Skip to main content

'स्‍वाईन फ्लू'ला घाबरु नका; काळजी घ्‍या !


            स्‍वाईन फ्लूने विदर्भासह राज्‍यात आढळून येतो आहे. 2009 पासून हा आजार सर्वत्र चर्चेला आला. आता तर नागपूर, अमरावती, वर्धा जिल्‍हयातही या आजाराने डोके वर काढावयास सुरुवात केलीय. परंतु या आजाराबाबत योग्‍य काळजी घेतल्‍यास या स्वाइन फ्लू पासून आपण इतर दूर राहू श‍कतो, हेही तितकेच खरे आहे. मग या आजाराबाबतही आपणास माहिती पण हवीच ना,  हा आजार एच 1 एन 1 या विषाणू मुळे होतो. ताप, खोकला, घशाला खवखव, अंगदुखी, डोकेदुखी, जुलाब, उलटया आदी लक्षणे या आजारात आढळतात. मात्र, याबाबत आपण घाबरून न जाता योग्य काळजी घेतली तरच निश्चितच या आजारावर आपण नियंत्रण ठेवता येते.
आजार अतिजोखमीचा
पाच वर्षांखालील विशेषत: एक वर्षखालील बालके, 65 वर्षांवरील जेष्‍ठ नागरिक, गरोदर माता, उच्‍च रक्‍तदाब किंवा इतर -हद्यरोगी, मधुमेहांचे रुग्‍ण, फुप्‍फुस, यकृत, मूत्रपिंडाचे आजार असणा-या व्‍यक्‍ती, चेतासंस्‍थेचे विकार असणा-या व्‍यक्‍ती, प्रतीकार शक्‍ती कमी झालेल्‍या व्‍यक्‍ती, दीर्घकाळ स्टीरॉईड औषधी घेणा-या यक्‍तींकरीता हा आजार अतिजोखमीचा ठरुन गंभीर स्‍वरुप धारण करु शकतो.
डॉक्टरांचा सल्ला- गर्दी टाळा
 हा आजार श्‍वसन संस्‍थेच्‍या आजार आहे. रुग्‍णाच्‍या सान्निध्‍यात आल्‍याने हा आजार होत असल्‍याने, तो टाळण्‍यासाठी नागरिकांनी वारंवार साबण व स्‍वच्‍छ  पाण्‍याने हात धुवावेत. पौष्टिक आहार घ्‍यावा. लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्‍या पालेभाज्‍या यांसारख्‍या आरोग्‍यदायी पदार्थांचा आहारात वापर करावा. धुम्रपान टाळावे. पुरेशी झोप,विश्रांती घ्‍यावी. भरपूर पाणी प्‍यावे. खोकलतांना, शिंकताना तोंडासमोर हातरुमालाचा वापर करावा. हस्‍तांदोलन करणे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. डॉक्‍टरांच्‍या सल्‍ल्‍याशिवाय औषधी घेऊ नये. फ्लू सदृश्‍य लक्षणे दिसत असतील तर गर्दीच्‍या ठिकाणी  जाणे टाळणेही आवश्‍यक आहे.
शाळा व शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घ्यावा
                ज्‍या उपक्रमात, कार्यक्रमात विद्यार्थी मोठयाप्रमाणात एकत्र येतील, असे उपक्रम शक्‍यतो टाळावेत. जेणेकरुन संसर्गाचा प्रसार रोखता येईल. वर्ग सुरु करण्‍यापूर्वी विद्यार्थ्यांत फ्लूच्‍या लक्षणांनी कोणी ग्रस्‍त नाही याची पाहणी करावी. फ्लूची लक्षणे आढळलेल्‍या विद्यार्थ्यांना सात  दिवस विश्रांती व जनसंपर्क टाळण्‍याचा सल्‍ला द्यावा. लक्षणांची तीव्रता वाढल्‍यास वा प्रकृतीत बिघाड आढळून येत आल्‍यास त्‍वरीत नजिकच्‍या शासकीय आरोग्‍य संस्‍थेला कळवावे.

वैद्यकीय अधिका-यांचा सल्ला पाळा
                ज्‍या विद्यार्थी, शिक्षक आणि इतर कर्मचा-यांना वैद्यकीय अधिकारी यांनी सात दिवस घरी राहण्‍याचा सल्‍ला दिला आहे त्‍यांनी वैद्यकीय देखरेखखाली उपचार घ्‍यावेत, जनसंपर्क टाळावा. खोकताना वा शिंकताना तोंडावर हातरुमाल व टिश्‍यू पेपरचा वापर करावा. वापरलेले टिश्‍यू पेपर स्‍वतंत्र प्‍लास्टिक बॅगमध्‍ये टाकावेत. तसेच त्‍याची योग्‍य विल्‍हेवाट लावावी.
यंत्रणा सज्ज, आरोग्य विभागाचे आवाहन
                  नागरिकांनी स्‍वाईन फ्लू या आजाराची भीती बाळगू नये, योग्‍य काळजी घेतल्‍यास हा आजार सहज टाळता येऊ शकतो. फ्लूची लक्षणे आढळल्‍यास नजिकच्‍या आरोग्‍य केंद्रात उपचार घ्‍यावा. आपल्‍या जवळच्‍या आरोग्‍य कर्मचा-यांनाही त्‍याची माहिती द्यावे. या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील आरोग्‍य यंत्रणाही सज्‍ज आहे, याचाही नागरिकांनी लाभ घ्यायलाच हवा, असे आवाहनही जिल्हा आरोग्य विभागामार्फत करण्यात आलेले आहे.
काय करावे आणि काय करु नये
Ø  रुग्ण्याच्या संपर्कानंतर हात साबणांने स्वच्छ धुवावेत.
Ø  घरातील हवा मोकळी राहील याची दक्षता घ्यावी. त्या साठी खिडक्या उघडया ठेवाव्यात.
Ø  आरोग्यदायी सवयीचं कटाक्षानं पालन करावे.
Ø  आपले नाक व तोंड रुमालानी झाकावे. शिंक आल्यास तोंड व नाक झाकून घ्यावे. वापर झाल्यावर टिशू फेकून द्यावा.
Ø  गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा.
Ø  ज्यांना श्वसनाचे आजार आहे त्यांचीशी संपर्क टाळावा.
Ø  भरपूर झोप घ्या आणि द्रव्य पदार्थाचे जास्तीत-जास्त सेवन करा आणि पौष्टिक आहार घ्या.
Ø  आपण आजारी असाल तर घरीच रहावे. जर शक्य असेल तर आपल्या शाळा,व्यवसाय यांपासून दुर रहावे.
Ø  आपले हात साबण व स्वच्छ पाण्याने (विशेषतः शिंक किंवा कफ काढल्यानंतर) नियमित धूवावेत.
Ø  आपल्या डोळ्यांना, नाकाला व तोंडाला वारंवार हात लावणे टाळावे. आजारी व्यक्तींशी जवळीक टाळावी.
Ø  तुम्हाला सर्दी, खोकला या पैकी काही लक्षणे आढळल्यास प्रवास टाळा.
-         श्याम टरके, वर्धा


Comments

Popular posts from this blog

मनीषा दांडगेचा ‘खडतर प्रवास, जिद्द आणि यश’

दिनांक:- 16-05-2017 लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी पदाची निवड 2013 मध्ये झाली. 2014 मध्ये पोस्टींग मिळाली. परंतु ‘ झोपडपट्टीतील तरूणी झाली उपजिल्हाधिकारी’   अशा आशयाचा मजकूर तरूणांना अजूनही फेसबुक, न्यूज वेब पोर्टल अन् व्हाटसअ्पव्दारे प्रेरित करत आहे. स्पर्धा परीक्षकांसाठी प्रेरणादायी अशीच चंद्रपूर जिल्ह्यातील मूलच्या उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे यांची यशकथा. व्हाटस्अप  आणि आई             व्हाटसअपवरील संदेश उपजिल्हाधिकारी झालेल्या मनीषा दांडगे यांच्या आईला आजही त्यांच्या राहत्या घराच्या परिसरातील तरूण वर्ग वाचून दाखवतात. तेव्हा आईला लेकीचा अभिमान अन् मिळविलेल्या पदाचा झालेला आनंद हा गगनात मावेनासा होतो. परिसरातील तरूण वर्गही झपाट्याने अभ्यास करून डोळ्यासमोर मनीषा दांडगे यांचा आदर्श ठेवून स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षणाचा ध्यास घेत आहे,  शिकत आहे, असे आई असलेल्या लक्ष्मी दांडगे अभिमानाने सांगतात. बुध्दिमत्तेची चुणूक             तसा हा परिसर म्हणजे झोपडपट्टी. औरंगाबादेतील जाधववाडी जवळील आंबेडकर नगर. मनीषा यांचे वडील मातीकाम करणारे (मिस्त्री). 34 वर्षापूर्वी ते जालना

भूसंपादन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा उपयुक्त -नवल किशोर राम

दिनांक 31 जानेवारी 2018 औरंगाबाद,दि. 31   - भूसंपादन कायद्याबाबत सखोल माहिती होऊन योग्य आणि प्रभावीपणे कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी भूसंपादन प्रशिक्षण कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण, उपयुक्त असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा, पारदर्शकतेचा हक्क अधिनियमावर आधारीत जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम बोलत होते. यावेळी उपायुक्त महेंद्र हरपाळकर, अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन समन्वय) मंजुषा मुथा आदींसह सर्व उपविभागीय अधिकारी नायब तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ आदी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेला सुरुवात झाली. कार्यशाळेत नवीन भूसंपादन अधिनियम 2013 कायद्यातील महत्त्वाच्या बाबी, भूसंपादन प्रस्ताव सादर करणे, सामाजिक परिणाम निर्धारण

नयनरम्‍य खिंडसी...

राष्‍ट्रीय कृषी प्रदर्शन नागपुरात पार पडलं. पाच दिवसाच्‍या या प्रदर्शनानंतर पर्यटनाची मजा लुटण्‍यासाठी आम्‍ही खिंडसीला गेलो. नागपूरपासून जवळच असलेलं हे खिंडसी. रामटेकच्‍या राम मंदिरानंतर पाहायला मिळतं. निसर्गरम्‍य अशा ठिकाणी सर्वच जण इथं येतात. अगदी चिमुकल्‍यांपासून ते वृद्धांपर्यंत. तरुणाईसाठी तर सांगायचं कामच नाही. मनाला भावणारं असं हे खिंडसी पर्यटन. या पर्यटनाची मजा लुटली ती आम्‍ही.... म्‍हणजे माझे मित्र चंद्रकांत पाटील , संग्राम इंगळे आणि निलेशने. खूपच सुखावणारा अनुभव होता तो. तरुणाई , शाळकरी मुलं-मुली , शिक्षक , नवदांपत्‍य आणि भरभरून असलेला निसर्ग... डोळे कसे तृप्‍त करून जातो , ही इथं आल्‍यावरच कळतं. जलसफर गोवा आणि मुंबईत केली परंतु इथली जलसफरही तितक्‍याच तोडीची आहे. याठिकाणी येणा-या पर्यटकांची राहण्‍याची सोयही उत्‍तम आहे. जेवणाचीही व्‍यवस्‍था आहे , अगदी मांसाहारापासून शाकाहारापर्यंत , तेही चविष्‍ट. उन्‍हाळयात तर याठिकाणी प्रत्‍येकाने भेट द्यायलाच हवी , असं हे नयनरम्‍य असं ठिकाण आहे.  (व्‍हीडिओ सौजन्‍यः चंद्रकांत पाटील)