Skip to main content

पर्यटनाची राजधानी औरंगाबाद

प्राचीन काळापासून वैविधतेने नटलेले औरंगाबाद. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी. या राजधानीत जागतिक पर्यटन दिनाचे औचित्यसाधून विविध कार्यक्रमांचे आयोजन दिनांक 27 रोजी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने केले आहे. संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटनेचे यंदाचे ‘विकासाचे साधन शाश्वत पर्यटन’ असे घोषवाक्य आहे. या दिनानिमित्त औरंगाबाद पर्यटन राजधानीचा घेतलेला हा विकासात्मक आढावा.
औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात विविध पर्यटनस्थळे आहेत. त्यामुळे औरंगाबादचे नाव जागतिक पातळीवर पोहोचले आहे. अजिंठा, वेरुळ लेणी, बीबी का मकबरा, पानचक्की, देवगिरी किल्ला यामुळे औरंगाबादकडे देशी-विदेशी पर्यटक आकर्षिले जातात. याशिवायही  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार आणि पालकमंत्री रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाने पर्यटन विकासावर भर देण्यात येतो आहे.
आशिया खंडातील झपाट्याने वाढणारे 52 दरवाजांचे शहर म्हणूनही औरंगाबादची ओळख आहे. ऐतिहासिक, सांस्कृतिक वास्तूकलेचा, शिल्पकलेचा वारसा, विविध प्रकारच्या वन, वन्यजीवांचा सहवास लाभलेला, शैक्षणिक चळवळीने गाजलेला जिल्हा म्हणजे औरंगाबाद.
युनेस्कोच्या जागतिक हेरिटेज वास्तूमध्ये समाविष्ट असलेली अजिंठा लेणी, यादव आणि मुघल काळातील ऐतिहासिक दौलताबाद किल्ला, मिनी ताजमहल म्हणून ओळखला जाणारा बिबी का मकबरा म्हणजे औरंगाबादसाठी भूषणच. औरंगाबादची विकासाची मुहुर्तमेढ रोवणारा मलिक अंबरचा सोनेरी महल, पाण्याच्या नियोजनासाठी बांधलेल्या नहरींचा उत्तम नमुना असलेली पानचक्की, शहराच्या डोंगरमाथ्यावरील बौद्ध लेण्या, निसर्गरम्य परिसरात वसलेले आणि शैक्षणिक चळवळीचे महत्त्वाचे स्थान म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अशी एक ना अनेक पर्यटनस्थळे, ऐतिहासिक स्थळे. एकाहून एक सरस पर्यटकांना आकर्षित करणारी आहेत.
औरंगाबादबरोबरच मराठवाड्यातील पर्यटनाला चालना देण्याचे कार्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार करते आहे. मराठवाडा टुरिस्ट हब व्हावा यासाठी विविध पातळ्यांवर कार्यवाही करण्यात येते आहे. जागतिक वारसा शहर म्हणून घोषित करण्यासाठी प्रयत्न होताहेत. सिद्धार्थ उद्यानातील प्राणी पर्यटकांना मोहीत करुन टाकतात, या प्राणी संग्राहलयाच्या विस्तारीकरणालाही प्राधान्य देण्यात आले आहे. पर्यटकही या प्राणीसंग्रहालयाचा पुरेपुर आनंद घेतात.
             महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत भारतातील जागतिक दर्जाची ऐतिहासिक आणि नैसर्गिक पर्यटन स्थळांसाठी औरंगाबाद हेरिटेज अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम, जनजागृती मोहीम राबवून संवर्धनासाठी पुढाकारही घेतला जातो. यामध्ये सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी बहुसंख्येने सहभागी होतात. पर्यटनाला चालना देण्यासाठी त्याचबरोबर संवर्धनासाठीही मोलाची अशीच बाब आहे.
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेरुळ, अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचेही याठिकाणी आयोजन करुन पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे याठिकाणी फिटते, असेच म्हणावे लागेल. या पर्यटनस्थळांबरोबरच इतर पर्यटनस्थळांचा विकास व्हावा यासाठी शासनाकडून प्रयत्न करण्यात येतात. याचाच भाग म्हणून 434.44 कोटींचा म्हैसमाळ, वेरुळ, खुलताबाद आणि सुलीभंजन पर्यटन विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. या विकास आराखड्यातून विविध पायाभूत सुविधा निर्माण होऊन उत्तम दर्जाची पर्यटनस्थळे विकसित होण्यास मदतच होणार आहे.
महामंडळाबरोबरच महापालिकेतर्फेही शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालण्याचा अटोकाट प्रयत्न असतो. खुलताबादमध्ये ऐतिहासिक असलेल्या नगारखाना दरवाजाचे महामंडळामार्फत सुशोभीकरण झाल्याने खुलताबादमध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तीलाही समाधान वाटते. या नगारखाना दरवाजामुुळे खुलताबादच्या सौंदर्यीकरणात मोलाची अशी भर पडली आहे.
पर्यटन वाढीसाठी महत्त्वाचा केंद्रबिंदू असतो तो पर्यटक. म्हणूनच ‘अतिथी देवो भव’ या भारतीय संस्कृतीला अनुसरुन पर्यटकांना योग्य माहिती मिळावी, त्यांची गैरसोय होऊ नये, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेऊन ठिकठिकाणी जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणी म्हणजेच औरंगाबाद-वेरुळ, औरंगाबाद-अजिंठा रस्त्यांवर माहिती फलक लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर सिल्लोड येथील महामंडळाच्या मार्गस्थ सेवा केंद्राचे नूतनीकरण करुन पर्यटकांसाठी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने औरंगाबाद येथील प्रादेशिक कार्यालयाच्या संकेतस्थळावर पर्यटकांसाठी सुविधा, सवलतींची माहिती दिलेली आहे.
52 दरवाजांचे शहर, खडकी, फतेहपूर अशी औरंगाबादची जुनी नावे. परंतु आता औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात पर्यटनाचा झपाट्याने विकास आणि संवर्धन होतो आहे. तसेच ती आपलीही जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येकाने पर्यटनस्थळांच्या संवर्धनासह त्यांची स्वच्छता राखण्याला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे आपण मनोमन ठरवणे; आजच्या जागतिक पर्यटनदिनी औचित्याचे ठरेल, तेही तितकेच महत्त्वाचे.
-श्याम टरके, औरंगाबाद 
                      

Comments

Popular posts from this blog

मनीषा दांडगेचा ‘खडतर प्रवास, जिद्द आणि यश’

दिनांक:- 16-05-2017 लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी पदाची निवड 2013 मध्ये झाली. 2014 मध्ये पोस्टींग मिळाली. परंतु ‘ झोपडपट्टीतील तरूणी झाली उपजिल्हाधिकारी’   अशा आशयाचा मजकूर तरूणांना अजूनही फेसबुक, न्यूज वेब पोर्टल अन् व्हाटसअ्पव्दारे प्रेरित करत आहे. स्पर्धा परीक्षकांसाठी प्रेरणादायी अशीच चंद्रपूर जिल्ह्यातील मूलच्या उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे यांची यशकथा. व्हाटस्अप  आणि आई             व्हाटसअपवरील संदेश उपजिल्हाधिकारी झालेल्या मनीषा दांडगे यांच्या आईला आजही त्यांच्या राहत्या घराच्या परिसरातील तरूण वर्ग वाचून दाखवतात. तेव्हा आईला लेकीचा अभिमान अन् मिळविलेल्या पदाचा झालेला आनंद हा गगनात मावेनासा होतो. परिसरातील तरूण वर्गही झपाट्याने अभ्यास करून डोळ्यासमोर मनीषा दांडगे यांचा आदर्श ठेवून स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षणाचा ध्यास घेत आहे,  शिकत आहे, असे आई असलेल्या लक्ष्मी दांडगे अभिमानाने सांगतात. बुध्दिमत्तेची चुणूक             तसा हा परिसर म्हणजे झोपडपट्टी. औरंगाबादेतील जाधववाडी जवळील आंबेडकर नगर. मनीषा यांचे वडील मातीकाम करणारे (मिस्त्री). 34 वर्षापूर्वी ते जालना

भूसंपादन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा उपयुक्त -नवल किशोर राम

दिनांक 31 जानेवारी 2018 औरंगाबाद,दि. 31   - भूसंपादन कायद्याबाबत सखोल माहिती होऊन योग्य आणि प्रभावीपणे कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी भूसंपादन प्रशिक्षण कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण, उपयुक्त असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा, पारदर्शकतेचा हक्क अधिनियमावर आधारीत जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम बोलत होते. यावेळी उपायुक्त महेंद्र हरपाळकर, अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन समन्वय) मंजुषा मुथा आदींसह सर्व उपविभागीय अधिकारी नायब तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ आदी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेला सुरुवात झाली. कार्यशाळेत नवीन भूसंपादन अधिनियम 2013 कायद्यातील महत्त्वाच्या बाबी, भूसंपादन प्रस्ताव सादर करणे, सामाजिक परिणाम निर्धारण

नयनरम्‍य खिंडसी...

राष्‍ट्रीय कृषी प्रदर्शन नागपुरात पार पडलं. पाच दिवसाच्‍या या प्रदर्शनानंतर पर्यटनाची मजा लुटण्‍यासाठी आम्‍ही खिंडसीला गेलो. नागपूरपासून जवळच असलेलं हे खिंडसी. रामटेकच्‍या राम मंदिरानंतर पाहायला मिळतं. निसर्गरम्‍य अशा ठिकाणी सर्वच जण इथं येतात. अगदी चिमुकल्‍यांपासून ते वृद्धांपर्यंत. तरुणाईसाठी तर सांगायचं कामच नाही. मनाला भावणारं असं हे खिंडसी पर्यटन. या पर्यटनाची मजा लुटली ती आम्‍ही.... म्‍हणजे माझे मित्र चंद्रकांत पाटील , संग्राम इंगळे आणि निलेशने. खूपच सुखावणारा अनुभव होता तो. तरुणाई , शाळकरी मुलं-मुली , शिक्षक , नवदांपत्‍य आणि भरभरून असलेला निसर्ग... डोळे कसे तृप्‍त करून जातो , ही इथं आल्‍यावरच कळतं. जलसफर गोवा आणि मुंबईत केली परंतु इथली जलसफरही तितक्‍याच तोडीची आहे. याठिकाणी येणा-या पर्यटकांची राहण्‍याची सोयही उत्‍तम आहे. जेवणाचीही व्‍यवस्‍था आहे , अगदी मांसाहारापासून शाकाहारापर्यंत , तेही चविष्‍ट. उन्‍हाळयात तर याठिकाणी प्रत्‍येकाने भेट द्यायलाच हवी , असं हे नयनरम्‍य असं ठिकाण आहे.  (व्‍हीडिओ सौजन्‍यः चंद्रकांत पाटील)