Skip to main content

विज्ञानयुगातील पितृमोक्ष अमावस्या



सौजन्य-http://images.jagran.com

गडचिरोली 

             पत्रकारिता लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. सर्वांना ते मुखपाठ आहे. परंतु आज सर्वपितृमोक्ष अमावस्या असल्याचं प्रकर्षानं जाणवलं. कारणही तसंच आहे. सकाळी सकाळी वृत्तमानपत्रे हाती पडलीे आणि कळलं. पहिल्या पानावर उद्याचा अंक नाही. असं ठळकपणे सर्व वृत्तपत्राच्या अगदी सुरवातीला पाहिल्या कॉलममध्ये वाचकांसाठी सूचना होती. तसं इलेक्ट्रॉनिक माध्यमातूनही पक्ष पंधरवाडयामुळे पक्षापक्षांचा मिलाप होत नाहीय. पिंडेला कावळा शिवत नाहीय, असं पाहायला, वाचायला मिळालं. त्यामुळे अमावस्याची धास्तीच मनात भरलेली. त्यातच जिल्ह्यात प्रशासनाला कलेक्टरांनी सुटी घोषित केलेली (आम्ही कामावर हजर होतो हं.. कलेक्टर साहेबांसह, कदाचित निवडणुकीमुळे म्हणा).
            प्रशासनलाही पिढयान् पिढ्या चालत आलेला आदेश घोषित करावा लागतो (अन्यथा कर्मचा-यांच्या क्रयशीलतेवर परिणाम होण्याची शक्यता असते). माध्यमंही त्याच पठडीतली म्हणायला का हरकत आहे. राजा राममोहन रॉय, महात्मा फुले, महात्मा गांधी, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजसेवेसाठी पत्रकारिता केली. लोकांना शिक्षित केले. चुकलेल्यांना वाट दाखवली. त्या काळातील परिस्थिती वेगळी असली तरी आपण निश्चयाने लोकांपर्यंत विज्ञानवादी विचार पोहचवू शकतोत. मात्र, जिसकी लाठी उसकी भैस...अशी परिस्थिती असल्यामुळे समाजाचा प्रतिबिंब जशास तसे उतरविण्यास धडपडत असलेल्या पत्रकारांवरही निर्बंध्‍ा येतात. आणल्या जातात. त्यांच्या मनात असूनही त्यांना मनाजोगे करता येत नाही. सर्वांच्या समस्या मार्गी लावण्याचे काम पत्रकार करतात परंतु त्यांच्या समस्यांसाठी खंबीरपणे पुढे येणारे काहीच जण आहेत. परंतु त्यांनाही मर्यादा आहेत. त्यांच्यासमोरही विविध प्रश्न आहेत. त्यामुळे सर्वच समस्या सुटल्या जातील, अशी स्‍िथती सध्या तरी नाही. मात्र अशक्यही नाही. ज्येष्ठ पत्रकार एस.एम. देशमुख सरांसारखे क्वचितच पत्रकार सापडतील.  अन् तशीही पत्रकारिता क्षेत्रात सुटी मिळणं अवघडच. त्यामुळं आमावस्या काय अन् धुळवड काय.... असा दिवस म्हणजेच आपल्याला बोनस मिळाल्याचाच आनंद चेह-यावर पाहावयास मिळतो, एवढे मात्र नक्की.
               पितृमोक्ष अमावस्यामुळे युती, आघाडी नाही. कोणतेही काम करायचे नाही. सोने खरेदी करायचे नाही. पूर्वजांना साजूक तुपाचा नैवैद्य दाखवयाचा. (जिवंतपणी त्यांना विचारतही नाहीत).सरकारी कार्यालये बंद ठेवायची, असं काही पाहावयास मिळालं. परंतु यादिवशी आम्ही सर्वांनीच कार्यालयात काम केलं. सर्व कामे व्यवस्थित पार पडली. कुठंही अडथळा आला नाही. 
                  तात्पर्य, कोणतेही काम मनापासून केल्यास ते पूर्ण होतेच. परंतु येथील व्यवस्थेला ते होऊ द्यायचे नाही. इंग्रज, पोर्तुगीजांनी लादलेल्या  गुलामगिरीसारखीच पारंपरिक पद्धतीतून वर्चस्व निर्माण करावयाचे आहे, असेच दिसते. मात्र, आपण विज्ञानवादी युगात वावरताना डाेळसपणे वावरलो तर स्वत:बरोबरच देशालाही नक्कीच फायदा होईल. अन् उदाहरण्‍ा घ्यायचेच झालेच तर याच आमावस्येच्या दिवशी इस्रोने मंगळयान सोडले, यातून आपण बोध घ्यायलाच हवा. विज्ञानाने खूप प्रगती केली आहे, आपणही या प्रगतीला विज्ञानवादी अनुकरणातून पुढे न्यायला सरसारवले पाहिजे, तरच आपला देशाचा नारा हा जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान असाच समर्पक राहील.

Comments

Popular posts from this blog

मनीषा दांडगेचा ‘खडतर प्रवास, जिद्द आणि यश’

दिनांक:- 16-05-2017 लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी पदाची निवड 2013 मध्ये झाली. 2014 मध्ये पोस्टींग मिळाली. परंतु ‘ झोपडपट्टीतील तरूणी झाली उपजिल्हाधिकारी’   अशा आशयाचा मजकूर तरूणांना अजूनही फेसबुक, न्यूज वेब पोर्टल अन् व्हाटसअ्पव्दारे प्रेरित करत आहे. स्पर्धा परीक्षकांसाठी प्रेरणादायी अशीच चंद्रपूर जिल्ह्यातील मूलच्या उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे यांची यशकथा. व्हाटस्अप  आणि आई             व्हाटसअपवरील संदेश उपजिल्हाधिकारी झालेल्या मनीषा दांडगे यांच्या आईला आजही त्यांच्या राहत्या घराच्या परिसरातील तरूण वर्ग वाचून दाखवतात. तेव्हा आईला लेकीचा अभिमान अन् मिळविलेल्या पदाचा झालेला आनंद हा गगनात मावेनासा होतो. परिसरातील तरूण वर्गही झपाट्याने अभ्यास करून डोळ्यासमोर मनीषा दांडगे यांचा आदर्श ठेवून स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षणाचा ध्यास घेत आहे,  शिकत आहे, असे आई असलेल्या लक्ष्मी दांडगे अभिमानाने सांगतात. बुध्दिमत्तेची चुणूक             तसा हा परिसर म्हणजे झोपडपट्टी. औरंगाबादेतील जाधववाडी जवळील आंबेडकर नगर. मनीषा यांचे वडील मातीकाम करणारे (मिस्त्री). 34 वर्षापूर्वी ते जालना

भूसंपादन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा उपयुक्त -नवल किशोर राम

दिनांक 31 जानेवारी 2018 औरंगाबाद,दि. 31   - भूसंपादन कायद्याबाबत सखोल माहिती होऊन योग्य आणि प्रभावीपणे कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी भूसंपादन प्रशिक्षण कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण, उपयुक्त असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा, पारदर्शकतेचा हक्क अधिनियमावर आधारीत जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम बोलत होते. यावेळी उपायुक्त महेंद्र हरपाळकर, अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन समन्वय) मंजुषा मुथा आदींसह सर्व उपविभागीय अधिकारी नायब तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ आदी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेला सुरुवात झाली. कार्यशाळेत नवीन भूसंपादन अधिनियम 2013 कायद्यातील महत्त्वाच्या बाबी, भूसंपादन प्रस्ताव सादर करणे, सामाजिक परिणाम निर्धारण

नयनरम्‍य खिंडसी...

राष्‍ट्रीय कृषी प्रदर्शन नागपुरात पार पडलं. पाच दिवसाच्‍या या प्रदर्शनानंतर पर्यटनाची मजा लुटण्‍यासाठी आम्‍ही खिंडसीला गेलो. नागपूरपासून जवळच असलेलं हे खिंडसी. रामटेकच्‍या राम मंदिरानंतर पाहायला मिळतं. निसर्गरम्‍य अशा ठिकाणी सर्वच जण इथं येतात. अगदी चिमुकल्‍यांपासून ते वृद्धांपर्यंत. तरुणाईसाठी तर सांगायचं कामच नाही. मनाला भावणारं असं हे खिंडसी पर्यटन. या पर्यटनाची मजा लुटली ती आम्‍ही.... म्‍हणजे माझे मित्र चंद्रकांत पाटील , संग्राम इंगळे आणि निलेशने. खूपच सुखावणारा अनुभव होता तो. तरुणाई , शाळकरी मुलं-मुली , शिक्षक , नवदांपत्‍य आणि भरभरून असलेला निसर्ग... डोळे कसे तृप्‍त करून जातो , ही इथं आल्‍यावरच कळतं. जलसफर गोवा आणि मुंबईत केली परंतु इथली जलसफरही तितक्‍याच तोडीची आहे. याठिकाणी येणा-या पर्यटकांची राहण्‍याची सोयही उत्‍तम आहे. जेवणाचीही व्‍यवस्‍था आहे , अगदी मांसाहारापासून शाकाहारापर्यंत , तेही चविष्‍ट. उन्‍हाळयात तर याठिकाणी प्रत्‍येकाने भेट द्यायलाच हवी , असं हे नयनरम्‍य असं ठिकाण आहे.  (व्‍हीडिओ सौजन्‍यः चंद्रकांत पाटील)