 कायद्यातील महत्त्वाच्या बाबी, भूसंपादन प्रस्ताव सादर करणे, सामाजिक परिणाम निर्धारण

नयनरम्‍य खिंडसी...

राष्‍ट्रीय कृषी प्रदर्शन नागपुरात पार पडलं. पाच दिवसाच्‍या या प्रदर्शनानंतर पर्यटनाची मजा लुटण्‍यासाठी आम्‍ही खिंडसीला गेलो. नागपूरपासून जवळच असलेलं हे खिंडसी. रामटेकच्‍या राम मंदिरानंतर पाहायला मिळतं. निसर्गरम्‍य अशा ठिकाणी सर्वच जण इथं येतात. अगदी चिमुकल्‍यांपासून ते वृद्धांपर्यंत. तरुणाईसाठी तर सांगायचं कामच नाही. मनाला भावणारं असं हे खिंडसी पर्यटन. या पर्यटनाची मजा लुटली ती आम्‍ही.... म्‍हणजे माझे मित्र चंद्रकांत पाटील , संग्राम इंगळे आणि निलेशने. खूपच सुखावणारा अनुभव होता तो. तरुणाई , शाळकरी मुलं-मुली , शिक्षक , नवदांपत्‍य आणि भरभरून असलेला निसर्ग... डोळे कसे तृप्‍त करून जातो , ही इथं आल्‍यावरच कळतं. जलसफर गोवा आणि मुंबईत केली परंतु इथली जलसफरही तितक्‍याच तोडीची आहे. याठिकाणी येणा-या पर्यटकांची राहण्‍याची सोयही उत्‍तम आहे. जेवणाचीही व्‍यवस्‍था आहे , अगदी मांसाहारापासून शाकाहारापर्यंत , तेही चविष्‍ट. उन्‍हाळयात तर याठिकाणी प्रत्‍येकाने भेट द्यायलाच हवी , असं हे नयनरम्‍य असं ठिकाण आहे.  (व्‍हीडिओ सौजन्‍यः चंद्रकांत पाटील)